शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भाजीपाला फेकला नाही

By admin | Updated: June 12, 2017 02:23 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही.

हंसराज अहीर : सावनेर येथे ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार चांगले कार्य करीत आहे. मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, जनधन, उज्ज्वला या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह गरिबांना चांगले दिवस येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.केंद्र शासनाने तीन वर्षांत केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी सावनेर येथील श्रीकृष्ण सभागृहात रविवारी दुपारी ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा, संजय कुमार, टी. एन. झा, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सोनबा मुसळे, अरुण सिंह, दादाराव मंगळे, नितीन राठी, विजय देशमुख, किशोर मुसळे उपस्थित होते. हंसराज अहीर म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कोळशाच्या उत्पादनात वाढ झाली. पूर्वी कोळशाचे ३७ मिलियन टन उत्पादन व्हायचे. आता ते ४७ मिलियन टनावर गेले आहे. भविष्यात हे उत्पादन ६५ मिलियन टनावर जाईल. हे उत्पादन लक्षात घेता देशाला आगामी ५०० वर्षे कोळशाची कमतरता भासणार नाही, असा दावाही त्यांनी केला. सिंचनासाठी ८५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. देशातील काळाबाजार थांबला आहे. वस्तूंच्या किमती स्थिर केल्या आहेत. विजेचे दर कमी करण्यात आल्याने महाराष्ट्रात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे, असेही अहीर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात मजा करायला जात नसून ते विदेशातील मोठे उद्योग आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून रोजगार निर्मिती होणार असून, बेरोजगारी दूर होणार आहे. शिवाय, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात असल्याने स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, डॉ. राजीव पोतदार यांचीही भाषणे झाली. राजीव रंजन मिश्रा यांनी प्रास्ताविक केले तर, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे यांनी संचालन केले. वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक डी. एम. गोखले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. तीन लाख वीज कनेक्शन दिले - पालकमंत्रीसध्या विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना छत्तीसगडप्रमाणे कमी दरात वीज मिळत आहे. शिवाय, तीन लाख शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना किमान दोन पिके घेणे शक्य झाले आहे. पूर्वी सौर वीज १६ रुपये प्रतियुनिट होती. आता हे दर २.५० रुपये प्रतियुनिट करण्यात आले आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना २.८० रुपये प्रतियुनिट दराप्रमाणे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.