शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
5
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
6
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
8
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
9
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
12
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
13
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
14
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
15
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
16
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
17
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
18
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
19
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
20
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

आम्ही भाजीपाला फेकला नाही

By admin | Updated: June 12, 2017 02:23 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही.

हंसराज अहीर : सावनेर येथे ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार चांगले कार्य करीत आहे. मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, जनधन, उज्ज्वला या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह गरिबांना चांगले दिवस येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.केंद्र शासनाने तीन वर्षांत केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी सावनेर येथील श्रीकृष्ण सभागृहात रविवारी दुपारी ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा, संजय कुमार, टी. एन. झा, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सोनबा मुसळे, अरुण सिंह, दादाराव मंगळे, नितीन राठी, विजय देशमुख, किशोर मुसळे उपस्थित होते. हंसराज अहीर म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कोळशाच्या उत्पादनात वाढ झाली. पूर्वी कोळशाचे ३७ मिलियन टन उत्पादन व्हायचे. आता ते ४७ मिलियन टनावर गेले आहे. भविष्यात हे उत्पादन ६५ मिलियन टनावर जाईल. हे उत्पादन लक्षात घेता देशाला आगामी ५०० वर्षे कोळशाची कमतरता भासणार नाही, असा दावाही त्यांनी केला. सिंचनासाठी ८५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. देशातील काळाबाजार थांबला आहे. वस्तूंच्या किमती स्थिर केल्या आहेत. विजेचे दर कमी करण्यात आल्याने महाराष्ट्रात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे, असेही अहीर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात मजा करायला जात नसून ते विदेशातील मोठे उद्योग आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून रोजगार निर्मिती होणार असून, बेरोजगारी दूर होणार आहे. शिवाय, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात असल्याने स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, डॉ. राजीव पोतदार यांचीही भाषणे झाली. राजीव रंजन मिश्रा यांनी प्रास्ताविक केले तर, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे यांनी संचालन केले. वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक डी. एम. गोखले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. तीन लाख वीज कनेक्शन दिले - पालकमंत्रीसध्या विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना छत्तीसगडप्रमाणे कमी दरात वीज मिळत आहे. शिवाय, तीन लाख शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना किमान दोन पिके घेणे शक्य झाले आहे. पूर्वी सौर वीज १६ रुपये प्रतियुनिट होती. आता हे दर २.५० रुपये प्रतियुनिट करण्यात आले आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना २.८० रुपये प्रतियुनिट दराप्रमाणे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.