शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

आम्ही कर्तव्य पार पाडतोच

By admin | Updated: February 21, 2017 02:25 IST

आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही.

मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नये : ज्येष्ठांनी दिला विचारनागपूर : आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहण्यासारखाच अनुभव या ज्येष्ठांना निवडणुकांचा आहे. देशात बदलणारी परिस्थिती त्यांनी पाहिली आहे. त्या बदलाचे स्मरण आणि जाणीवही त्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीचा तसा उत्साह नसला तरी मतदान करण्याची आवश्यकता त्यांना माहिती आहे. त्यामुळे होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते. आयुष्याची सायंकाळ चांगली जावी ही माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची असते. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे, महानगरपालिकेशी जुळलेली लहान-मोठी कामे करता यावी एवढीच त्यांची इच्छा. हे करण्यासाठी आपला प्रतिनिधी चांगला असावा व प्रश्न सोडविण्यासाठी तो सक्षम असावा याची जाणीव त्यांना अनुभवातून मिळाली आहे. त्यामुळेच की काय संवैधानिक अधिकाराप्रति आणि सोबत आलेल्या कर्तव्याची त्यांना जाणीव आहे. लोकमतने या ज्येष्ठांशी साधलेला हा संवाद. (प्रतिनिधी)मतदान आमचा अधिकार आहेवयाची सत्तरी पार केली असल्याने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्यासारखा अनेक निवडणुकांचाही अनुभव आहे. कधी चांगला तर कधी वाईट. मनासारखे चित्र दिसत नसल्याने अनेक वेळा निराशाही होते. मात्र मतदान आमचा अधिकार आहे आणि तो निभावणे आमचे कर्तव्यही आहे. वारंवार मिळणारी ही संधी शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची इच्छा आहे. - सुदर्शन सुभेदारप्रत्येकाने कर्तव्य बजावले पाहिजेमतदान न करता व्यवस्था वाईट आहे, असे बोलणे योग्य नाही. कधी आपल्या मनासारखे होतेच, असे नाही. मात्र प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे. काही सकारात्मक बदल घडविण्याची इच्छा असेल तर मतदान हे केलेच पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून अनेक निवडणुका अनुभवल्या आहेत. लोकसभा, विधानसभा असो की महापालिका, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. - द.शा. पंडेआपण चुकायचे नाहीआपण मतदान करतो व अनेक वेळा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. निवडून गेलेला उमेदवार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, याची जाणीव होते आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवात ती अनेक वेळा झालीही आहे. निवडणूक कोणतीही असो, न चुकता मतदान करायचे ठरविले आहे.- माधुरी ठोसरचांगले घडेल, या अपेक्षेतून मतदानअनेक वर्षांचे अनुभव सारखेच आहेत, मात्र उत्साह आजही वाटते. परिस्थिती मात्र बदलली आहे. आपल्या मनासारखे होईलच असे नाही. मात्र निवडूना येणारा उमेदवार आपल्या समस्या सोडवेल, ही अपेक्षा कायम असते. त्यामुळेच आवर्जून मतदान करावे, असे वाटते. हे आमचे शहर आहे. त्यामुळे आमच्या एका मताने चांगले होत असेल तर ही संधी आम्ही का सोडावी. - संध्या ठोसर मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नयेजे लोक मतदान करणार नाही त्यांना अमूक काम झाले नाही, असा जाब विचारण्याचाही अधिकार नाही. मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाही जिवंत असण्याचे प्रतीक आहे. यातूनच आम्हाला आमचा प्रतिनिधी निवडायचा आहे. बदल हा घडणारच. मात्र तो घडविण्याची जबाबदारी आमची आहे. - शरद देवपुजारी उत्साहापेक्षा कर्तव्याची जाणीवमाझे वय ८० वर्षांच्यावर आहे. पक्षाची कामेही केली आहेत. त्यामुळे तरुणांसारखा उत्साह नसला तरी कर्तव्याची जाणीव मात्र आहे. आज परिस्थिती बदलली आहे. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे यासाठी योग्य माणसे सभागृहात पोहोचावी, ही अपेक्षा नेहमीच असते. या अपेक्षेतूनच न चुकता मतदान करण्याची इच्छा असते.- मधुकर रोटकर