शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

आम्ही कर्तव्य पार पाडतोच

By admin | Updated: February 21, 2017 02:25 IST

आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही.

मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नये : ज्येष्ठांनी दिला विचारनागपूर : आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहण्यासारखाच अनुभव या ज्येष्ठांना निवडणुकांचा आहे. देशात बदलणारी परिस्थिती त्यांनी पाहिली आहे. त्या बदलाचे स्मरण आणि जाणीवही त्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीचा तसा उत्साह नसला तरी मतदान करण्याची आवश्यकता त्यांना माहिती आहे. त्यामुळे होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते. आयुष्याची सायंकाळ चांगली जावी ही माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची असते. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे, महानगरपालिकेशी जुळलेली लहान-मोठी कामे करता यावी एवढीच त्यांची इच्छा. हे करण्यासाठी आपला प्रतिनिधी चांगला असावा व प्रश्न सोडविण्यासाठी तो सक्षम असावा याची जाणीव त्यांना अनुभवातून मिळाली आहे. त्यामुळेच की काय संवैधानिक अधिकाराप्रति आणि सोबत आलेल्या कर्तव्याची त्यांना जाणीव आहे. लोकमतने या ज्येष्ठांशी साधलेला हा संवाद. (प्रतिनिधी)मतदान आमचा अधिकार आहेवयाची सत्तरी पार केली असल्याने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्यासारखा अनेक निवडणुकांचाही अनुभव आहे. कधी चांगला तर कधी वाईट. मनासारखे चित्र दिसत नसल्याने अनेक वेळा निराशाही होते. मात्र मतदान आमचा अधिकार आहे आणि तो निभावणे आमचे कर्तव्यही आहे. वारंवार मिळणारी ही संधी शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची इच्छा आहे. - सुदर्शन सुभेदारप्रत्येकाने कर्तव्य बजावले पाहिजेमतदान न करता व्यवस्था वाईट आहे, असे बोलणे योग्य नाही. कधी आपल्या मनासारखे होतेच, असे नाही. मात्र प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे. काही सकारात्मक बदल घडविण्याची इच्छा असेल तर मतदान हे केलेच पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून अनेक निवडणुका अनुभवल्या आहेत. लोकसभा, विधानसभा असो की महापालिका, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. - द.शा. पंडेआपण चुकायचे नाहीआपण मतदान करतो व अनेक वेळा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. निवडून गेलेला उमेदवार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, याची जाणीव होते आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवात ती अनेक वेळा झालीही आहे. निवडणूक कोणतीही असो, न चुकता मतदान करायचे ठरविले आहे.- माधुरी ठोसरचांगले घडेल, या अपेक्षेतून मतदानअनेक वर्षांचे अनुभव सारखेच आहेत, मात्र उत्साह आजही वाटते. परिस्थिती मात्र बदलली आहे. आपल्या मनासारखे होईलच असे नाही. मात्र निवडूना येणारा उमेदवार आपल्या समस्या सोडवेल, ही अपेक्षा कायम असते. त्यामुळेच आवर्जून मतदान करावे, असे वाटते. हे आमचे शहर आहे. त्यामुळे आमच्या एका मताने चांगले होत असेल तर ही संधी आम्ही का सोडावी. - संध्या ठोसर मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नयेजे लोक मतदान करणार नाही त्यांना अमूक काम झाले नाही, असा जाब विचारण्याचाही अधिकार नाही. मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाही जिवंत असण्याचे प्रतीक आहे. यातूनच आम्हाला आमचा प्रतिनिधी निवडायचा आहे. बदल हा घडणारच. मात्र तो घडविण्याची जबाबदारी आमची आहे. - शरद देवपुजारी उत्साहापेक्षा कर्तव्याची जाणीवमाझे वय ८० वर्षांच्यावर आहे. पक्षाची कामेही केली आहेत. त्यामुळे तरुणांसारखा उत्साह नसला तरी कर्तव्याची जाणीव मात्र आहे. आज परिस्थिती बदलली आहे. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे यासाठी योग्य माणसे सभागृहात पोहोचावी, ही अपेक्षा नेहमीच असते. या अपेक्षेतूनच न चुकता मतदान करण्याची इच्छा असते.- मधुकर रोटकर