शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आग विझविण्यासाठी लवकर मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:59 IST

नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशहरात नवीन ९७ हायड्रंट : १.१० कोटीचा निधी वळता करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत. यासाठी इतर विभागाचा १.१० कोटींचा निधी वळता करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी २० नोव्हेंबरला होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.शहराच्या कोणत्याही भागात आग लागल्यास ती तातडीने विझवता यावी, यासाठी ब्रिटिशांनी १९४७ च्या सुमारास अग्निशमन विभागाचे तब्बल एक हजार हायड्रंट उभारले होेते. परंतु यातील फक्त नऊ हायड्रंट सुरू आहेत़ जलप्रदाय विभागाने नवीन हायड्रंट लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता़ मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. २४ बाय ७ योजनेंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. परंतु या जलवाहिन्यांना हायड्रंट जोडण्यात आलेले नाही.तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने जुने हायड्रंट जमिनीखाली दबले आहेत. अग्निशमन विभागाने हायड्रंट लावण्यासाठी ११६ जागा चिन्हांकित केल्या. यातील ९ हायड्रंट सुरू आहेत. तर ९७ नवीन फायर हायड्रंट लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.बंद असलेले व दुरुस्त करण्याजोगे असणाºया हायड्रंटच्या दुरुस्तीकरिता २ लाख ६ हजार ८३० रुपये व नवीन हायड्रंट उभारण्याकरिता १ कोटी ५ लाख ४८ हजार ८७३ इतका खर्च अपेक्षित होता़विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती़. परंतु आर्थिक अडचणीमुळे हा निधी उपल्बध झाला नाही. त्यामुळे अन्य खात्यातून १.१० कोटीचा निधी वळता केला जाणार आहे.आग नियंत्रणाठी हायड्रंट आवश्यकशहरात आग लागल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवता यावे व लवकर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शहराच्या विविध भागात एक हजार हायड्रंट उभारण्यात आले होते़ आग विझविण्यासाठी हायड्रंटवरून पाणी उपलब्ध करून दिले जायचे़ कालांतराने नव्या वाहिन्या टाकण्यात आल्या़, मात्र त्यांना हायड्रंटशी जोडले गेले नाही तसेच नवीन हायड्रंट लावण्यात आलेले नाही. आग लागल्यास ती तातडीने नियंत्रणात यावी. यासाठी हायड्रंट उभारणे आवश्यक आहे.