शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

आग विझविण्यासाठी लवकर मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:59 IST

नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशहरात नवीन ९७ हायड्रंट : १.१० कोटीचा निधी वळता करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत. यासाठी इतर विभागाचा १.१० कोटींचा निधी वळता करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी २० नोव्हेंबरला होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.शहराच्या कोणत्याही भागात आग लागल्यास ती तातडीने विझवता यावी, यासाठी ब्रिटिशांनी १९४७ च्या सुमारास अग्निशमन विभागाचे तब्बल एक हजार हायड्रंट उभारले होेते. परंतु यातील फक्त नऊ हायड्रंट सुरू आहेत़ जलप्रदाय विभागाने नवीन हायड्रंट लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता़ मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. २४ बाय ७ योजनेंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. परंतु या जलवाहिन्यांना हायड्रंट जोडण्यात आलेले नाही.तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने जुने हायड्रंट जमिनीखाली दबले आहेत. अग्निशमन विभागाने हायड्रंट लावण्यासाठी ११६ जागा चिन्हांकित केल्या. यातील ९ हायड्रंट सुरू आहेत. तर ९७ नवीन फायर हायड्रंट लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.बंद असलेले व दुरुस्त करण्याजोगे असणाºया हायड्रंटच्या दुरुस्तीकरिता २ लाख ६ हजार ८३० रुपये व नवीन हायड्रंट उभारण्याकरिता १ कोटी ५ लाख ४८ हजार ८७३ इतका खर्च अपेक्षित होता़विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती़. परंतु आर्थिक अडचणीमुळे हा निधी उपल्बध झाला नाही. त्यामुळे अन्य खात्यातून १.१० कोटीचा निधी वळता केला जाणार आहे.आग नियंत्रणाठी हायड्रंट आवश्यकशहरात आग लागल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवता यावे व लवकर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शहराच्या विविध भागात एक हजार हायड्रंट उभारण्यात आले होते़ आग विझविण्यासाठी हायड्रंटवरून पाणी उपलब्ध करून दिले जायचे़ कालांतराने नव्या वाहिन्या टाकण्यात आल्या़, मात्र त्यांना हायड्रंटशी जोडले गेले नाही तसेच नवीन हायड्रंट लावण्यात आलेले नाही. आग लागल्यास ती तातडीने नियंत्रणात यावी. यासाठी हायड्रंट उभारणे आवश्यक आहे.