शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार आता लोकचळवळ

By admin | Updated: June 8, 2015 02:57 IST

जलयुक्त शिवार या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठी राबविण्यात ...

मुख्यमंत्री फडणवीस : हिंगणा, काटोल, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील जलसंधारण कामांची पाहणी नागपूर : जलयुक्त शिवार या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘जलयुक्त शिवार’ हे केवळ अभियान राहिले नसून ती आता लोकचळवळ बनली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर जिल्ह्यातील मोंढा, उखळी, जुनेवाणी, किन्ही (हिंगणा), काटोल तालुक्यातील पांजरा (काटे), बाजारगाव, बोरगाव, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील धानोली, घुरखेडा आदी गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू नाला, खोलीकरण, नाला रुंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट नालाबांध, आर्ट आॅफ लिव्हिंग अंतर्गत लोकसहभागातून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, आ. आशिष देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, माजी आ. विजय घोडमारे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, कृषी अधिकारी सहभागी झाले होते. जुनेवाणी येथे पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात ६ हजार गावांमध्ये २७ विविध प्रकारची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अजूनही ८२ टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेती सिंचनाखाली आल्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार नाही. या अभियानांतर्गत लोकसहभागातून सुमारे ३० कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गरज भासल्यास काही कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या पावसाळ्यात या कामाचे दृश्यरुप पाहायला मिळेल आणि त्यानंतर स्वत:हून लोकं मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, येत्या पाच वर्षात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील. जलक्रांतीशिवाय आता पर्याय नाही. सिमेंटनाला बांध, माती नालाबांध, शेततळे, नाला, बंडींगमध्ये पावसाळ्यात पडणारे पाणी साठविल्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी आपोआप वाढेल. उखळी मोंठा येथील नाला खोलीकरणाची पाहणी करताना ते म्हणाले, नाल्याच्या काठावर वृक्ष लागवड केल्यास काठावरील माती ढासळणार नाही, आणि पर्यावरणाचेही संवर्धन होईल. कामाच्या दुरुस्तीसाठी अधिकचा निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. मोंढा, उखळी शिवारात कृषी विभागामार्फत एकूण नऊ कामे करण्यात आली. पहिल्या नाल्याची लांबी २९० मीटर तर खोली २.८० मीटर करण्यात आली. त्यामुळे ७.८२ टी.बी.एच. जलसाठा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या नाल्याची लांबी २४५ मीटर आणि तिसऱ्या नाल्याची लांबी २२५ मीटर करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाचं सहसंचालक विजय घावटे व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी संयुक्तरीत्या दिली. आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेमार्फत हिंगणा तालुक्यातील जुनेवाणी, डेगमा, अंबाझरी, खामली शिवारातील कामांसाठी पाच पोकलॅण्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. यात २२ कि.मी. लांबीच्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. यावर १ कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, त्यातील १७ लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण कामाविषयी समाधान व्यक्त केले असून, ही कामे अधिक जोमाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)