शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

रेल्वे तिकिटापेक्षा महागले पाण्याचे दर

By admin | Updated: March 23, 2015 02:23 IST

रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे.

नागपूर : रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्यात रेल्वेस्थानकावर थंड पिण्याचे पाणी मिळावे ही प्रवाशांची साधी मागणीही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करताना प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे. प्रवाशांना शुध्द, गुणवत्तापूर्ण पाणी मिळावे याकरिता रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर वॉटरकुलर बसविले. शहरातील देणगीदारांनीही वॉटरकुलर भेट दिले. या वॉटरकुलरवर प्रवाशांची तहान भागते. परंतु बाटलीबंद पाण्याची विक्री व्हावी म्हणून काही असामाजिक तत्त्व वॉटरकुलरच बंद ठेवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना थंड पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. याचा फायदा घेऊन अवैध व्हेंडर प्रवाशांना बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना १५ ते २० रुपये किंमत असलेले बाटलीबंद पाणी खरेदी करून तहान भागविण्याची पाळी आली आहे. असा प्रकार मागील वर्षी मे महिन्यात कळमना रेल्वेस्थानकावर उघडकीस आला होता. खिशाला परवडणारा आणि सुरक्षेचा प्रवास म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. रेल्वेवर असलेल्या विश्वासामुळे भारतात दररोज दोन कोटी तीस लाख लोक प्रवास करतात. रेल्वेत १ ते १५ किलोमीटर प्रवासासाठी ५ रुपये, १६ ते ४० किलोमीटरसाठी १० रुपये आणि ४१ ते ६५ किलोमीटरसाठी १५ रुपये आकारण्यात येतात. परंतु १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करावी लागत असल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना उन्हाळ्यात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)