शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

रेल्वे तिकिटापेक्षा महागले पाण्याचे दर

By admin | Updated: March 23, 2015 02:23 IST

रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे.

नागपूर : रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्यात रेल्वेस्थानकावर थंड पिण्याचे पाणी मिळावे ही प्रवाशांची साधी मागणीही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करताना प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे. प्रवाशांना शुध्द, गुणवत्तापूर्ण पाणी मिळावे याकरिता रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर वॉटरकुलर बसविले. शहरातील देणगीदारांनीही वॉटरकुलर भेट दिले. या वॉटरकुलरवर प्रवाशांची तहान भागते. परंतु बाटलीबंद पाण्याची विक्री व्हावी म्हणून काही असामाजिक तत्त्व वॉटरकुलरच बंद ठेवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना थंड पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. याचा फायदा घेऊन अवैध व्हेंडर प्रवाशांना बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना १५ ते २० रुपये किंमत असलेले बाटलीबंद पाणी खरेदी करून तहान भागविण्याची पाळी आली आहे. असा प्रकार मागील वर्षी मे महिन्यात कळमना रेल्वेस्थानकावर उघडकीस आला होता. खिशाला परवडणारा आणि सुरक्षेचा प्रवास म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. रेल्वेवर असलेल्या विश्वासामुळे भारतात दररोज दोन कोटी तीस लाख लोक प्रवास करतात. रेल्वेत १ ते १५ किलोमीटर प्रवासासाठी ५ रुपये, १६ ते ४० किलोमीटरसाठी १० रुपये आणि ४१ ते ६५ किलोमीटरसाठी १५ रुपये आकारण्यात येतात. परंतु १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करावी लागत असल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना उन्हाळ्यात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)