शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

रेल्वे तिकिटापेक्षा महागले पाण्याचे दर

By admin | Updated: March 23, 2015 02:23 IST

रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे.

नागपूर : रेल्वेत ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आकारण्यात येतात. परंतु तेवढ्या पैशात मात्र प्रवाशांची साधी तहानही भागत नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्यात रेल्वेस्थानकावर थंड पिण्याचे पाणी मिळावे ही प्रवाशांची साधी मागणीही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करताना प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे. प्रवाशांना शुध्द, गुणवत्तापूर्ण पाणी मिळावे याकरिता रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर वॉटरकुलर बसविले. शहरातील देणगीदारांनीही वॉटरकुलर भेट दिले. या वॉटरकुलरवर प्रवाशांची तहान भागते. परंतु बाटलीबंद पाण्याची विक्री व्हावी म्हणून काही असामाजिक तत्त्व वॉटरकुलरच बंद ठेवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना थंड पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. याचा फायदा घेऊन अवैध व्हेंडर प्रवाशांना बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना १५ ते २० रुपये किंमत असलेले बाटलीबंद पाणी खरेदी करून तहान भागविण्याची पाळी आली आहे. असा प्रकार मागील वर्षी मे महिन्यात कळमना रेल्वेस्थानकावर उघडकीस आला होता. खिशाला परवडणारा आणि सुरक्षेचा प्रवास म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. रेल्वेवर असलेल्या विश्वासामुळे भारतात दररोज दोन कोटी तीस लाख लोक प्रवास करतात. रेल्वेत १ ते १५ किलोमीटर प्रवासासाठी ५ रुपये, १६ ते ४० किलोमीटरसाठी १० रुपये आणि ४१ ते ६५ किलोमीटरसाठी १५ रुपये आकारण्यात येतात. परंतु १५ ते २० रुपयाची पाण्याची बाटली खरेदी करावी लागत असल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना उन्हाळ्यात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)