शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्रातील प्रकल्प काठोकाठ; गतवर्षीपेक्षा साठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 10:57 IST

Nagpur News Water राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत.

ठळक मुद्दे औरंगाबाद विभागात जलसमृद्धीकोकणात थोडी घट

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - महाराष्ट्रातील सर्वच प्रकल्प यंदा काठोकाठ भरले आहेत. राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत. औरंगाबाद विभागातील सहाही जिल्ह्यामधील बहुतेक मोठे प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा झालेली पर्जन्यवृष्टी हे त्यामागील कारण आहे.

राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहाही विभागांमध्ये मोठे, मध्यम आणि लघु मिळून ३ हजार २६७ प्रकल्प आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये असलेल्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पामधील जलसाठा मागील वर्षी ऑक्टोबर अखेर फक्त ५५.२३ टक्के होता. या वर्षी ऑक्टोबरअखेर तो वाढून ८३.४९ टक्के झाला आहे. तेथील उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा गतवर्षी २९ टक्के भरला होता. यंदा १०० टक्के भरला आहे. बीडमधील माजलगाव, हिंगोलीतील येलदरी, परभणीमधील निम्न दुधना हे मोठे प्रकल्पही यंदा १०० टक्के भरले आहेत.

यंदा काही अंशी कोकण वगळता सर्वच विभागात जलसमृद्धी दिसत आहे. कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे या तीन जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठे मिळून १७६ प्रकल्प आहेत. मागील ऑक्टोबरअखेर ८८.४८ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला होता. यंदा त्यात किंचित घट होऊन तो ८४.३९ टक्क्यांवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी मोठ्या प्रकल्पात मागील वर्षी ऑक्टोबरअखेर १०० टक्के जलसाठा होता. यंदा ०.५० टक्क्यांनी तो मागे आहे. ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर मागील वर्षी ९०.८९ टक्के भरला होता, यंदा तो ७७.७३ टक्के भरला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

...

टॅग्स :Waterपाणी