शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

महाराष्ट्रातील प्रकल्प काठोकाठ; गतवर्षीपेक्षा साठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 10:57 IST

Nagpur News Water राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत.

ठळक मुद्दे औरंगाबाद विभागात जलसमृद्धीकोकणात थोडी घट

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - महाराष्ट्रातील सर्वच प्रकल्प यंदा काठोकाठ भरले आहेत. राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत. औरंगाबाद विभागातील सहाही जिल्ह्यामधील बहुतेक मोठे प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा झालेली पर्जन्यवृष्टी हे त्यामागील कारण आहे.

राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहाही विभागांमध्ये मोठे, मध्यम आणि लघु मिळून ३ हजार २६७ प्रकल्प आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये असलेल्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पामधील जलसाठा मागील वर्षी ऑक्टोबर अखेर फक्त ५५.२३ टक्के होता. या वर्षी ऑक्टोबरअखेर तो वाढून ८३.४९ टक्के झाला आहे. तेथील उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा गतवर्षी २९ टक्के भरला होता. यंदा १०० टक्के भरला आहे. बीडमधील माजलगाव, हिंगोलीतील येलदरी, परभणीमधील निम्न दुधना हे मोठे प्रकल्पही यंदा १०० टक्के भरले आहेत.

यंदा काही अंशी कोकण वगळता सर्वच विभागात जलसमृद्धी दिसत आहे. कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे या तीन जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठे मिळून १७६ प्रकल्प आहेत. मागील ऑक्टोबरअखेर ८८.४८ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला होता. यंदा त्यात किंचित घट होऊन तो ८४.३९ टक्क्यांवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी मोठ्या प्रकल्पात मागील वर्षी ऑक्टोबरअखेर १०० टक्के जलसाठा होता. यंदा ०.५० टक्क्यांनी तो मागे आहे. ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर मागील वर्षी ९०.८९ टक्के भरला होता, यंदा तो ७७.७३ टक्के भरला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

...

टॅग्स :Waterपाणी