शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

महाराष्ट्रातील प्रकल्प काठोकाठ; गतवर्षीपेक्षा साठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 10:57 IST

Nagpur News Water राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत.

ठळक मुद्दे औरंगाबाद विभागात जलसमृद्धीकोकणात थोडी घट

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - महाराष्ट्रातील सर्वच प्रकल्प यंदा काठोकाठ भरले आहेत. राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत. औरंगाबाद विभागातील सहाही जिल्ह्यामधील बहुतेक मोठे प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा झालेली पर्जन्यवृष्टी हे त्यामागील कारण आहे.

राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहाही विभागांमध्ये मोठे, मध्यम आणि लघु मिळून ३ हजार २६७ प्रकल्प आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये असलेल्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पामधील जलसाठा मागील वर्षी ऑक्टोबर अखेर फक्त ५५.२३ टक्के होता. या वर्षी ऑक्टोबरअखेर तो वाढून ८३.४९ टक्के झाला आहे. तेथील उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा गतवर्षी २९ टक्के भरला होता. यंदा १०० टक्के भरला आहे. बीडमधील माजलगाव, हिंगोलीतील येलदरी, परभणीमधील निम्न दुधना हे मोठे प्रकल्पही यंदा १०० टक्के भरले आहेत.

यंदा काही अंशी कोकण वगळता सर्वच विभागात जलसमृद्धी दिसत आहे. कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे या तीन जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठे मिळून १७६ प्रकल्प आहेत. मागील ऑक्टोबरअखेर ८८.४८ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला होता. यंदा त्यात किंचित घट होऊन तो ८४.३९ टक्क्यांवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी मोठ्या प्रकल्पात मागील वर्षी ऑक्टोबरअखेर १०० टक्के जलसाठा होता. यंदा ०.५० टक्क्यांनी तो मागे आहे. ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर मागील वर्षी ९०.८९ टक्के भरला होता, यंदा तो ७७.७३ टक्के भरला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

...

टॅग्स :Waterपाणी