शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाणी संपले, वर्‍हाडी तापले

By admin | Updated: May 31, 2014 01:01 IST

एखादे मंगल कार्यालय विवाह समारंभासाठी किरायाने घेतल्यावर तेथे किमान आवश्यक सुविधा असाव्यात, ही सामान्यत: अपेक्षा असते. पण पिण्याच्या पाण्यासारखी अत्यावश्यक बाब मंगल कार्यालयात नसली

कृष्णा मंगल कार्यालयात गोंधळ  : वेळेवर टँकरही आला नाही नागपूर : एखादे मंगल कार्यालय विवाह समारंभासाठी किरायाने घेतल्यावर तेथे किमान आवश्यक  सुविधा असाव्यात, ही सामान्यत: अपेक्षा असते. पण पिण्याच्या पाण्यासारखी अत्यावश्यक बाब  मंगल कार्यालयात नसली तर वर्‍हाड्यांचे, लहान मुलांचे काय हाल होतात, याचा प्रत्यय आज  आला. अचानक दुपारी १ वाजताच्या सुमारास मंगल कार्यालयातले पाणी संपले आणि विवाह  समारंभाला उपस्थित लोकांचे हाल झाले. पाण्याअभावी विवाहाचे विधी थांबवावे लागले.  वधुपक्षाकडील लोकांनी वरपक्षाकडून बोलणी खावी लागली आणि मनस्ताप सहन करावा लागला.  यामुळे काही काळ प्रचंड तणाव मंगल कार्यालयात निर्माण झाला.      भगवान वारजुरकर यांच्या मुलीचा विवाह समारंभ आज कृष्णा मंगल कार्यालय, हसनबाग  रोड, भांडे प्लॉट चौकाजवळ पार पडला. मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे पूर्ण  किराया देण्यात आला. त्यात पिण्याच्या पाण्याची सोय करणे मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे  काम होते. विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला तोपर्यंंंत सारेच सुरळीत होते. त्यानंतर भोजनाला प्रारंभ  झाला आणि उपस्थितांना पिण्याच्या पाणीच मिळेनासे झाले. संपूर्ण मंगल कार्यालयात पाण्याचा  ठणठणाट होता. पाण्याची कुठलीच पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तहानेने  व्याकूळ झालेल्या वर्‍हाड्यांनी अन्नाचे ताट ठेवून पाणी मिळविण्यासाठी धडपड सुरु केली. भोजन  करताना अन्नाने भरलेला हात धुण्यासाठीही दोन थेंबदेखील पाणी मंगल कार्यालयात उपलब्ध  नव्हते. त्यामुळे हात भरलेल्या अवस्थेत वर्‍हाडी पाण्याचे पाऊच विकत घेण्यासाठी उन्हात  रस्त्यावर आले. प्लेट धुण्यासाठीही पाणी नसल्याने काही काळ भोजन आणि विवाह समारंभाचे  विधी अपरिहार्यपणे थांबबावे लागले. त्यात वधुपक्षाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंगल  कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर त्यांनी टँकर बोलाविला असल्याचे सांगितले. पण  मधल्या दोन तासाच्या काळात सारेच ठप्प झाले. अनेक पाहुण्यांनी या असुविधेमुळे काढता पाय  घेतला. कुलरमधले पाणीही संपले असल्याने गर्मीने लोक हैराण झाले. येथे प्रचंड गोंधळाची स्थिती  निर्माण झाली होती. याप्रसंगी मुलीचे काका राजेश वारजुरकर म्हणाले, संपूर्ण किराया आधी दिल्यावरही गाद्यांच्या  चादरी, कुलर आणि भोजनाचे सभागृह हळदीच्या भोजनासाठी व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिले  नाही. पाणी नसल्याचे सांगितल्यावरही व्यवस्थापनाने टँकर बोलाविला असल्याचेच उत्तर दिले.  अखेर पैसे खर्च करुन आम्हाला स्वतंत्रपणे टँकर बोलवावा लागला. अखेरपर्यंंंत मंगल  कार्यालयाचा टँकर आलाच नाही.पाणी नसल्याने टँकर येईपर्यंंंत पाण्याचे पाऊच आणि बाटल्या विकत आणून वर्‍हाड्यांना द्याव्या  लागल्या. यात प्रचंड मनस्ताप झाला, असे ते म्हणाले.