शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पाणी संपले, वर्‍हाडी तापले

By admin | Updated: May 31, 2014 01:01 IST

एखादे मंगल कार्यालय विवाह समारंभासाठी किरायाने घेतल्यावर तेथे किमान आवश्यक सुविधा असाव्यात, ही सामान्यत: अपेक्षा असते. पण पिण्याच्या पाण्यासारखी अत्यावश्यक बाब मंगल कार्यालयात नसली

कृष्णा मंगल कार्यालयात गोंधळ  : वेळेवर टँकरही आला नाही नागपूर : एखादे मंगल कार्यालय विवाह समारंभासाठी किरायाने घेतल्यावर तेथे किमान आवश्यक  सुविधा असाव्यात, ही सामान्यत: अपेक्षा असते. पण पिण्याच्या पाण्यासारखी अत्यावश्यक बाब  मंगल कार्यालयात नसली तर वर्‍हाड्यांचे, लहान मुलांचे काय हाल होतात, याचा प्रत्यय आज  आला. अचानक दुपारी १ वाजताच्या सुमारास मंगल कार्यालयातले पाणी संपले आणि विवाह  समारंभाला उपस्थित लोकांचे हाल झाले. पाण्याअभावी विवाहाचे विधी थांबवावे लागले.  वधुपक्षाकडील लोकांनी वरपक्षाकडून बोलणी खावी लागली आणि मनस्ताप सहन करावा लागला.  यामुळे काही काळ प्रचंड तणाव मंगल कार्यालयात निर्माण झाला.      भगवान वारजुरकर यांच्या मुलीचा विवाह समारंभ आज कृष्णा मंगल कार्यालय, हसनबाग  रोड, भांडे प्लॉट चौकाजवळ पार पडला. मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे पूर्ण  किराया देण्यात आला. त्यात पिण्याच्या पाण्याची सोय करणे मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे  काम होते. विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला तोपर्यंंंत सारेच सुरळीत होते. त्यानंतर भोजनाला प्रारंभ  झाला आणि उपस्थितांना पिण्याच्या पाणीच मिळेनासे झाले. संपूर्ण मंगल कार्यालयात पाण्याचा  ठणठणाट होता. पाण्याची कुठलीच पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तहानेने  व्याकूळ झालेल्या वर्‍हाड्यांनी अन्नाचे ताट ठेवून पाणी मिळविण्यासाठी धडपड सुरु केली. भोजन  करताना अन्नाने भरलेला हात धुण्यासाठीही दोन थेंबदेखील पाणी मंगल कार्यालयात उपलब्ध  नव्हते. त्यामुळे हात भरलेल्या अवस्थेत वर्‍हाडी पाण्याचे पाऊच विकत घेण्यासाठी उन्हात  रस्त्यावर आले. प्लेट धुण्यासाठीही पाणी नसल्याने काही काळ भोजन आणि विवाह समारंभाचे  विधी अपरिहार्यपणे थांबबावे लागले. त्यात वधुपक्षाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंगल  कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर त्यांनी टँकर बोलाविला असल्याचे सांगितले. पण  मधल्या दोन तासाच्या काळात सारेच ठप्प झाले. अनेक पाहुण्यांनी या असुविधेमुळे काढता पाय  घेतला. कुलरमधले पाणीही संपले असल्याने गर्मीने लोक हैराण झाले. येथे प्रचंड गोंधळाची स्थिती  निर्माण झाली होती. याप्रसंगी मुलीचे काका राजेश वारजुरकर म्हणाले, संपूर्ण किराया आधी दिल्यावरही गाद्यांच्या  चादरी, कुलर आणि भोजनाचे सभागृह हळदीच्या भोजनासाठी व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिले  नाही. पाणी नसल्याचे सांगितल्यावरही व्यवस्थापनाने टँकर बोलाविला असल्याचेच उत्तर दिले.  अखेर पैसे खर्च करुन आम्हाला स्वतंत्रपणे टँकर बोलवावा लागला. अखेरपर्यंंंत मंगल  कार्यालयाचा टँकर आलाच नाही.पाणी नसल्याने टँकर येईपर्यंंंत पाण्याचे पाऊच आणि बाटल्या विकत आणून वर्‍हाड्यांना द्याव्या  लागल्या. यात प्रचंड मनस्ताप झाला, असे ते म्हणाले.