शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

पेंचचा जलस्तर खालावला

By admin | Updated: January 6, 2015 01:01 IST

पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला

पाणीटंचाईचे संकेत : पाण्याच्या पातळीत आठवडाभरात २ मीटरने घटचंद्रशेखर गिरडकर - पारशिवनीपारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. ऐन हिवाळ्यात जलसाठा घटल्याने उन्हाळ्यात या शहरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे. पेंच प्रकल्पातील जलसाठ्याची प्रत्येक आठवड्यात तपासणी केली जाते. या प्रकल्पात पावसाळा संपल्यानंतर १६ मीटर जलसाठा उपलब्ध होता. मागच्या आठवड्यातील पाहणीत हा जलसाठा १७ मीटर असल्याचे आढळून आले होते. चालू आठवड्यात हा जलसाठा २ मीटरने घटला असून, तो १४ मीटर शिल्लक असल्याचे आढळून आले.पेंच प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीची लांबी २०११ मीटर असून, सांडव्याची २३६४ मीटर व उंची ४४.५० मीटर आहे. या प्रकल्पाचा डावा कालवा मौदा तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात गेला असून, हा कालवा ४८.५० कि.मी. लांब आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची व्याप्ती ही ३८८ वर्गमीटर आहे. उजवा कालवा कोराडीला आला असून, या कालव्याची लांबी ३२.८५ कि.मी. आहे. डाव्या कालव्यातून ९० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून, उजव्या कालव्यातून प्रति सेकंद १८.४ घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो. उजव्या कालव्याद्वारे कोराडी औष्णिक वीज प्रकल्प खापरखेड्यातील वीज प्रकल्प आणि नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नरसिंहराव उपसा जलसिंचन योजना व सत्रापूर जलसिंचन योजनेलाही या प्रकल्पातील पाणी दिले जाते. सध्या नागपूर महानगरपालिकेच्या पेंच टप्पा-४ चे काम सुरू असून, ते लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी जून महिन्यापर्यंत जलसाठा कायम राहावा, यासाठी नागपूर व मध्य प्रदेशातील जबलपूरचे जिल्हाधिकारी या प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करतात. या नियोजनांतर्गत दरवर्षी या प्रकल्पातील पाणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील रबीच्या पिकांसाठी (सिंचन) तीन ते चारवेळा पाणी सोडले जाते. पाण्याचा घटता स्तर तसेच मे व जून महिन्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता, केवळ दोनवेळा सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.