शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पेंचचा जलस्तर खालावला

By admin | Updated: January 6, 2015 01:01 IST

पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला

पाणीटंचाईचे संकेत : पाण्याच्या पातळीत आठवडाभरात २ मीटरने घटचंद्रशेखर गिरडकर - पारशिवनीपारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. ऐन हिवाळ्यात जलसाठा घटल्याने उन्हाळ्यात या शहरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे. पेंच प्रकल्पातील जलसाठ्याची प्रत्येक आठवड्यात तपासणी केली जाते. या प्रकल्पात पावसाळा संपल्यानंतर १६ मीटर जलसाठा उपलब्ध होता. मागच्या आठवड्यातील पाहणीत हा जलसाठा १७ मीटर असल्याचे आढळून आले होते. चालू आठवड्यात हा जलसाठा २ मीटरने घटला असून, तो १४ मीटर शिल्लक असल्याचे आढळून आले.पेंच प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीची लांबी २०११ मीटर असून, सांडव्याची २३६४ मीटर व उंची ४४.५० मीटर आहे. या प्रकल्पाचा डावा कालवा मौदा तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात गेला असून, हा कालवा ४८.५० कि.मी. लांब आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची व्याप्ती ही ३८८ वर्गमीटर आहे. उजवा कालवा कोराडीला आला असून, या कालव्याची लांबी ३२.८५ कि.मी. आहे. डाव्या कालव्यातून ९० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून, उजव्या कालव्यातून प्रति सेकंद १८.४ घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो. उजव्या कालव्याद्वारे कोराडी औष्णिक वीज प्रकल्प खापरखेड्यातील वीज प्रकल्प आणि नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नरसिंहराव उपसा जलसिंचन योजना व सत्रापूर जलसिंचन योजनेलाही या प्रकल्पातील पाणी दिले जाते. सध्या नागपूर महानगरपालिकेच्या पेंच टप्पा-४ चे काम सुरू असून, ते लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी जून महिन्यापर्यंत जलसाठा कायम राहावा, यासाठी नागपूर व मध्य प्रदेशातील जबलपूरचे जिल्हाधिकारी या प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करतात. या नियोजनांतर्गत दरवर्षी या प्रकल्पातील पाणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील रबीच्या पिकांसाठी (सिंचन) तीन ते चारवेळा पाणी सोडले जाते. पाण्याचा घटता स्तर तसेच मे व जून महिन्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता, केवळ दोनवेळा सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.