शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

१५३ कोटींची पाणीपट्टी थकीत

By admin | Updated: July 16, 2015 02:56 IST

शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

नागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. परंतु पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ३५ हजार ८५२ झाली असून त्यांच्याकडे १५३ कोटीची थकबाकी असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.जलप्रदाय विभागाच्या आढावा बैठकीत ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात यावी. त्या नंतरही कर न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे निर्देश जोशी यांनी दिले. ८८२३ ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ५३.४५ कोटीची थकबाकी आहे. १ लाख २७ हजार ग्राहकांकडे ९९.२६ कोटी थकीत आहे. शहरात ५० हजार अवैध नळ जोडण्या आहेत. त्या नियमित करण्यासाठी ओसीडब्ल्यूतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु याला अपेक्षित प्रतिसाद नाही. जुलै महिन्यात जेमतेम ३५०० ग्राहकांनी जोडण्या नियमित केल्या आहेत. त्यामुळे आता मनपा प्रशासन ओसीडब्ल्यूच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. या संदर्भात २२ जुलैला महापौर प्रवीण दटके यांनी बैठक आयोजित केली आहे. सर्वाधिक अवैध नळजोडण्या असलेल्या १७ प्रभागातील ३४ नगरसेवकांना बैठकीला बोलावण्यात येणार आहे. वसुली मोहीम राबविण्यासाठी त्यांची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.ही कंपनीला मदत नसून शहरातील नागरिकांना योग्य पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न आहे. ग्राहकांचा पाणीपुरठा खंडित करण्याचे अधिकार मनपाकडे आहे. त्यामुळे थकबाकी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ओसीडब्ल्यूने केली आहे. थकबाकीदारांना वॉरंट बाजवण्यात येईल. तसेच एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकासाठी अभयदान योजना राबविण्याचा विचार आहे. एनईएसएलकडे हा प्रस्ताव पाठविणार असल्याचे जोशी म्हणाले.(प्रतिनिधी)मेट्रो रेल्वे, रिलायन्सला घ्यावी लागेल अनुमतीशहरात केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जाते. यामुळे पाणीपुरवठा लाईनचे नुकसान होते. त्यामुळे यापुढे खोदकामासाठी जलप्रदाय विभागाची अनुमती घ्यावी लागेल. मेट्रो रेल्वे वा रिलायन्स अशा मोठ्या कंपन्यांनाही खोदकामासाठी अनुमती घ्यावी लागेल. परंतु शहरात सर्वाधिक खड्डे ओसीडब्ल्यूने खोदले आहे. ताबा प्रमाणपत्राचा मुद्दा उचलणार ताबा प्रमाणपत्र असल्यानंतरच फ्लॅट वा अपार्टमेंट धारकांना नळजोडणी दिली जाणार आहे. परंतु शहरात अनेक निवासी संकुलाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच लोक राहण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना नळजोडणी दिलेली नाही. यासाठी ताबा प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आॅगस्ट महिन्यात शिबिरग्राहकांच्या पाणी समस्या मार्गी लागाव्या यासाठी आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झोन निहाय तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. २१ ते ३०जुलै दरम्यान हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पाण्याची चिंता नाहीपावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात आहे. परंतु शहराच्या पाणीपुरवठ्यावर तूर्त कोणताही परिणाम होणार नाही. पाण्याच्या बाबतीत शहरातील नागरिक भाग्यशाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही शहरात टंचाई जाणवली नसल्याचे त्यांनी सांगितले.