शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
2
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
3
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
4
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
5
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
6
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
7
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
8
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
9
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
10
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
11
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
12
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
13
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
16
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
17
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
18
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
19
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
20
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5

१५३ कोटींची पाणीपट्टी थकीत

By admin | Updated: July 16, 2015 02:56 IST

शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

नागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. परंतु पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ३५ हजार ८५२ झाली असून त्यांच्याकडे १५३ कोटीची थकबाकी असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.जलप्रदाय विभागाच्या आढावा बैठकीत ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात यावी. त्या नंतरही कर न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे निर्देश जोशी यांनी दिले. ८८२३ ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ५३.४५ कोटीची थकबाकी आहे. १ लाख २७ हजार ग्राहकांकडे ९९.२६ कोटी थकीत आहे. शहरात ५० हजार अवैध नळ जोडण्या आहेत. त्या नियमित करण्यासाठी ओसीडब्ल्यूतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु याला अपेक्षित प्रतिसाद नाही. जुलै महिन्यात जेमतेम ३५०० ग्राहकांनी जोडण्या नियमित केल्या आहेत. त्यामुळे आता मनपा प्रशासन ओसीडब्ल्यूच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. या संदर्भात २२ जुलैला महापौर प्रवीण दटके यांनी बैठक आयोजित केली आहे. सर्वाधिक अवैध नळजोडण्या असलेल्या १७ प्रभागातील ३४ नगरसेवकांना बैठकीला बोलावण्यात येणार आहे. वसुली मोहीम राबविण्यासाठी त्यांची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.ही कंपनीला मदत नसून शहरातील नागरिकांना योग्य पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न आहे. ग्राहकांचा पाणीपुरठा खंडित करण्याचे अधिकार मनपाकडे आहे. त्यामुळे थकबाकी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ओसीडब्ल्यूने केली आहे. थकबाकीदारांना वॉरंट बाजवण्यात येईल. तसेच एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकासाठी अभयदान योजना राबविण्याचा विचार आहे. एनईएसएलकडे हा प्रस्ताव पाठविणार असल्याचे जोशी म्हणाले.(प्रतिनिधी)मेट्रो रेल्वे, रिलायन्सला घ्यावी लागेल अनुमतीशहरात केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जाते. यामुळे पाणीपुरवठा लाईनचे नुकसान होते. त्यामुळे यापुढे खोदकामासाठी जलप्रदाय विभागाची अनुमती घ्यावी लागेल. मेट्रो रेल्वे वा रिलायन्स अशा मोठ्या कंपन्यांनाही खोदकामासाठी अनुमती घ्यावी लागेल. परंतु शहरात सर्वाधिक खड्डे ओसीडब्ल्यूने खोदले आहे. ताबा प्रमाणपत्राचा मुद्दा उचलणार ताबा प्रमाणपत्र असल्यानंतरच फ्लॅट वा अपार्टमेंट धारकांना नळजोडणी दिली जाणार आहे. परंतु शहरात अनेक निवासी संकुलाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच लोक राहण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना नळजोडणी दिलेली नाही. यासाठी ताबा प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आॅगस्ट महिन्यात शिबिरग्राहकांच्या पाणी समस्या मार्गी लागाव्या यासाठी आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झोन निहाय तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. २१ ते ३०जुलै दरम्यान हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पाण्याची चिंता नाहीपावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात आहे. परंतु शहराच्या पाणीपुरवठ्यावर तूर्त कोणताही परिणाम होणार नाही. पाण्याच्या बाबतीत शहरातील नागरिक भाग्यशाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही शहरात टंचाई जाणवली नसल्याचे त्यांनी सांगितले.