शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एकात्मिक पाणलोटच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:03 IST

Nagpur News खेड्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्यात २००९ पासून राबविण्यात येत असलेला एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम मार्च महिन्यापासून बंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकृषी आयुक्तांनी बंद केला कार्यक्रम केंद्राकडून निधी न आल्याचे दिले कारण

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खेड्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्यात २००९ पासून राबविण्यात येत असलेला एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम मार्च महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून नव्या वर्षासाठी निधी मंजूर केला नसल्याने कार्यक्रम बंद करण्यात येत असल्याचे कृषी आयुक्तांकडून पाणलोट व्यवस्थापनाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे व्हावी, यासह शेतकरी, महिला गट, गावपातळीवरील व्यावसायिक यांना मदत व्हावी, यासाठी २००९-१० वर्षापासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत होता. या कार्यक्रमातून माथा ते पायथा उपक्रमात जल, जमीन जंगल, जनता, जनावर यांच्या संरक्षणासाठी काम केली जात होते. त्यात ५६ टक्के निधीतून पाणलोटाची दहा प्रकारची कामे केली जायची व १९ टक्के निधीतून उपजीविकांतर्गत योजनेत समाविष्ट गावातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक बाबी, महिला बचत गटासाठी २५ हजारांचे फिरते भांडवल, व्यवसाय सुरू करण्यासाठी भूमिहिनांना दहा हजारांचे अठरा महिन्यांसाठी फिरते भांडवल, असे उपक्रम राबविले जात होते. केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के निधी देत होते. या कार्यक्रमाच्या आतापर्यंत ६ बॅचेस झाल्या असून, जवळपास ४५०० कंत्राटातील कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात काम केले आहे. सध्या या कार्यक्रमात राज्यात ५० कर्मचारी कार्यरत आहे. पण, मार्च महिन्यापासून कार्यक्रम बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपल्या आहेत.

मुदतीपूर्वीच संपला कार्यक्रम

या कार्यक्रमात विभागस्तरावर विभागीय नियंत्रण अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा प्रशिक्षण अधिकारी, दोन डाटा एन्ट्री ऑपरेटर, एक शिपाई, तालुकास्तरावर समूह संघटक, कृषीतज्ज्ञ, उपजीविकातज्ज्ञ असे तीन जण काम करीत होते. दरवर्षी ११ महिन्यांचा करार होत असे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार होता. परंतु यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला नाही. त्यामुळे मार्चपासून हा कार्यक्रम बंद करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- कोरोनाच्या काळात कार्यक्रम बंद केल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कृषीच्या अन्य उपक्रमांत व नव्याने येत असलेल्या जलसंधारणाशी संबंधित जलजीवन मिशन कार्यक्रमात सामावून घेण्याची गरज आहे.

-प्रशांत एल. पवार, विदर्भ प्रांतप्रमुख, महा. राज्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम कर्मचारी संघटना

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प