शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

नागपुरातील तलावांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 10:04 IST

शहरातील तलावात सांडपाणी सोडले जाते. यामुळे तलावात ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर धोक्यात आले आहे. परंतु फुटाळा व नाईक तलावांचा लवकरच कायापालट होणार आहे.

ठळक मुद्देफुटाळा व नाईक तलावाचा होतोय कायापालट तलाव स्वच्छतेसाठी बोटींचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तलावात सांडपाणी सोडले जाते. यामुळे तलावात ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर धोक्यात आले आहे. परंतु फुटाळा व नाईक तलावांचा लवकरच कायापालट होणार आहे. तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावातील कचरा व वनस्पती बोटीच्या साह्याने बाहेर काढली जाणार आहे. निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे.पर्यावरण संस्थांनी तलावाचे निरीक्षण केले आहे. यात फुटाळा व नाईक तलावात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. याचा विचार करता नीरीने फुटाळा तलाव संवर्धनाबाबतचा अहवाल महापालिकेला दिला आहे. यात तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी रोखून पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.तसेच तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे, यासाठी बोटीच्या साह्याने कचरा बाहेर काढला जाणार आहे. यावर १.५० कोटींचा खर्च येणार आहे. तसेच १.५० कोटीची यंत्रसामुग्री खरेदी केली जाणार आहे. तसेच लवकरच नाईक तलाव संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. तलाव संवर्धनासाठी हुडको ७५ लाखांचा निधी उपलब्ध करणार आहे. तसेच महापालिका ७५ लाख खर्च करून यासाठी यंत्रसामुग्रीची खरेदी महापालिका करणार आहे. फुटाळा तलाव संवर्धनाचा नीरीने प्रस्ताव दिल्याला आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुजोरा दिला आहे.

पाच बोटी खरेदी करणारफुटाळा, अंबाझरी, गांधीसागर, सोनेगाव, सक्करदरा, लेंडी तलाव, नाईक तलाव, गोरेवाडा आणि पांढराबोडी तलाव यासह सर्वच तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी रोखून तलावातील कचरा व विषारी वनस्पती बाहेर काढण्यासाठी महापालिका पाच बोटी खरेदी करणार आहे.लोकसहभागातून सक्करदरा तलाव स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या धर्तीवर शहरातील इतर तलाव स्वच्छ क रण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणारतलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्याप्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, येथे मोठ्या मूर्ती विसर्जनाला निर्बंध घालण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी जनजागृती केली जाणार आहे. तसेच फुटाळ्यातील बंद पडलेले कारंजे सुरू केले जाणार आहे. बोटींच्या साहाय्याने तलावातील पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भविष्यात फुटाळा तलाव हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.

टॅग्स :Waterपाणी