शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपुरातील तलावांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 10:04 IST

शहरातील तलावात सांडपाणी सोडले जाते. यामुळे तलावात ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर धोक्यात आले आहे. परंतु फुटाळा व नाईक तलावांचा लवकरच कायापालट होणार आहे.

ठळक मुद्देफुटाळा व नाईक तलावाचा होतोय कायापालट तलाव स्वच्छतेसाठी बोटींचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तलावात सांडपाणी सोडले जाते. यामुळे तलावात ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर धोक्यात आले आहे. परंतु फुटाळा व नाईक तलावांचा लवकरच कायापालट होणार आहे. तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावातील कचरा व वनस्पती बोटीच्या साह्याने बाहेर काढली जाणार आहे. निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे.पर्यावरण संस्थांनी तलावाचे निरीक्षण केले आहे. यात फुटाळा व नाईक तलावात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. याचा विचार करता नीरीने फुटाळा तलाव संवर्धनाबाबतचा अहवाल महापालिकेला दिला आहे. यात तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी रोखून पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.तसेच तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे, यासाठी बोटीच्या साह्याने कचरा बाहेर काढला जाणार आहे. यावर १.५० कोटींचा खर्च येणार आहे. तसेच १.५० कोटीची यंत्रसामुग्री खरेदी केली जाणार आहे. तसेच लवकरच नाईक तलाव संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. तलाव संवर्धनासाठी हुडको ७५ लाखांचा निधी उपलब्ध करणार आहे. तसेच महापालिका ७५ लाख खर्च करून यासाठी यंत्रसामुग्रीची खरेदी महापालिका करणार आहे. फुटाळा तलाव संवर्धनाचा नीरीने प्रस्ताव दिल्याला आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुजोरा दिला आहे.

पाच बोटी खरेदी करणारफुटाळा, अंबाझरी, गांधीसागर, सोनेगाव, सक्करदरा, लेंडी तलाव, नाईक तलाव, गोरेवाडा आणि पांढराबोडी तलाव यासह सर्वच तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी रोखून तलावातील कचरा व विषारी वनस्पती बाहेर काढण्यासाठी महापालिका पाच बोटी खरेदी करणार आहे.लोकसहभागातून सक्करदरा तलाव स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या धर्तीवर शहरातील इतर तलाव स्वच्छ क रण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणारतलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्याप्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, येथे मोठ्या मूर्ती विसर्जनाला निर्बंध घालण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी जनजागृती केली जाणार आहे. तसेच फुटाळ्यातील बंद पडलेले कारंजे सुरू केले जाणार आहे. बोटींच्या साहाय्याने तलावातील पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भविष्यात फुटाळा तलाव हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.

टॅग्स :Waterपाणी