शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जीवावर बेतू शकते अक्षम्य दुर्लक्ष

By admin | Updated: August 25, 2016 02:24 IST

स्वच्छता, दुरुस्ती व देखरेखीच्या बाबतीत मनपाची उदासीनता नागरिकांच्या जीवावर बेतू शकते अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे.

रहाटे कॉलनीत सुविधांचा अभाव : रस्ते बेहाल,चेंबरचे झाकण गायब, सर्वत्र पसरली घाणनागपूर : स्वच्छता, दुरुस्ती व देखरेखीच्या बाबतीत मनपाची उदासीनता नागरिकांच्या जीवावर बेतू शकते अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. यामुळे रस्त्यावर चालणारे पादचारी व वाहनधारकही दहशतीत आले आहेत. परंतु हे चित्र बदलण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. परिणामी कालपर्यंत अतिशय क्षुल्लक भासणारी समस्या आता विक्राळ रूप धारण करीत आहे. समस्यांच्या या विळख्यात आता रहाटे कॉलनीही आली आहे.लोकमतची चमू या परिसरात पोहोचली तेव्हा वरून सर्व सुविधांनी सज्ज भासणाऱ्या या कॉलनीचे भयाण वास्तव पुढे आले. नागरी सुविधांच्या संदर्भात मनपाची उदासीनता येथे स्पष्ट नजरेस पडत होती. शहरातील पॉश कॉलनींमध्ये जिची गणना होते त्या रहाटे कॉलनीमध्ये पादचाऱ्यांसोबतच वाहनचालकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या परिसरात एकही रस्ता असा नाही जिथे खड्डे नाहीत. येथे जी जंगल-झुडपे वाढली आहेत त्यात कचऱ्याचे ढिग जमा झाले आहेत. यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना आजारी पडण्याची भीती कायम सतावत असते. समस्यांचे ग्रहण येथेच सुटत नाही. सध्या पावसाळा असल्याने फुटपाथवर झुडपे व गवताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तर फुटपाथ नजरेसच पडत नाही. फुटपाथवरील चेंबरचे झाकण गायब आहेत. लोकमतच्या चमूला येथे काही असेही चेंबर दिसले ज्यावर झाकण लावण्याऐवजी त्यावर मोठे दगड ठेवून काम भागवण्यात आले आहे. रस्त्याच्या शेजारील एका चेंबरचे झाकण जीर्ण झाले आहे. ज्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याशेजारील झाडांच्या फांद्या जमिनीवर झुलत असतात. आधी पावसाळ्यात या फांद्यांची छटाई व्हायची पण यंदा ती अद्याप झाली नाही. या संदर्भात मनपा प्रशासन व नगरसेवकांकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु अद्याप कुणीच दखल घेतली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)समस्या लवकरच दूर होतीलया समस्यांबाबत विचारणा करण्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक संदीप जोशी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, या प्रभागातील समस्यांचे नेहमीच प्रमुखतेने निराकरण केले जाते. हे खरे आहे की फुटपाथची स्थिती योग्य नाही. झाडाच्या फांद्या वाकल्या आहेत. परंतु या समस्या दूर करण्यासाठी येत्या दोन दिवसात ठोस पावले उचलली जातील.