शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वासनकरच्या फसवणुकीची चौकशी ईडीतर्फे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:47 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.निवेदनात म्हटले आहे की, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.चे प्रशांत जयदेव वासनकर आणि एजंटांनी २०१४ मध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण पाठविण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत कोणतीही चौकशी वा संपत्ती जप्त केलेली नाही. केवळ गुन्हेगाराला बाहेर सोडण्यासाठी मदत केली. हे प्रकरण न्यायालयात असून त्यावर कुठलाही ठोस निर्णय होत नसल्यामुळे हे प्रकरण ईडीकडे सोपविल्यास पैसे परत मिळण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.प्रशांत वासनकरने गुंतवणूकदारांच्या एका बैठकीत आॅगस्ट २०१४ मध्ये पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याने स्वत:ला अटक करून घेतली. चौकशीदरम्यान प्रत्येकवेळी आर्थिक गुन्हे शाखेतून उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकाची बदली झाली आहे. या प्रकरणी एमपीआयडी कोर्टात सुनावणी सुरू होती. पण न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आर्थिक गुन्हे शाखेला धारेवर धरून आरोपींना अटक करण्यास सांगितले होते. आरोपींना अटक करण्याचा आदेश जाहीर झाला आणि काही दिवसांत सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली. त्यानंतर न्यायाधीश आझमी व आता न्यायाधीश शेखर मुनघाटे या प्रकरणी सुनावणी करीत आहेत. पण त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला विचारणा केलेली नाही.वासनकर समूह आणि एजंटांविरोधात जवळपास ९०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी ३५० कोटींची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा असूनही गुन्हे शाखेकडून कुठलीही चौकशी न करता प्रकरण बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे ईडीतर्फे चौकशी केल्यास गुुंतवणूकदारांना न्याय मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी सुधीर दुरगकर, मंदा लांजेवार, शामकांत सुकळीकर, विवेक करमरकर, विलास मंगळुरकर, यास्मीन इमाम, रबींद्र रॉय, अशोक खोरगडे, विजय नाईक, अशोक पशीने, एस.एम. तामडू, अनुप पशीने, दीपाली बनसोड, राजेश गोमकाळे, नितीन देशमुख, संजय गावंडे, प्रकाश वासनिक, दिलीप काळबांडे, सुनील आमसोडे, पूजा काळबांडे, कपले, के.जी. नाईक आदी गुंतवणूकदार उपस्थित होते.

 

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजी