शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

वासनकरच्या फसवणुकीची चौकशी ईडीतर्फे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:47 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.निवेदनात म्हटले आहे की, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.चे प्रशांत जयदेव वासनकर आणि एजंटांनी २०१४ मध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण पाठविण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत कोणतीही चौकशी वा संपत्ती जप्त केलेली नाही. केवळ गुन्हेगाराला बाहेर सोडण्यासाठी मदत केली. हे प्रकरण न्यायालयात असून त्यावर कुठलाही ठोस निर्णय होत नसल्यामुळे हे प्रकरण ईडीकडे सोपविल्यास पैसे परत मिळण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.प्रशांत वासनकरने गुंतवणूकदारांच्या एका बैठकीत आॅगस्ट २०१४ मध्ये पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याने स्वत:ला अटक करून घेतली. चौकशीदरम्यान प्रत्येकवेळी आर्थिक गुन्हे शाखेतून उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकाची बदली झाली आहे. या प्रकरणी एमपीआयडी कोर्टात सुनावणी सुरू होती. पण न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आर्थिक गुन्हे शाखेला धारेवर धरून आरोपींना अटक करण्यास सांगितले होते. आरोपींना अटक करण्याचा आदेश जाहीर झाला आणि काही दिवसांत सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली. त्यानंतर न्यायाधीश आझमी व आता न्यायाधीश शेखर मुनघाटे या प्रकरणी सुनावणी करीत आहेत. पण त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला विचारणा केलेली नाही.वासनकर समूह आणि एजंटांविरोधात जवळपास ९०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी ३५० कोटींची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा असूनही गुन्हे शाखेकडून कुठलीही चौकशी न करता प्रकरण बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे ईडीतर्फे चौकशी केल्यास गुुंतवणूकदारांना न्याय मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी सुधीर दुरगकर, मंदा लांजेवार, शामकांत सुकळीकर, विवेक करमरकर, विलास मंगळुरकर, यास्मीन इमाम, रबींद्र रॉय, अशोक खोरगडे, विजय नाईक, अशोक पशीने, एस.एम. तामडू, अनुप पशीने, दीपाली बनसोड, राजेश गोमकाळे, नितीन देशमुख, संजय गावंडे, प्रकाश वासनिक, दिलीप काळबांडे, सुनील आमसोडे, पूजा काळबांडे, कपले, के.जी. नाईक आदी गुंतवणूकदार उपस्थित होते.

 

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजी