शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वासनकरच्या फसवणुकीची चौकशी ईडीतर्फे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:47 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिले आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.निवेदनात म्हटले आहे की, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.चे प्रशांत जयदेव वासनकर आणि एजंटांनी २०१४ मध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण पाठविण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत कोणतीही चौकशी वा संपत्ती जप्त केलेली नाही. केवळ गुन्हेगाराला बाहेर सोडण्यासाठी मदत केली. हे प्रकरण न्यायालयात असून त्यावर कुठलाही ठोस निर्णय होत नसल्यामुळे हे प्रकरण ईडीकडे सोपविल्यास पैसे परत मिळण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.प्रशांत वासनकरने गुंतवणूकदारांच्या एका बैठकीत आॅगस्ट २०१४ मध्ये पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याने स्वत:ला अटक करून घेतली. चौकशीदरम्यान प्रत्येकवेळी आर्थिक गुन्हे शाखेतून उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकाची बदली झाली आहे. या प्रकरणी एमपीआयडी कोर्टात सुनावणी सुरू होती. पण न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आर्थिक गुन्हे शाखेला धारेवर धरून आरोपींना अटक करण्यास सांगितले होते. आरोपींना अटक करण्याचा आदेश जाहीर झाला आणि काही दिवसांत सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली. त्यानंतर न्यायाधीश आझमी व आता न्यायाधीश शेखर मुनघाटे या प्रकरणी सुनावणी करीत आहेत. पण त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला विचारणा केलेली नाही.वासनकर समूह आणि एजंटांविरोधात जवळपास ९०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी ३५० कोटींची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा असूनही गुन्हे शाखेकडून कुठलीही चौकशी न करता प्रकरण बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे ईडीतर्फे चौकशी केल्यास गुुंतवणूकदारांना न्याय मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी सुधीर दुरगकर, मंदा लांजेवार, शामकांत सुकळीकर, विवेक करमरकर, विलास मंगळुरकर, यास्मीन इमाम, रबींद्र रॉय, अशोक खोरगडे, विजय नाईक, अशोक पशीने, एस.एम. तामडू, अनुप पशीने, दीपाली बनसोड, राजेश गोमकाळे, नितीन देशमुख, संजय गावंडे, प्रकाश वासनिक, दिलीप काळबांडे, सुनील आमसोडे, पूजा काळबांडे, कपले, के.जी. नाईक आदी गुंतवणूकदार उपस्थित होते.

 

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजी