शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पांढराबोडीत खुनी संघर्ष

By admin | Updated: September 13, 2015 02:35 IST

पांढराबोडीतील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता झालेल्या खुनी संघर्षात दोन जण गंभीर जखमी झाले तर, अनेकांना जबर जखमा झाल्या.

नागपूर : पांढराबोडीतील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता झालेल्या खुनी संघर्षात दोन जण गंभीर जखमी झाले तर, अनेकांना जबर जखमा झाल्या. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पांढराबोडीतील गुंडांच्या एका टोळीने शुक्रवारी दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला होता. या भागातील अवैध दारू विक्रेता या कार्यक्रमाचा मुख्य प्रायोजक होता. त्यात प्रतिस्पर्धी गटातील गुंडही आले होते. त्यामुळे एक दुसऱ्याला टोमणे मारण्याचा प्रकार सुरू झाला. तो वाढतच गेला. दोन्ही गटाने आपल्या गुंडांची जमवाजमव करण्यासोबतच तलवारी, चाकू, रॉड, लाठ्याही आणल्या. त्यानंतर पांढराबोडीतील छोट्या मैदानाजवळ सेवक मसराम, बद्दी रामटेके तसेच भुऱ्या बनोदे, रोहित चव्हाण यांनी आपापल्या गुंडांसोबत एकमेकांवर हल्ला चढवला. सिनेमातील टोळीयुद्धासारखा प्रकारपांढराबोडीत खुनी संघर्षनागपूर : आरोपी सेवक मसराम, बद्दी ऊर्फ राकेश रामटेके, अमित ऊर्फ गम्या ठोसर, सतीश चन्ने, रोशन शेंदरे, गोलट्या ऊर्फ नरेश मसराम, धीरज बाबोर्डे आणि त्याच्या साथीदारांनी भुऱ्या ऊर्फ बादशहा ऊर्फ संजय कंदई बनोदे (वय ३६, रा. पांढराबोडी) याच्या डोक्यावर तसेच छातीवर तलवारीचे घाव घातल्याने तो गंभीर जखमी झाला. भुऱ्याचे चार ते पाच साथीदारही जबर जखमी झाले. याच वेळी भुऱ्या आणि रोहित चव्हाण, आशिष डोंगरे, दिनेश इंगोले, चंदू मानेराव, अक्षय बत्तुलवार, भूषण चोटीलवाल तसेच त्याच्या साथीदारांनी सेवक आणि बद्दीच्या साथीदारांवर हल्ला चढवल्याने राकेश महादेव रामटेके (वय ३२, रा. जयनगर, पांढराबोडी) गंभीर जखमी झाला. तर, भुऱ्याचे पाच साथीदार गंभीर जखमी झाले. सिनेमातील टोळीयुद्धासारखा हा प्रकार तब्बल २० मिनिटे सुरू होता. त्यामुळे घटनास्थळ परिसरात प्रचंड दहशत आणि तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, हा थरार सुरू असताना काही अंतरावर पोलीस उभे होते. त्यांनी नंतर मोठा ताफा बोलवून घेतला तोपर्यंत आरोपी पळून गेले. पोलिसांनी भुऱ्याच्या तक्रारीवरून सेवक तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध तर राकेशच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी भुऱ्या तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले. ‘गेम प्लान’ची तयारीपांढराबोडीत बहुतांश रहिवासी गरीब आहेत. दिवसभर कबाडकष्ट करून दोन वेळेच्या जेवणाची ते कशीबशी व्यवस्था करतात. या भागात गुंडांच्या तीन ते चार टोळ्या असून, दारू, गांजा, जुगार या अवैध धंद्यांसोबतच ते खंडणी वसुलीही करतात. वर्चस्व निर्माण करण्यासाठी या गुंडांच्या टोळ्यांमध्ये नेहमीच हाणामाऱ्या, हल्ले प्रतिहल्ले सुरू असतात. त्यामुळे या परिसरातील गोरगरीब, सामान्य नागरिक नेहमीच दहशतीत असतात. शुक्रवारच्या घटनेनंतर आपल्या विरोधात बयानबाजी होऊ नये म्हणून, गुंडांनी या परिसरातील नागरिकांना धमकावणे सुरू केले आहे. या हाणामारीतील कुख्यात सेवक आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या वर्षी बाल्या उके याची सलूनमध्ये निर्घृण हत्या केली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला. आता त्याने पुन्हा गुंडगिरी सुरू केली आहे. तर, त्याला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी गुंडही अनेक दिवसांपासून ‘गेम प्लान’ करीत आहेत. त्यामुळे या भागात कोणत्याही दिवशी मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.