शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

वंदनाने कापली नस, अंकिता झाल्या वेड्या

By admin | Updated: December 13, 2014 03:01 IST

जीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले.

दयानंद पाईकराव नागपूरजीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले. यातील नाशिकच्या वंदना आहेर हिने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला तर गोडखा ता. घनसावंगी जिल्हा जालनाच्या अंकिता ढेरे (६०) यांना हा धक्काच असह्य झाल्यामुळे त्या वेड्यासारख्या वागत होत्या. एक नव्हे तर तब्बल आठ हजार कुटुंबं या कंपनीमुळे हादरलेली आहेत.केबीसी कंपनीने दोन वर्षात तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखविल्यामुळे अनेक ठेवीदार या कंपनीकडे आकर्षित झाले. त्यांनी आपल्या जीवनाची कमाई या कंपनीत जमा केली. संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण गाशा गुंडाळून पळून गेल्याचे कळताच आठ हजार कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच घसरली. नाशिकच्या वंदना बंडू आहेर (३२) यांनी तर कंपनीत २५ लाखाची गुंतवणूक केली होती. त्यांचे पती सुतारकाम करतात आणि त्या मजुरी करतात. त्यांनी जीवनभराची कमाई आणि अंगावरील सोन्याचे दागिने मोडून कंपनीत पैसे भरले. कंपनीने गाशा गुंडाळल्याचे कळताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. घरात कुणी नसताना त्यांनी आपल्या डाव्या हाताची नस कापली. बराच रक्तस्राव झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. अगदी वेळेवर त्यांची जाऊबाई आल्यामुळे त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. परंतु मोठा मुलगा अमितचे शिक्षण बारावीनंतर बंद झाल्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. पैसे गेल्यामुळे घरात सर्वांच्या मनावर मानसिक ताण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सारख्याच अंकिताबाई नायबराव ढेरे (६०) रा. गोडखा ता. घनसावंगी जि. जालना या महिलेने सुद्धा पाच लाखाची रक्कम कंपनीत गुंतवली होती. रक्कम घेणारी कंपनी फसवी असल्याचे समजल्यानंतर त्यांचा मनावरील ताबा सुटून त्या वेड्यासारख्या वागत होत्या. त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार दिल्यामुळे त्या कशाबशा सावरल्या आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या मनावर ताण असल्यामुळे त्यांना स्पष्टपणे बोलताही येत नव्हते. वंदना आणि अंकिताबाई यांच्यासारख्या अनेकांचे संसार केबीसीच्या लाटेत उघड्यावर आले आहेत. हिवाळी अधिवेशनात शासन मागण्यांची दखल घेऊन जीवनाच्या उर्वरित आयुष्यात कामी येणारी रक्कम देईल या आशेपोटी सर्वजण मोर्चात सामील झाले आहेत.