शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

वंदनाने कापली नस, अंकिता झाल्या वेड्या

By admin | Updated: December 13, 2014 03:01 IST

जीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले.

दयानंद पाईकराव नागपूरजीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले. यातील नाशिकच्या वंदना आहेर हिने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला तर गोडखा ता. घनसावंगी जिल्हा जालनाच्या अंकिता ढेरे (६०) यांना हा धक्काच असह्य झाल्यामुळे त्या वेड्यासारख्या वागत होत्या. एक नव्हे तर तब्बल आठ हजार कुटुंबं या कंपनीमुळे हादरलेली आहेत.केबीसी कंपनीने दोन वर्षात तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखविल्यामुळे अनेक ठेवीदार या कंपनीकडे आकर्षित झाले. त्यांनी आपल्या जीवनाची कमाई या कंपनीत जमा केली. संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण गाशा गुंडाळून पळून गेल्याचे कळताच आठ हजार कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच घसरली. नाशिकच्या वंदना बंडू आहेर (३२) यांनी तर कंपनीत २५ लाखाची गुंतवणूक केली होती. त्यांचे पती सुतारकाम करतात आणि त्या मजुरी करतात. त्यांनी जीवनभराची कमाई आणि अंगावरील सोन्याचे दागिने मोडून कंपनीत पैसे भरले. कंपनीने गाशा गुंडाळल्याचे कळताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. घरात कुणी नसताना त्यांनी आपल्या डाव्या हाताची नस कापली. बराच रक्तस्राव झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. अगदी वेळेवर त्यांची जाऊबाई आल्यामुळे त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. परंतु मोठा मुलगा अमितचे शिक्षण बारावीनंतर बंद झाल्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. पैसे गेल्यामुळे घरात सर्वांच्या मनावर मानसिक ताण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सारख्याच अंकिताबाई नायबराव ढेरे (६०) रा. गोडखा ता. घनसावंगी जि. जालना या महिलेने सुद्धा पाच लाखाची रक्कम कंपनीत गुंतवली होती. रक्कम घेणारी कंपनी फसवी असल्याचे समजल्यानंतर त्यांचा मनावरील ताबा सुटून त्या वेड्यासारख्या वागत होत्या. त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार दिल्यामुळे त्या कशाबशा सावरल्या आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या मनावर ताण असल्यामुळे त्यांना स्पष्टपणे बोलताही येत नव्हते. वंदना आणि अंकिताबाई यांच्यासारख्या अनेकांचे संसार केबीसीच्या लाटेत उघड्यावर आले आहेत. हिवाळी अधिवेशनात शासन मागण्यांची दखल घेऊन जीवनाच्या उर्वरित आयुष्यात कामी येणारी रक्कम देईल या आशेपोटी सर्वजण मोर्चात सामील झाले आहेत.