शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

रिटायर्ड हवेत की फ्रेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 08:55 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्त्वावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला. या निर्णयामागील तर्क आणि न्यायसंगती याची चर्चा सुरू आहे.

बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक, नागपूर 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्त्वावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला. या निर्णयामागील तर्क आणि न्यायसंगती याची चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या स्थितीची केलेली ही संक्षिप्त चिकित्सा...

शिक्षण हक्क कायदा येऊन फक्त १३ वर्षे झाली. ६ ते १४ वयोगटातील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांचा शिक्षण हक्क आहे. हा हक्क मुलांना उपलब्ध करून देणे पालक म्हणून शासनाचे कर्तव्य ठरते. राज्यातील शाळांना आज शिक्षकांची मोठी गरज आहे. गेली अनेक वर्षे भरती न झाल्याने शाळांना शिक्षकच उपलब्ध झाले नाहीत. सरकारी व खासगी अनुदानित शाळांतही शिक्षक टंचाई आहे. नोकरीच्या अपेक्षेने हजारो तरुणांनी टीईटी, सीईटी पास केली. त्यापैकी अनेकांची वयोमर्यादा भरतीच्या प्रतीक्षेतच पार झाली.

शिक्षण विभागात अजूनही शिक्षणसेवक योजना लागू आहे. मात्र, नव्या दमाचे शिक्षक देण्याऐवजी सेवानिवृत्तांना संधी देणे हा निर्णय कितपत योग्य आहे, याचा विचार करावा लागेल. तलाठीपदाच्या ३६ हजार जागांसाठी साडेअकरा लाख अर्ज आले. यावरून बेरोजगारीचे भीषण वास्तव नजरेत येते. शिक्षक पात्रता मिळवलेल्या बेरोजगार तरुणांचीही संख्या खूप मोठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सेवानिवृत्तांना त्यांचे निवृत्तीपश्चातचे जीवन शांतपणे व्यतीत करू द्यावे आणि नव्या दमाचे शिक्षक आणावेत, असा एक विचारप्रवाह आहे. शिक्षणावर दरडोई उत्पन्नाच्या ६ टक्के निधी खर्च करण्याचा आदर्श केवळ अहवालाच्या नस्तीत बंद करून चालणार नाही. नव्याने आलेल्या शिक्षण धोरणात शिक्षककेंद्रित धोरणांची योजना करून त्या प्रत्यक्षात आणण्याचा विचार मांडला आहे.

राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची बाबही नुकतीच समोर आली आहे. शासकीय शिक्षणाची ही दुरवस्था गांभीर्याने घेतली पाहिजे. शिक्षक आणि मुलांवर विविध उपक्रमांचा भडीमार व एका उपक्रमाचे फलित कळण्यापूर्वीच दुसरा उपक्रम चालू करणे, या व अशा इतर अनेक कारणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचे निरीक्षण वारंवार तज्ज्ञांकडून मांडले जाते. शिक्षकाला शाळेत शिकविण्याबरोबर किती कामे आहेत याची यादी पाहिली तर आश्चर्य वाटेल. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या झपाट्याने कमी होण्यावर होत आहे. आधीच शिक्षक कमी आणि त्यात हे प्रयोग. गुणवत्ता घसरण्यासाठी मग सरसकट शिक्षकांनाच दोषी ठरवले जाते. ते कितपत योग्य आहे, याचा सांगोपांग विचार झाला पाहिजे.