शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रिटायर्ड हवेत की फ्रेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 08:55 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्त्वावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला. या निर्णयामागील तर्क आणि न्यायसंगती याची चर्चा सुरू आहे.

बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक, नागपूर 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्त्वावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला. या निर्णयामागील तर्क आणि न्यायसंगती याची चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या स्थितीची केलेली ही संक्षिप्त चिकित्सा...

शिक्षण हक्क कायदा येऊन फक्त १३ वर्षे झाली. ६ ते १४ वयोगटातील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांचा शिक्षण हक्क आहे. हा हक्क मुलांना उपलब्ध करून देणे पालक म्हणून शासनाचे कर्तव्य ठरते. राज्यातील शाळांना आज शिक्षकांची मोठी गरज आहे. गेली अनेक वर्षे भरती न झाल्याने शाळांना शिक्षकच उपलब्ध झाले नाहीत. सरकारी व खासगी अनुदानित शाळांतही शिक्षक टंचाई आहे. नोकरीच्या अपेक्षेने हजारो तरुणांनी टीईटी, सीईटी पास केली. त्यापैकी अनेकांची वयोमर्यादा भरतीच्या प्रतीक्षेतच पार झाली.

शिक्षण विभागात अजूनही शिक्षणसेवक योजना लागू आहे. मात्र, नव्या दमाचे शिक्षक देण्याऐवजी सेवानिवृत्तांना संधी देणे हा निर्णय कितपत योग्य आहे, याचा विचार करावा लागेल. तलाठीपदाच्या ३६ हजार जागांसाठी साडेअकरा लाख अर्ज आले. यावरून बेरोजगारीचे भीषण वास्तव नजरेत येते. शिक्षक पात्रता मिळवलेल्या बेरोजगार तरुणांचीही संख्या खूप मोठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सेवानिवृत्तांना त्यांचे निवृत्तीपश्चातचे जीवन शांतपणे व्यतीत करू द्यावे आणि नव्या दमाचे शिक्षक आणावेत, असा एक विचारप्रवाह आहे. शिक्षणावर दरडोई उत्पन्नाच्या ६ टक्के निधी खर्च करण्याचा आदर्श केवळ अहवालाच्या नस्तीत बंद करून चालणार नाही. नव्याने आलेल्या शिक्षण धोरणात शिक्षककेंद्रित धोरणांची योजना करून त्या प्रत्यक्षात आणण्याचा विचार मांडला आहे.

राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची बाबही नुकतीच समोर आली आहे. शासकीय शिक्षणाची ही दुरवस्था गांभीर्याने घेतली पाहिजे. शिक्षक आणि मुलांवर विविध उपक्रमांचा भडीमार व एका उपक्रमाचे फलित कळण्यापूर्वीच दुसरा उपक्रम चालू करणे, या व अशा इतर अनेक कारणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचे निरीक्षण वारंवार तज्ज्ञांकडून मांडले जाते. शिक्षकाला शाळेत शिकविण्याबरोबर किती कामे आहेत याची यादी पाहिली तर आश्चर्य वाटेल. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या झपाट्याने कमी होण्यावर होत आहे. आधीच शिक्षक कमी आणि त्यात हे प्रयोग. गुणवत्ता घसरण्यासाठी मग सरसकट शिक्षकांनाच दोषी ठरवले जाते. ते कितपत योग्य आहे, याचा सांगोपांग विचार झाला पाहिजे.