शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

भटकंती; मोहीम फत्ते... किल्ले राजगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:25 IST

एखाद्या इतिहासप्रेमीसाठी याहून अधिक सुखद भावना ती कुठली असेल...! राजगडाचा अगदी एकेक कानाकोपरा पाहायला दोन दिवससुद्धा अपुरे पडतील.

श्रिया सोमणनागपूर: बरोब्बर ६ वाजता निघायचं ठरवलं त्यामुळे ६:३० पर्यंत आमच्या मोहिमेची सुरुवात झाली. आता हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी सर करायची म्हणजे तयारीसुद्धा त्या तोडीची हवी. कामगिरी जोखमीची त्यामुळे तेवढा मावळेसुद्धा जमवायला हवे. तयारी तर झाली, आवश्यक ती शस्त्र, अवजारे, घोडे व दाणापाणी (मोबाईल, पॉवर बँक, कॅमेरा, स्कार्फ, बिस्कीटे आदी वस्तू) सगळं कसं एकदम अप टू डेट. महिनाभर अनेक जणांना घेऊन मोहिमेची आखणी करूनही प्रत्यक्षात मात्र तीनच मावळे जमले. पण 'कुणावाचूनही अडत नाही, आता श्वास घेऊ तो कामगिरी फत्ते करूनच', सरदारांनी (डॉ. स्नेहा चितळे) सिंहगर्जना केली आणि हर हर महादेव म्हणत भल्यापहाटे आम्ही गडाकडे कूच केले.हा हा म्हणता म्हणता उगवत्या सूर्याबरोबरच गेली अनेक शतकं अढळपणे उभ्या असलेल्या छत्रपतींच्या राजगडाचे प्रथमदर्शन झाले. गडाच्या आश्रयात वसलेल्या पाली गावात न्याहारीसाठी धारोष्ण नीरसं दूध मिळणं यापेक्षा अधिक मोठे सुख ते कोणते. राजगड समुद्रसपाटीपासून सुमारे १४०० मी. उंच आहे आणि पायथ्याशी वसलेल्या पाली गावातून पाली दरवाजाचा मार्ग हा राजमार्ग आहे आणि तो इतर मार्गाहून थोडा सोपा आहे. पण तरीही त्याने आमच्या नाकी दम आणला. हळूहळू ऊन वाढू लागले, एकीकडे घामाच्या धारा, थकलेले पाय. थोडं थांबावं म्हणत होते तर दुसरीकडे वर दूरवर फडकणारा भगवा थांबू देत नव्हता.मनात विचार आला नसता तरच नवल; आज आपल्याकडे अत्याधुनिक सुविधा (उदा. शूज, स्मार्टफोन) असूनही आपल्याला एवढा त्रास होतो तर त्या काळात लोकांनी दररोज गडावर जाणं, सामानाची ने-आण करणं कसं बरं जमवलं असेल. इतकंच नव्हे तर जिथे स्वत: चढून जाणं कठीण आहे तिथे राजस्त्रियांचे मेणे वाहून नेणारे भोई किती ताकदीचे असतील आणि इतका कठीण दुर्ग जिंकून घेणं आणि नंतर शत्रूंपासून त्याचे रक्षण करणं खरंच कल्पनेबाहेरचं आहे. तंत्रज्ञानामुळे माणूस दिवसेंदिवस अधू बनत चालला आहे हेच खरं.पाली दरवाजाने गडात प्रवेश केला आणि किल्ल्याच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या वाºयाने आमचा सारा थकवा दूर केला. राजगडाच्या चारही दिशांना एकतर डोंगर आहेत किंवा नदी आहे. वारा आणि पाऊस सोडल्यास कुणालाही परवानगीशिवाय प्रवेश अशक्य आहे. म्हणूनच सुरक्षेचे नैसर्गिक वरदान लाभलेल्या दुर्गराज राजगडाची निवड महाराजांनी राजधानी म्हणून केली असावी. कांदा, भाजी-भाकरी, पिठलं भात आणि झणझणीत ठेचा...अहाहा... नुसतं आठवलं तरी तोंडाला पाणी सुटेल असं जेवणं झाल्यावर उरलासुरला थकवाही दूर पळाला. ऐतिहासिकदृष्ट्या हा दुर्ग राजारामांचा जन्म, सईबाईंचा मृत्यू इ. घटनांचा साक्षीदार आहे. राजगडाची उंची आणि विस्तार यांचे शब्दांत वर्णन करणे खरोखरच अशक्य आहे. गडावर पद्मावती मंदिर व पद्मावती तलाव, बालेकिल्ला व इतर वास्तूंचे अवशेष आहेत. बालेकिल्ला हा कोणत्याही किल्ल्याचा मुख्य भाग असतो. बालेकिल्ला ज्याच्या ताब्यात त्याचा किल्ल्यावर हक्क. तिथे जायचा मार्ग कठीण व अरुंद चिंचोळा आणि उभ्या चढणाचा आहे. त्यामुळे तो चढणं तर खरोखरच अवघड आहे. मात्र ज्याने तो चढला त्याने खरा राजगड पाहिला. बालेकिल्ल्यावर अजूनही जशास तसा अखंड असा महादरवाजा, अतिशय सुंदर असा चंद्रकोर तलाव, जननी देवीचे मंदिर, ब्रह्मेश्वराचे मंदिर, उत्तर बुरुज, बाजारपेठ, दरबार, चावडी आणि न्हाणीघरांचे अवशेष आहेत आणि सर्वात वर राजवाड्याचे अवशेष आहेत. त्या राजवाड्यातून फिरताना कोणे एकेकाळी संभाजी महाराज इथे खेळले, बागडले असतील, राजाराम महाराज जन्माला येताच या वास्तूत चौघडे घुमले असतील. मोहिमेवर जाणाऱ्या शिवबांना जिजाऊंनी ओवाळले असेल, सईबाई पुतळा-सोयराबाईंनी चबुतऱ्यावर उभं राहून महाराजांची वाट पाहिली असेल, हात पाठी घेऊन महाराजांनी येरझाऱ्या घातल्या असतील, मुत्सद्दीपणे चर्चा केल्या असतील, मोहिमा आखल्या असतील... अगदी आता आपण जिथून फिरत आहोत तिथून महाराजही अनेकदा गेले असतील, या विचारांनीच अंगावर काटा आला.एखाद्या इतिहासप्रेमीसाठी याहून अधिक सुखद भावना ती कुठली असेल...! राजगडाचा अगदी एकेक कानाकोपरा पाहायला दोन दिवससुद्धा अपुरे पडतील. मात्र बालेकिल्ल्यावरून दुरून का होईना पण सर्व जागा पाहता येतात. हळूहळू मावळत्या सूर्याबरोबर आम्हीही परतीच्या वाटेला लागलो. चढण्यापेक्षा गड उतरणे जास्त कठीण वाटले. कदाचित दिवसभराचा थकवा आणि किल्ल्याला द्यावा लागलेला निरोप यांचा हा मिश्र परिणाम असावा. वाटेतल्या निसरड्या जागांमुळे स्वराज्याची साक्ष असलेल्या मातीशी आम्ही अगदी एकरूप झालो. गडाच्या पायथ्याशी काही मैलांवर जिथे सईबाईंची खरी समाधी आहे ती जागा मात्र वेळेअभावी पाहायची राहून गेली. असो, परत जाण्यासाठी काहीतरी कारण हवेच ना! सूर्याची ड्युटी संपली, आम्हीही मोहीम फत्ते केल्याचे भरभरून समाधान घेऊन परतीच्या वाटेला लागलो आणि तो अखंड अभेद्य दुर्गराज अंधारात गुडुप झाला.

टॅग्स :tourismपर्यटन