शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बुटीबोरीला नगर परिषदेची प्रतीक्षा

By admin | Updated: February 3, 2016 03:06 IST

पंचतारांकित वसाहत म्हणून नावाजलेल्या बुटीबोरीतील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

विकासाच्या मार्गात अडथळा : ग्रामपंचायतवर ३५ हजार लोकसंख्येचा भारचंदू बोरकर बुटीबोरी पंचतारांकित वसाहत म्हणून नावाजलेल्या बुटीबोरीतील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या समस्या मार्गी लावण्यास ग्रामपंचायतचे प्रयत्न निष्फळ ठरत आहे. ३५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करीत आहे. तरीही त्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतसमोर अडचणी येतात. यासाठी ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषदेत व्हावे, अशी बुटीबोरीवासीयांची मागणी आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा विचार केल्यास बुटीबोरी ग्रामपंचायत नगर परिषदेसाठी पात्र आहे. मात्र असे असताना अद्याप बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा मिळू शकला नाही.नागपूर जिल्ह्यात अलीकडेच कन्हान आणि वाडी या दोन नगर परिषद अस्तित्वात आल्या. तेथे सध्या विकासाला चालना मिळत आहे. दुसरीकडे बुटीबोरी नगर परिषद स्थापन व्हावी, अशी मागणी खूप जुनी आहे. ३५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या बुटीबोरीत जिल्हा परिषदेच्या दोन शाळा, शिक्षण संस्थेद्वारे संचालित शाळांची संख्या सात, दोन महाविद्यालये यासह कॉन्व्हेंट, माता बाल संगोपन केंद्र, पोलीस स्टेशन यासह इतर महत्त्वाची कार्यालये आहेत. पंचतारांकित वसाहत असलेल्या या गावात बाहेरगावाहून, परप्रांतातून येणाऱ्या नागरिकांची संख्याही भरमसाट आहे. त्यामानाने ग्रामपंचायतला सोयी-सुविधा करताना त्रास सहन करावा लागतो.बुटीबोरीतील नागरिक सध्या अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त आहे. नवीन वसाहतीतून जुन्या वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावरील गिट्टी इतरत्र विखुरलेली आहे. त्यामुळे केवळ वाहनधारकांनाच नव्हे तर पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. रस्ते, पथदिवे, आरोग्य हे प्रश्न नागरिकांना सतावत आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी काही ठिकाणी अंतर्गत नालीची व्यवस्था केलेली असली तरी त्यातून सांडपाणी वाहून जात नाही, ही येथील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सांडपाणी जमा झालेले दिसून येते. मूलभूत सुविधा देण्यावर ग्रामपंचायतचा भर असला तरी निधीची टंचाई भासते. नगर परिषद अस्तित्वात आल्यास येथील समस्या तत्काळ मार्गी लागू शकतात. हे पाहता नागरिकांनीही ही मागणी अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. याबाबत स्थानिक नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी मंत्री, प्रशासनाला निवेदनही दिले. मात्र त्याचा काहीएक फायदा झालेला नाही.