शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

विद्यापीठाच्या जमिनीला मोकळ्या श्वासाची प्रतीक्षा

By admin | Updated: November 30, 2015 02:34 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’जवळील जागेवरील अतिक्रमणाच्या प्रश्नाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे.

राज्य शासनाकडून पुढाकाराची अपेक्षा : प्रशासन कधी होणार गतिमान?योगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’जवळील जागेवरील अतिक्रमणाच्या प्रश्नाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. याच्या शेजारी असलेल्या जागेवरच विद्यापीठाची नवी प्रशासकीय इमारत साकारणार आहे. अशा स्थितीत या इमारतीला लागूनच ढाबे आणि गोठे असतील तर भविष्यात आणखी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे थेट अतिक्रमण काढणे शक्य नसले तरी येथील ढाबे आणि हॉटेल्सला मिळालेले विविध परवान्यांची चौकशी करुन ते रद्द करण्यासाठी तरी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी विद्यापीठ प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.१९९२ साली विद्यापीठाने क्रीडा संकुलाच्या नावावर शासनाला जमीन दिली होती. मात्र, त्याचा योग्य उपयोग न झाल्याने ती जमीन परत करण्याची मागणी सिनेटमध्ये सदस्यांनी उचलून धरली. त्यानुसार, काही सदस्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. याबाबत अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाल्याने, अखेर राज्य शासनाने ७०.९ एकर पैकी ४४ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, चांगले अभ्यासक्रम सुरू व्हावेत; म्हणून दानदात्यांनी विद्यापीठाच्या पदरात घातलेल्या जमिनीचा शिक्षणासाठी सदुपयोग व्हायला हवा होता. परंतु त्यापैकी ७.४५ एकर जमिनीवर अतिक्रमण करून धाबे, हॉटेल्स अनधिकृतपणे तयार करण्यात आले, असा विद्यापीठाचा आरोप आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. यासंदर्भात आजवर विद्यापीठाने केलेले विविध प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. मागील वर्षी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती. येथील काही धाब्यांचे खाद्य परवानेदेखील रद्द करण्यात आले होते. परंतु आता परत हे धाबे सुरू करण्यात आले आहेत. शिवाय येथे आता नवीन मोटर गॅरेज आणि हॉटेल्सचीदेखील भर पडली आहे. धाब्यांची चौकशी शासनाच्या हातीअतिक्रमण करणाऱ्यांनी संबंधित जमिनीवर हक्क सांगताना येथे अनेक पिढ्यांपासून डेअरी व्यवसाय होत असल्याचा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्षात तर तेथे धाबे, हॉटेल्स चालत आहेत. या धाबे आणि हॉटेलचालकांच्या विविध परवान्यांची चौकशी करणे तर राज्य शासनाच्या हातात आहे. त्यांना खाद्य परवाने, वीज जोडणी, नळ जोडणी तसेच इतर परवानगी कशा मिळाल्या याची चौकशी करुन ते नियमबाह्य पद्धतीने मिळविले असतील तर ते रद्द करण्याचा राज्य शासनाला अधिकार आहे. यासंदर्भात शासनाने कारवाई करावी, असे मत नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी व्यक्त केले.