शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मतदार ओळखपत्र आता स्पीड पोस्टानेच येणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 18:47 IST

नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जनजागृतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मतदारांपर्यंत त्यांचे मतदार कार्ड पोहोचत नसल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे आता नवमतदारांचे ओळखपत्र त्यांना स्पीड पोस्टानेच पाठवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

देशपांडे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती विभागाचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी नागपूर विभागाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.

देशपांडे यांनी सांगितले. नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात विविध शिबिरे आयोजित केली जातील. १३ व १४ तसेच २७ व २८ नोव्हेंबर रोजी वंचित घटक, दिव्यांग कामगार यांच्या मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. येत्या १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा होतील. यात गावातील तरुण मतदारांची नोंदणी तसेच लग्न हाेऊन गावात येणाऱ्या नवविवाहितेची नोंदणी. कुणी लग्न होऊन गावाबाहेर गेली असेल तर त्यांचे नाव कमी करणे, आदी कामे केली जातील.

दुहेरी नाव नोंदणी असलेल्यांची संख्या ५ लाखावरून १३ हजारावर

राज्यात एकाच व्यक्तीचे दोन व त्यापेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदणी असलेले तब्बल पाच लाखावर लोक होते. मतदार यादी अद्ययावत कार्यक्रमांतर्गत अशा लोकांचा शोध घेण्यात आला. अशा लोकांची संख्या आता केवळ १३ हजारापर्यंत राहिली आहे. अजूनही ते काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन मतदानाची संकल्पना चांगली, पण संपूर्ण अभ्यास करावा लागेल

मतदाराला ऑनलाईन मतदान करता यावे, ही संकल्पना चांगली आहे. परंतु सध्या असा कुठलाही प्रस्ताव नाही. मी स्वत: यासंदर्भात एनआयसीसोबत चर्चा केली. ही संकल्पना चांगली असली तरी अगोदर आपल्यास्तरावर त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. हा संपूर्ण तांत्रिक विषय आहे. तो सरसकट लागू करता येणे शक्य नाही, असे देशपांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :VotingमतदानGovernmentसरकारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग