शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

मतदार ओळखपत्र आता स्पीड पोस्टानेच येणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 18:47 IST

नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जनजागृतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मतदारांपर्यंत त्यांचे मतदार कार्ड पोहोचत नसल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे आता नवमतदारांचे ओळखपत्र त्यांना स्पीड पोस्टानेच पाठवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

देशपांडे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती विभागाचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी नागपूर विभागाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.

देशपांडे यांनी सांगितले. नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात विविध शिबिरे आयोजित केली जातील. १३ व १४ तसेच २७ व २८ नोव्हेंबर रोजी वंचित घटक, दिव्यांग कामगार यांच्या मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. येत्या १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा होतील. यात गावातील तरुण मतदारांची नोंदणी तसेच लग्न हाेऊन गावात येणाऱ्या नवविवाहितेची नोंदणी. कुणी लग्न होऊन गावाबाहेर गेली असेल तर त्यांचे नाव कमी करणे, आदी कामे केली जातील.

दुहेरी नाव नोंदणी असलेल्यांची संख्या ५ लाखावरून १३ हजारावर

राज्यात एकाच व्यक्तीचे दोन व त्यापेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदणी असलेले तब्बल पाच लाखावर लोक होते. मतदार यादी अद्ययावत कार्यक्रमांतर्गत अशा लोकांचा शोध घेण्यात आला. अशा लोकांची संख्या आता केवळ १३ हजारापर्यंत राहिली आहे. अजूनही ते काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन मतदानाची संकल्पना चांगली, पण संपूर्ण अभ्यास करावा लागेल

मतदाराला ऑनलाईन मतदान करता यावे, ही संकल्पना चांगली आहे. परंतु सध्या असा कुठलाही प्रस्ताव नाही. मी स्वत: यासंदर्भात एनआयसीसोबत चर्चा केली. ही संकल्पना चांगली असली तरी अगोदर आपल्यास्तरावर त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. हा संपूर्ण तांत्रिक विषय आहे. तो सरसकट लागू करता येणे शक्य नाही, असे देशपांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :VotingमतदानGovernmentसरकारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग