शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मतदार ओळखपत्र आता स्पीड पोस्टानेच येणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 18:47 IST

नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जनजागृतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मतदारांपर्यंत त्यांचे मतदार कार्ड पोहोचत नसल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे आता नवमतदारांचे ओळखपत्र त्यांना स्पीड पोस्टानेच पाठवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

देशपांडे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती विभागाचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी नागपूर विभागाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.

देशपांडे यांनी सांगितले. नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात विविध शिबिरे आयोजित केली जातील. १३ व १४ तसेच २७ व २८ नोव्हेंबर रोजी वंचित घटक, दिव्यांग कामगार यांच्या मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. येत्या १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा होतील. यात गावातील तरुण मतदारांची नोंदणी तसेच लग्न हाेऊन गावात येणाऱ्या नवविवाहितेची नोंदणी. कुणी लग्न होऊन गावाबाहेर गेली असेल तर त्यांचे नाव कमी करणे, आदी कामे केली जातील.

दुहेरी नाव नोंदणी असलेल्यांची संख्या ५ लाखावरून १३ हजारावर

राज्यात एकाच व्यक्तीचे दोन व त्यापेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदणी असलेले तब्बल पाच लाखावर लोक होते. मतदार यादी अद्ययावत कार्यक्रमांतर्गत अशा लोकांचा शोध घेण्यात आला. अशा लोकांची संख्या आता केवळ १३ हजारापर्यंत राहिली आहे. अजूनही ते काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन मतदानाची संकल्पना चांगली, पण संपूर्ण अभ्यास करावा लागेल

मतदाराला ऑनलाईन मतदान करता यावे, ही संकल्पना चांगली आहे. परंतु सध्या असा कुठलाही प्रस्ताव नाही. मी स्वत: यासंदर्भात एनआयसीसोबत चर्चा केली. ही संकल्पना चांगली असली तरी अगोदर आपल्यास्तरावर त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. हा संपूर्ण तांत्रिक विषय आहे. तो सरसकट लागू करता येणे शक्य नाही, असे देशपांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :VotingमतदानGovernmentसरकारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग