शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:14 IST

वर्धा जिल्ह्यातील बेघरांना कायमस्वरुपी घरपट्टे त्वरित देण्याच्या मागणीला घेऊन ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामोरे जाऊन दोन महिन्यात बेघरांच्या नावाने सातबारा देण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देदोन महिन्यात सातबारा नावावर : ग्रामविकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्ह्यातील बेघरांना कायमस्वरुपी घरपट्टे त्वरित देण्याच्या मागणीला घेऊन ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामोरे जाऊन दोन महिन्यात बेघरांच्या नावाने सातबारा देण्याचे आश्वासन दिले.‘राहील तिथे घर व वाहील त्याला शेती’ या धोरणानुसार वर्धा जिल्ह्यातील बेघरांना (अतिक्रमणधारकांना) मोफत कायमस्वरुपी घरपट्टे देण्याच्या मागणीला घेऊन ५००वर वर्धावासी मोर्चात सहभागी झाले होते. मार्चाचे नेतृत्व ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हा अध्यक्ष पलाश उमाठे व समीर गिरी यांनी केले. या मोर्चाला माजी खासदार नाना पटोले, आ. प्रकाश गजभिये, रवींद्र कोटमकर व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. ‘लोकमत’शी बोलताना निहाल पांडे म्हणाले, वर्धा जिल्ह्यातील बेघरांकडे पक्का रहिवासी पुरावा नसल्याने आवास योजनांचा लाभ मिळत नाही. शासकीय योजनांपासून नागरिक वंचित आहेत. कुठे ३० ते ४० तर कुठे पिढ्यान्पिढ्यांपासून अतिक्रमण करून वास्तव करणारे मजूर, कष्टकरी कामगार व शेतमजूर आहेत. कायमस्वरुपी घरपट्टे मागणीला घेऊन मार्च महिन्यात पायदळ ‘भू-देव’यात्रा काढली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यात घरपट्टे देण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे काहीच झाले नाही. यामुळे पुन्हा ‘भू-देव’ मोर्चा काढला. मुख्यमंत्री जोपर्यंत मोर्चात येणार नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा इशारा दिला. परंतु मुख्यमंत्री विधिमंडळाच्या कामकाजात व्यस्त असल्याने त्यांच्या जागी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे मोर्चास्थळी आले. त्यांनी दोन महिन्यात बेघरांना त्यांच्या नावे सातबारा काढण्याचे व आठवडाभरात या संदर्भातील आॅनलाईन अर्ज भरण्याचे आश्वासन दिले. परंतु मागील फोल ठरलेल्या आश्वासनामुळे आम्ही त्यांना महिन्याभराचाच वेळ दिल्याचे पांडे म्हणाले. मोर्चात महिलांची संख्या सर्वाधिक होती.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा