शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

‘व्हीएनआयटी’त ३६ गुणवंतांचा होणार सत्कार

By admin | Updated: September 13, 2015 03:10 IST

१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दीक्षांत समारंभादरम्यान कडेकोट सुरक्षाव्यवस्था : समारंभाची होणार रंगीत तालीमनागपूर : १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी परंपरेला फाटा देत केवळ ३६ गुणवंतांचा विविध पारितोषिकांनी मंचावर सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमात ऐनवेळी गोंधळ व्हायला नको यासाठी समारंभाची एक दिवस अगोदर रंगीत तालीमदेखील करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘व्हीएनआयटी’च्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती सहभागी होतील. या सोहळ्यात ते सव्वा तास थांबतील. ‘व्हीएनआयटी’तून राष्ट्रपती १२.१५ वाजता नागपूर विमानतळाकडे रवाना होतील व तेथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ते दुपारी १२.४० वाजता दिल्लीकडे प्रयाण करतील. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार हे देखील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)संकेतस्थळावर होणार थेट प्रक्षेपणदीक्षांत समारंभात निवडक व्यक्तींनाच प्रवेश असला तरी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून हा समारंभ पाहता येणार आहे. ‘व्हीएनआयटी’च्या संकेतस्थळावर या समारंभाचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार असून यामुळे सहजपणे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सभागृहात प्रवेश नाहीयंदाचा दीक्षांत समारंभ विशेष असल्यामुळे ‘व्हीएनआयटी’त तयारीदेखील त्याच पद्धतीने सुरू आहे. केवळ ३६ विद्यार्थ्यांचा मंचावर सत्कार करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे केवळ ‘पीएचडी’, ‘बीटेक’ व ‘बीआर्क’च्या विद्यार्थ्यांनाच सभागृहाच्या आत प्रवेश देण्यात येणार आहे. ‘एमटेक’ व ‘एमएस्सी’च्या विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था संगणक विज्ञान विभागाजवळील शामियान्यात करण्यात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची बसण्याची व्यवस्थादेखील इथेच करण्यात येणार आहे. सुरक्षेवर विशेष भरकार्यक्रमादरम्यान सुरक्षाव्यवस्थेवर ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने विशेष भर दिला आहे. निवडक लोकांनाच सभागृहाच्या आत प्रवेश राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘पास’ तयार करण्यात आले आहे. सभागृहाच्या आत छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली असून कॅमेरा तसेच मोबाईल आणण्यासदेखील बंदी आहे. १४ सप्टेंबर रोजी ‘व्हीएनआयटी’ सभागृहात दीक्षांत समारंभाची रंगीत तालीम घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना यासाठी बोलविण्यात आले आहे.