शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यांची पायमल्ली करून सुरू आहेत कत्तलखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:55 IST

राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे.

ठळक मुद्देसुकृत ट्रस्टची धक्कादायक माहितीसर्वोच्च न्यायालय, हरित न्यायाधिकरणाच्या आदेशांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे.शासकीय अनुदानाशिवाय गेल्या २० वर्षांपासून पशू कल्याणाकरिता कार्य करीत असलेल्या सुकृत निर्माण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पशू कल्याण मंडळाचे सदस्य कनकराय सावडिया यांनी ही धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला दिली. सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅगस्ट २०१२ व हरित न्यायाधिकरणने ३० जानेवारी २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार मांस प्रक्रिया उद्योगांना ते कच्चा माल कोठून आणतात याची माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. परंतु, राज्यात अद्यापही अशी माहिती घेतली जात नाही. त्यामुळे जनावरांची सर्रास अवैध कत्तल करून विदेशात मांस निर्यात केले जात आहे. सावडिया यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळोवेळी पत्रे लिहिली. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिण्यात आले होते. त्यावरून केंद्रीय मंडळाने राज्य मंडळाला २५ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्र लिहून कत्तलखान्यांना कच्च्या मालाचा स्रोत विचारण्यास सांगितले होते. त्यानंतर सावडिया यांनी १ जून २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात मध्यस्थी करण्याचे व आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती केली. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दाखल घेऊन १२ जून २०१७ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले व यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले. परंतु, एवढे प्रयत्न करूनही परिस्थिती बदलली नाही, असे सावडिया यांनी सांगितले.प्रदूषण व आजार पसरत आहेकत्तलखान्यातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे वातावरणात प्रदूषण पसरत आहे. तसेच, नागरिकांना विविध संसर्गजन्य व अन्य गंभीर आजार जडत आहेत. परिणामी कत्तलखान्यांच्या अवैध कृतीवर तत्काळ नियंत्रण मिळविणे आवश्यक झाले आहे, याकडे सावडिया यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर