शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कायद्यांची पायमल्ली करून सुरू आहेत कत्तलखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:55 IST

राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे.

ठळक मुद्देसुकृत ट्रस्टची धक्कादायक माहितीसर्वोच्च न्यायालय, हरित न्यायाधिकरणाच्या आदेशांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे.शासकीय अनुदानाशिवाय गेल्या २० वर्षांपासून पशू कल्याणाकरिता कार्य करीत असलेल्या सुकृत निर्माण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पशू कल्याण मंडळाचे सदस्य कनकराय सावडिया यांनी ही धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला दिली. सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅगस्ट २०१२ व हरित न्यायाधिकरणने ३० जानेवारी २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार मांस प्रक्रिया उद्योगांना ते कच्चा माल कोठून आणतात याची माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. परंतु, राज्यात अद्यापही अशी माहिती घेतली जात नाही. त्यामुळे जनावरांची सर्रास अवैध कत्तल करून विदेशात मांस निर्यात केले जात आहे. सावडिया यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळोवेळी पत्रे लिहिली. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिण्यात आले होते. त्यावरून केंद्रीय मंडळाने राज्य मंडळाला २५ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्र लिहून कत्तलखान्यांना कच्च्या मालाचा स्रोत विचारण्यास सांगितले होते. त्यानंतर सावडिया यांनी १ जून २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात मध्यस्थी करण्याचे व आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती केली. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दाखल घेऊन १२ जून २०१७ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले व यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले. परंतु, एवढे प्रयत्न करूनही परिस्थिती बदलली नाही, असे सावडिया यांनी सांगितले.प्रदूषण व आजार पसरत आहेकत्तलखान्यातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे वातावरणात प्रदूषण पसरत आहे. तसेच, नागरिकांना विविध संसर्गजन्य व अन्य गंभीर आजार जडत आहेत. परिणामी कत्तलखान्यांच्या अवैध कृतीवर तत्काळ नियंत्रण मिळविणे आवश्यक झाले आहे, याकडे सावडिया यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर