शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

कल चाचणीत ‘विनोद’ !

By admin | Updated: June 16, 2016 03:14 IST

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कुठले क्षेत्र निवडावे यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पहिल्यांदा कलचाचणी घेतली.

अहवालावर शिक्षणमंत्र्याचा फोटो कसा? : दहावीच्या गुणपत्रिकेची ‘परीक्षा’ नागपूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कुठले क्षेत्र निवडावे यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पहिल्यांदा कलचाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसोबत देण्यात आला. या अहवालाचे वैशिष्ट्य असे की, यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वत:चा फोटो छापून घेतला आहे. कल चाचणी अहवालातील या ‘विनोदा’मुळे मात्र नवा वाद निर्माण झाला आहे. दुसरे असे की, चार विषयात नापास झालेल्या एका विद्यार्थ्याचा कल अहवाल बघितला असता, त्यात विद्यार्थ्याचा कल आरोग्य आणि तांत्रिक क्षेत्राकडे असल्याचे दर्शविले. शिक्षण मंडळाने कल चाचणी खरच गांभीर्याने घेतली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)हा प्रकार निषेधार्हस्वत:च्या प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करणे, शिक्षण मंत्र्याचा हा प्रकार खरोखरच निंदनीय आहे. राज्य शिक्षण मंडळाने हा अहवाल विद्यार्थ्यांना दिला आहे. राज्यात आजपर्यंत अनेक शिक्षण मंत्री होऊन गेले. परंतु त्यांनी बोर्डाचा असा दुरुपयोग कधीच केला नाही. स्वत:चा फोटो टाकून शिक्षणमंत्री कुठला संदेश देत आहे. शिक्षण मंत्र्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे. अनिल गोतमारे, उपाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ