शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण लोक म्हणतात, मेयो-मेडिकलमध्ये नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाबाधित झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना पुढच्या उपचारासाठी शहरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात येते. गावकऱ्यांचा अनुभव ...

नागपूर : कोरोनाबाधित झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना पुढच्या उपचारासाठी शहरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात येते. गावकऱ्यांचा अनुभव आहे की मेयो, मेडिकलमधून रुग्ण परत न येता त्याची राखच येते. या दहशतीपोटी ग्रामीण भागात टेस्टिंगचे प्रमाण कमी झाले आहे. २९ मार्चच्या अहवालानुसार ग्रामीण भागात १९३८ टेस्ट झाल्या आणि पॉझिटिव्ह ९५५ आले. त्यात २० बाधितांचा मृत्यू झाला. या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील पॉझिटिव्हचा दर ५० टक्क्याच्या जवळपास आहे.

गेल्या दहा दिवसातील ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह व मृत्यूचा आढावा घेतला असता तो दररोज वाढत आहे. शहरामध्ये दहा हजार टेस्ट झाल्यास पॉझिटिव्हची संख्या दोन हजाराच्या जवळपास असते. पण ग्रामीणमध्ये दोन हजार टेस्ट झाल्या तरी ८०० ते ९०० पॉझिटिव्ह येत आहेत. २१ मार्चपासून मृत्यूची संख्या दोन आकड्यावर पोहचली आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या पदार्पणात जी धास्ती, सतर्कता जिल्ह्यातील गावकऱ्यांनी बाळगली होती ती आता नाहीशीच झाल्याचे चित्र आहे. आरोग्य यंत्रणासुद्धा ग्रामीण भागात व्हिटॅमिनच्या गोळ्यावर कोरोनाशी लढत आहे. लोक ऐकायला तयार नाही, लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरकारी टेस्टिंग रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, तो कसा चुकीचा आहे, हे दाखविण्यासाठी खासगी लॅबमध्ये पुन्हा टेस्टिंग केले जात आहे. यादरम्यान गावभर फिरणारी ती व्यक्ती अनेकांना संक्रमित करीत आहे.

- व्हिटॅमिनच्या गोळ्यांवर सुरू आहे लढाई

आरोग्य यंत्रणा कोरोनाची लढाई केवळ व्हिटॅमिनच्या गोळ्यांवर लढत आहे. तालुका रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद आहे. रेडिओलॉजिस्ट नाही. सिटीस्कॅनची सोय नाही. रेमडिसीव्हर, टॅमिफ्लू, फॅबिफ्लू यासारख्या औषधी ग्रामीण भागात मिळत नाही. त्यामुळे रुग्ण गंभीर होत आहे. मेडिकल, मेयोशिवाय पर्याय नाही.

- ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे की, टेस्टिंग केल्यावर पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल, मेयो रुग्णालयात पाठविण्यात येते. तिथे गेलेला रुग्ण परत येत नाही, त्याची राखच येते. त्यामुळे टेस्टिंग न करता घरच्याघरी उपचार लोक करीत आहेत. गावागावात मेयो, मेडिकलच्या बाबतीत दहशत निर्माण झाली आहे. घरी मरू पण मेडिकलमध्ये जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांची आहे.

संजय झाडे, जि.प. सदस्य

- ग्रामपंचायतीमध्ये फक्त शासकीय कर्मचारीच काम करीत आहेत. पोलीस पाटील तर घरूनच टपल्या मारते. लीडर फक्त लीडरकी करीत आहे. लोकांना नियम सांगायला गेलो तर दोन गोष्टी आम्हालाच ऐकाव्या लागतात. कुणाला हटकले तर आम्हाला लाथाबुक्क्या खाव्या लागतात. सरकारी कर्मचाऱ्याला ग्रामीणस्तरावर प्रोटेक्शनच नाही.

हरिदास रानडे, जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

- सर्व ग्रामसेवकांच्या माथी मारले जाते

लोक सहभाग देत नाहीत, मास्क लावत नाहीत. घर सील करावे तर घराबाहेर पडतात. ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. शासकीय कर्मचाऱ्यांचे कुणी ऐकत नाही. पोलीस पाटील साथ देत नाहीत, सरपंच मतलबी, सर्व ग्रामसेवकांच्या माथी मारले जाते, अशी व्यथा ग्रामसेवकांनी व्यक्त केली.