शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

ग्रामीण लोक म्हणतात, मेयो-मेडिकलमध्ये नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाबाधित झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना पुढच्या उपचारासाठी शहरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात येते. गावकऱ्यांचा अनुभव ...

नागपूर : कोरोनाबाधित झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना पुढच्या उपचारासाठी शहरातील मेयो व मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात येते. गावकऱ्यांचा अनुभव आहे की मेयो, मेडिकलमधून रुग्ण परत न येता त्याची राखच येते. या दहशतीपोटी ग्रामीण भागात टेस्टिंगचे प्रमाण कमी झाले आहे. २९ मार्चच्या अहवालानुसार ग्रामीण भागात १९३८ टेस्ट झाल्या आणि पॉझिटिव्ह ९५५ आले. त्यात २० बाधितांचा मृत्यू झाला. या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील पॉझिटिव्हचा दर ५० टक्क्याच्या जवळपास आहे.

गेल्या दहा दिवसातील ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह व मृत्यूचा आढावा घेतला असता तो दररोज वाढत आहे. शहरामध्ये दहा हजार टेस्ट झाल्यास पॉझिटिव्हची संख्या दोन हजाराच्या जवळपास असते. पण ग्रामीणमध्ये दोन हजार टेस्ट झाल्या तरी ८०० ते ९०० पॉझिटिव्ह येत आहेत. २१ मार्चपासून मृत्यूची संख्या दोन आकड्यावर पोहचली आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या पदार्पणात जी धास्ती, सतर्कता जिल्ह्यातील गावकऱ्यांनी बाळगली होती ती आता नाहीशीच झाल्याचे चित्र आहे. आरोग्य यंत्रणासुद्धा ग्रामीण भागात व्हिटॅमिनच्या गोळ्यावर कोरोनाशी लढत आहे. लोक ऐकायला तयार नाही, लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरकारी टेस्टिंग रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, तो कसा चुकीचा आहे, हे दाखविण्यासाठी खासगी लॅबमध्ये पुन्हा टेस्टिंग केले जात आहे. यादरम्यान गावभर फिरणारी ती व्यक्ती अनेकांना संक्रमित करीत आहे.

- व्हिटॅमिनच्या गोळ्यांवर सुरू आहे लढाई

आरोग्य यंत्रणा कोरोनाची लढाई केवळ व्हिटॅमिनच्या गोळ्यांवर लढत आहे. तालुका रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद आहे. रेडिओलॉजिस्ट नाही. सिटीस्कॅनची सोय नाही. रेमडिसीव्हर, टॅमिफ्लू, फॅबिफ्लू यासारख्या औषधी ग्रामीण भागात मिळत नाही. त्यामुळे रुग्ण गंभीर होत आहे. मेडिकल, मेयोशिवाय पर्याय नाही.

- ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे की, टेस्टिंग केल्यावर पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल, मेयो रुग्णालयात पाठविण्यात येते. तिथे गेलेला रुग्ण परत येत नाही, त्याची राखच येते. त्यामुळे टेस्टिंग न करता घरच्याघरी उपचार लोक करीत आहेत. गावागावात मेयो, मेडिकलच्या बाबतीत दहशत निर्माण झाली आहे. घरी मरू पण मेडिकलमध्ये जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांची आहे.

संजय झाडे, जि.प. सदस्य

- ग्रामपंचायतीमध्ये फक्त शासकीय कर्मचारीच काम करीत आहेत. पोलीस पाटील तर घरूनच टपल्या मारते. लीडर फक्त लीडरकी करीत आहे. लोकांना नियम सांगायला गेलो तर दोन गोष्टी आम्हालाच ऐकाव्या लागतात. कुणाला हटकले तर आम्हाला लाथाबुक्क्या खाव्या लागतात. सरकारी कर्मचाऱ्याला ग्रामीणस्तरावर प्रोटेक्शनच नाही.

हरिदास रानडे, जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

- सर्व ग्रामसेवकांच्या माथी मारले जाते

लोक सहभाग देत नाहीत, मास्क लावत नाहीत. घर सील करावे तर घराबाहेर पडतात. ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. शासकीय कर्मचाऱ्यांचे कुणी ऐकत नाही. पोलीस पाटील साथ देत नाहीत, सरपंच मतलबी, सर्व ग्रामसेवकांच्या माथी मारले जाते, अशी व्यथा ग्रामसेवकांनी व्यक्त केली.