शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

‘त्या’ साहित्यिकाला अध्यक्ष होण्यासाठी गावही मोठेच हवे

By admin | Updated: December 19, 2015 02:47 IST

ते तसे मोठे साहित्यिक आणि कादंबरीकार आहे. त्यांचा सन्मानही आहे आणि त्यांची संवेदनशीलता टोकाची सूक्ष्म आणि लिखाणही वास्तववादी आहे.

नागपूर : ते तसे मोठे साहित्यिक आणि कादंबरीकार आहे. त्यांचा सन्मानही आहे आणि त्यांची संवेदनशीलता टोकाची सूक्ष्म आणि लिखाणही वास्तववादी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी एका कादंबरीतून मांडले. ही कादंबरी वाचताना अनेकांच्या डोळ्यात शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेताना पाणी आले. त्यांचे लेखन निर्विवाद प्रभावी आहेच. त्यांच्या याच कादंबरीवर नंतर चित्रपटही काढण्यात आला. त्यांना सर्वोच्च पुरस्कारही लाभला. या लेखनासाठी वाचक त्यांच्यावरही प्रेम करतात. पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी त्यांची एक अट होती. गाव मोठे असावे.विदर्भ साहित्य संघातर्फे दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. ग्रामीण भागातील लेखकांना, कविंना संधी मिळावी आणि ग्रामीण साहित्याला मुख्य प्रवाहात सहभागी करून साहित्य चळवळ वाढावी. हा संस्थेचा उद्देश आहे. विदर्भ साहित्य संघ ही एक मोठी परंपरा आणि इतिहास असलेली साहित्य क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर असलेल्या शाखा आणि जवळपास आठ हजार सदस्य असलेल्या या संस्थेचे मोठे जाळे विदर्भात आहे. संस्थेतर्फे प्रादेशिक पातळीवर आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संस्थेतर्फे ‘त्या’ साहित्यिकाला तीन वेळा विनंती करण्यात आली. अर्थात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तीन वेळा ‘त्या’ साहित्यिकाचे नाव सर्वानुमते अध्यक्षपदासाठी निवडले होते. पण ग्रामीण भागातील गावात साहित्य संमेलनाचे आयोजन होत असल्याने त्यांनी नकार दिला. शेतकऱ्यांच्या व्यथा कादंबरीतून व्यक्त करणाऱ्या त्यांना संमेलनाचे गाव शहरीच हवे होते. आता विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या आयोजक संस्थेवर ‘त्या’ साहित्यिकाने आपणच अध्यक्षपदासाठी आपलेच नाव अंकुरले पाहिजे म्हणून पेरणी केल्याने वैचारिक गोंधळ वाढला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांना चंद्रपूर परिसरातील साहित्यिकाला अध्यक्षपद देण्याची इच्छा आहे. पण ‘त्या’ साहित्यिकाने टाकलेला दबाव मोठा आहे. त्यांचे नाव आयोजकांना टाळता येणे शक्य नाही म्हणून ‘त्यांनी’ सद् आनंद व्यक्त केला आहे. देशात सहिष्णू- असहिष्णू चर्चा सुरू असताना या मुद्यावर आयोजकांचे मुख बंद झाले आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांवर आणि जीवनावर अतिशय मर्मग्रही कादंबरी लिहिली त्यांना संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ते संमेलन शहरी भागातच व्हावे, अशी अट का टाकावी लागली. ग्रामीण संघर्ष, जीवन आणि शेतीच्या व्यथा मांडणाऱ्या ‘त्या’ साहित्यिकाला ग्रामीण गावाबद्दल का कमीपणा वाटावा, असे प्रश्न साहित्य क्षेत्रात दबक्या आवाजात चर्चेला आले आहेत. अद्याप संमेलनाध्यक्षांचे नाव ठरलेले नाही. विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. आयोजक संस्थेनेही त्यांच्या सन्मानापुढे नमते घेण्याचीच भूमिका घेतल्याचे कळले आहे. जीवनानुभवातून आलेले साहित्य सकस असते तर जीवनानुभवाच्या भूमीवरचे अध्यक्षपद कमीपणाचे कसे, असे काही प्रश्न वैचारिक स्तरावर चर्चेला आले आहेत. (प्रतिनिधी)