शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग हवा

By admin | Updated: February 21, 2017 02:11 IST

रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे.

सुधीर ठाकरे : पंचायत राज विभागातर्फे चर्चासत्र नागपूर : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या सहभागानेच केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते, असे मत केंद्राच्या पंचायत राज विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी मांडले. नाग विदर्भ चेंबर येथे आयोजित ‘ग्रामविकासाची भावी दिशा व उद्दिष्टे’ सुंदर, विकसित व परिपूर्ण गाव या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय नागपूर व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो.इंजि. मित्र परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक सुदूर संवेदना केंद्राचे मिलिंद वडोतकर, रोटरी क्लबचे मनीष भाटे, जनमंचचे प्रमोद पांडे, अमिताभ पावडे, रेड स्वास्तिकचे मिलिंद नाईक, नागपूर सेंद्रीय शेतीचे हरिसिंग चव्हाण, विकल्पा(ग्रामीण शिक्षण)चे सचिन देशपांडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या निर्मितीपासून ते आजपावेतो ग्रामविकासासाठी नेमलेल्या विविध समित्यांच्या कामाबाबत माहिती देताना ठाकरे म्हणाले की, ग्रामविकास हा सूक्ष्म नियोजनाशिवाय आणि गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे हिवरा बाजारसारख्या विकसित गावांमुळे सिद्ध झाले आहे. अराजकीय व्यक्ती आणि प्रत्यक्ष कामातून घडवून आणलेला ग्राम विकासातील बदल होणे गरजेचे आहे. स्मार्ट व्हिलेज हे स्मार्टसिटीपेक्षा तितकेच महत्त्वाचे असून गावातील पैसा गावातच, सोबतच शहरातील पैसाही गावातच आणण्यावर भर देऊन कृषी विभागाची सिंचनक्षमता वाढविणे, कृषी उत्पादन आणि उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जवळच बाजारपेठा निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुधीर ठाकरे यांनी केले. ग्रामीण जनतेवर विश्वास टाकून समाजाचा ग्रामविकासात सहभाग वाढवून जे काम स्थानिक पातळीवर होते, तेच काम ग्रामविकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे. तरच ग्रामविकास घडून येऊ शकतो. सेंद्रीय शेती, सिंचन, बाजारपेठा, नवनव्या उपग्रहाचा कृषी विकासासाठी वापर, जल आणि मृदासंधारण, साक्षरता, कृषी व कृषिपूरक उद्योग सुरू करणे, सीड व्हिलेज, खत आणि निविष्ठा, कडूनिंब प्रकल्प आदी विषयांवर उपस्थितांनी या चर्चासत्रात आपली मते मांडली. (प्रतिनिधी)