शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग हवा

By admin | Updated: February 21, 2017 02:11 IST

रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे.

सुधीर ठाकरे : पंचायत राज विभागातर्फे चर्चासत्र नागपूर : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या सहभागानेच केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते, असे मत केंद्राच्या पंचायत राज विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी मांडले. नाग विदर्भ चेंबर येथे आयोजित ‘ग्रामविकासाची भावी दिशा व उद्दिष्टे’ सुंदर, विकसित व परिपूर्ण गाव या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय नागपूर व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो.इंजि. मित्र परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक सुदूर संवेदना केंद्राचे मिलिंद वडोतकर, रोटरी क्लबचे मनीष भाटे, जनमंचचे प्रमोद पांडे, अमिताभ पावडे, रेड स्वास्तिकचे मिलिंद नाईक, नागपूर सेंद्रीय शेतीचे हरिसिंग चव्हाण, विकल्पा(ग्रामीण शिक्षण)चे सचिन देशपांडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या निर्मितीपासून ते आजपावेतो ग्रामविकासासाठी नेमलेल्या विविध समित्यांच्या कामाबाबत माहिती देताना ठाकरे म्हणाले की, ग्रामविकास हा सूक्ष्म नियोजनाशिवाय आणि गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे हिवरा बाजारसारख्या विकसित गावांमुळे सिद्ध झाले आहे. अराजकीय व्यक्ती आणि प्रत्यक्ष कामातून घडवून आणलेला ग्राम विकासातील बदल होणे गरजेचे आहे. स्मार्ट व्हिलेज हे स्मार्टसिटीपेक्षा तितकेच महत्त्वाचे असून गावातील पैसा गावातच, सोबतच शहरातील पैसाही गावातच आणण्यावर भर देऊन कृषी विभागाची सिंचनक्षमता वाढविणे, कृषी उत्पादन आणि उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जवळच बाजारपेठा निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुधीर ठाकरे यांनी केले. ग्रामीण जनतेवर विश्वास टाकून समाजाचा ग्रामविकासात सहभाग वाढवून जे काम स्थानिक पातळीवर होते, तेच काम ग्रामविकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे. तरच ग्रामविकास घडून येऊ शकतो. सेंद्रीय शेती, सिंचन, बाजारपेठा, नवनव्या उपग्रहाचा कृषी विकासासाठी वापर, जल आणि मृदासंधारण, साक्षरता, कृषी व कृषिपूरक उद्योग सुरू करणे, सीड व्हिलेज, खत आणि निविष्ठा, कडूनिंब प्रकल्प आदी विषयांवर उपस्थितांनी या चर्चासत्रात आपली मते मांडली. (प्रतिनिधी)