शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 22:31 IST

भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.

ठळक मुद्देशमीपत्र पूजनानंतर होणार सीमोल्लंघनविद्यारंभ दिवस म्हणूनही दसऱ्याचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्रोत्सवाचा खऱ्या अर्थाने समारोप होतो तो दसऱ्याला. दुर्गेने हिरण्यकश्यपूचा वध केला तो दिवस आणि श्रीरामाने रावणाचा वध केला तो दिवस म्हणून विजयादशमीचे महत्त्व आहे. हिरण्यकश्यपू किंवा रावण, हे दोन्ही वाईट वृत्तीचे प्रतीक मानून भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.रावणदहनाचा प्रमुख कार्यक्रम सनातन धर्म युवक सभेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे साजरा होईल. दुपारी ४ वाजता शस्त्रपूजनानंतर रामलीलेतील काही प्रसंगांचे सादरीकरण येथे होईल आणि संध्याकाळी ६ वाजता रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाईल. शहरातील दुसरा मोठा कार्यक्रम महाल येथील चिटणीस पार्क मैदानावर पार पडेल. रावणदहन आयोजन समितीतर्फे रावणदहनाचा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता होईल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर प्रवीण दटके, बडी मारवाडा माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष पुरुषोत्तम मालू, दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे, विद्या कन्हेरे, सरला नायक उपस्थित राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम सारडा, आरबीआय टास्क फोर्सचे सदस्य रमेश मंत्री यांचा सत्कार केला जाईल. तत्पूर्वी चिटणीस पार्क मैदानापर्यंत श्री शिरपूरकर राममंदिर, बडकस चौक येथून शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिमांसह ढोलताशा, मिरवणूक पथक यांचा समावेश असेल. यासोबतच यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे वर्धारोड येथील पूर्व समर्थनगरच्या मनपा मैदानात, वीर हनुमान मंदिरतर्फे नरेंद्रनगर येथील उज्ज्वल सोसायटीमध्ये, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे गांधीनगर येथे रावणदहनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय, शहरातील विविध धार्मिक स्थळांवर विजयादशमी उत्सव साजरा केला जाणार आहे.घरोघरी शमीपत्रांचे पूजन केल्यानंतर नागरिक सीमोल्लंघन करून एकमेकांना शुभेच्छा देतील. त्याअनुषंगाने दसरा मिलनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. यासोबतच विजयासाठीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून विजयादशमीला विद्यारंभ करण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्याअनुषंगाने काही धार्मिक स्थळांवर विद्यारंभ संस्कारांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dasaraदसराnagpurनागपूर