शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 22:31 IST

भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.

ठळक मुद्देशमीपत्र पूजनानंतर होणार सीमोल्लंघनविद्यारंभ दिवस म्हणूनही दसऱ्याचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्रोत्सवाचा खऱ्या अर्थाने समारोप होतो तो दसऱ्याला. दुर्गेने हिरण्यकश्यपूचा वध केला तो दिवस आणि श्रीरामाने रावणाचा वध केला तो दिवस म्हणून विजयादशमीचे महत्त्व आहे. हिरण्यकश्यपू किंवा रावण, हे दोन्ही वाईट वृत्तीचे प्रतीक मानून भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.रावणदहनाचा प्रमुख कार्यक्रम सनातन धर्म युवक सभेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे साजरा होईल. दुपारी ४ वाजता शस्त्रपूजनानंतर रामलीलेतील काही प्रसंगांचे सादरीकरण येथे होईल आणि संध्याकाळी ६ वाजता रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाईल. शहरातील दुसरा मोठा कार्यक्रम महाल येथील चिटणीस पार्क मैदानावर पार पडेल. रावणदहन आयोजन समितीतर्फे रावणदहनाचा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता होईल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर प्रवीण दटके, बडी मारवाडा माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष पुरुषोत्तम मालू, दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे, विद्या कन्हेरे, सरला नायक उपस्थित राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम सारडा, आरबीआय टास्क फोर्सचे सदस्य रमेश मंत्री यांचा सत्कार केला जाईल. तत्पूर्वी चिटणीस पार्क मैदानापर्यंत श्री शिरपूरकर राममंदिर, बडकस चौक येथून शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिमांसह ढोलताशा, मिरवणूक पथक यांचा समावेश असेल. यासोबतच यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे वर्धारोड येथील पूर्व समर्थनगरच्या मनपा मैदानात, वीर हनुमान मंदिरतर्फे नरेंद्रनगर येथील उज्ज्वल सोसायटीमध्ये, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे गांधीनगर येथे रावणदहनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय, शहरातील विविध धार्मिक स्थळांवर विजयादशमी उत्सव साजरा केला जाणार आहे.घरोघरी शमीपत्रांचे पूजन केल्यानंतर नागरिक सीमोल्लंघन करून एकमेकांना शुभेच्छा देतील. त्याअनुषंगाने दसरा मिलनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. यासोबतच विजयासाठीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून विजयादशमीला विद्यारंभ करण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्याअनुषंगाने काही धार्मिक स्थळांवर विद्यारंभ संस्कारांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dasaraदसराnagpurनागपूर