शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

By कमलेश वानखेडे | Updated: April 8, 2024 16:39 IST

कोण शिवसेना वाचवतो हे येणारा काळ आणि जनता ठरवेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

नागपूर : मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला. आता तेच राजा होण्याचे स्वप्न पाहत आहे. ज्यांनी राजा केला त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवत आहे. जनता हे सहन करणार नाही, कोण शिवसेना वाचवतो हे येणारा काळ आणि जनता ठरवेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधानांच्या कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. लोक त्यांना ऐकायला जातील पण मतदान करणार नाहीत. एकनाथ खडसे यांच्या गळ्याला फास लागला आहे. या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका खडसे यांनी घेतली असावी, असे वडेट्टीवार म्हणाले. 

सांगलीबाबत टोकाची भूमिका घेऊन नये, मार्ग काढू असे नाना पटोले बोलले आहेत. संजय राऊत यानी आघाडी धर्म पाळताना सामंजस्याने भूमिका ठेवावी. खा. नवनीत राणा या शरद पवार सारख्या जेष्ठ नेत्याचा आशिर्वाद व काँग्रेसच्या मतांमुळे निवडून आल्या होत्या. आता त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. संजय निरुपम यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकले आहे. ते कुठे जातात याच्याशी आता काँग्रेसला काही देणेघेणे नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.भाजपमध्ये एकमेकांचा काटा काढणे सुरू

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली होती. आता काँग्रेस एकसंघ आहे. ही कीड आता भाजपमध्ये सुरू झालेली आहे. उंदराला घुस व्हावं असं वाटतेय. घुशीला बोक्या व्हावे, बोक्याला वाटते की मी त्यापेक्षा चपळ प्राणी व्हावं. राजकारणात एखाद्याचा काटा काढला की दुसऱ्याचा काटा काढला जातोच. भाजपमध्ये महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता हे काटा काढण्यासाठी दाबन वापरतात की सुई हे येत्या काही दिवसात कळेल, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी काढला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार