शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

विजय रत्न सुंदर सूरीश्वरजींचा चातुर्मास आजही आठवणीत

By admin | Updated: January 26, 2017 02:48 IST

आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे

नागपूर : आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे. २०१२ साली चातुर्मासादरम्यान त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आयुष्याला खऱ्या अर्थाने सत्कारणी लावण्यासंदर्भातील बाबींवर प्रकाश टाकला होता. जाती, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या सान्निध्यात अक्षरश: प्रेरणासुमनांचा वर्षाव झाला. नागपुरातील चातुर्मासादरम्यानच्या उद्बोधनात आचार्यांनी शिक्षण व परमात्म्याच्या भक्तीवर भर दिला होता. २ जून २०१२ रोजी त्यांचे आगमन झाले तेव्हा शहरातील मान्यवर व जनता त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आली होती. प्रवचनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अमृतवाणीच्या धारा बरसल्या होत्या. देश आणि समाजहिताच्या कार्यांची अंमलबजावणी करीत असताना आपण काही मुद्यांवर गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. वेळेचे महत्त्व विशद करीत असताना त्यांनी ‘व्हिजन’च्या मुद्यावर भर दिला होता. संपत्तीच्या नावाखाली आपण पैसे जमा करण्यासाठी झटतो, मात्र वेळ सातत्याने सरत असते. त्या क्षणांना आपल्या सत्कृत्यांनी जतन करण्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते म्हणाले होते.(प्रतिनिधी) मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे प्रत्येक व्यक्ती वस्तू वाढविण्यासाठी आणि सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे व्यक्तीचा अहंकार वाढतो, मात्र समाधान व शांती लाभत नाही. जितका अहंकार, तितकी अशांती असते. मनुष्याच्या आयुष्यात संबंधांना फार महत्त्व आहे. संबंध खराब होऊ देऊ नका. जर खराब झाले तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. अहंकार हा संबंधांचा सर्वात मोठा शत्रू आहे. संबंधांचा कधीच स्वाभाविक मृत्यू होत नाही, त्यांची हत्याच होते. आपल्याला स्वत:चे अधिकार व दुसऱ्यांचे कर्तव्य जास्त आठवणीत राहतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संघर्ष, अशांती व वादाची स्थिती निर्माण होत आहे. संपत्ती जमा करण्याचा व अधिकार गाजविण्याचा नशा, ही संबंध बिघडविण्याचे सर्वात मोठे कारण बनते. कुठलाही कैदी शिक्षा किंवा हेटाळणीतून नाही, तर प्रेमाने बदलतो व सुधारतो. याचप्रकारे समाज व आयुष्यात कुठल्याही व्यक्तीबाबत हेटाळणीची प्रवृत्ती ही आपल्या लोकांसोबतच संबंध बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरते. साधना, समाधी आणि समता ठेवणारा व्यक्ती साधू बनतो, असा समज बनला आहे. प्रत्यक्षात दुसऱ्यांना मदत करणारा खऱ्या अर्थाने साधू म्हणवून घेण्याचा अधिकारी आहे.