शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

विजय रत्न सुंदर सूरीश्वरजींचा चातुर्मास आजही आठवणीत

By admin | Updated: January 26, 2017 02:48 IST

आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे

नागपूर : आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे. २०१२ साली चातुर्मासादरम्यान त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आयुष्याला खऱ्या अर्थाने सत्कारणी लावण्यासंदर्भातील बाबींवर प्रकाश टाकला होता. जाती, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या सान्निध्यात अक्षरश: प्रेरणासुमनांचा वर्षाव झाला. नागपुरातील चातुर्मासादरम्यानच्या उद्बोधनात आचार्यांनी शिक्षण व परमात्म्याच्या भक्तीवर भर दिला होता. २ जून २०१२ रोजी त्यांचे आगमन झाले तेव्हा शहरातील मान्यवर व जनता त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आली होती. प्रवचनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अमृतवाणीच्या धारा बरसल्या होत्या. देश आणि समाजहिताच्या कार्यांची अंमलबजावणी करीत असताना आपण काही मुद्यांवर गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. वेळेचे महत्त्व विशद करीत असताना त्यांनी ‘व्हिजन’च्या मुद्यावर भर दिला होता. संपत्तीच्या नावाखाली आपण पैसे जमा करण्यासाठी झटतो, मात्र वेळ सातत्याने सरत असते. त्या क्षणांना आपल्या सत्कृत्यांनी जतन करण्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते म्हणाले होते.(प्रतिनिधी) मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे प्रत्येक व्यक्ती वस्तू वाढविण्यासाठी आणि सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे व्यक्तीचा अहंकार वाढतो, मात्र समाधान व शांती लाभत नाही. जितका अहंकार, तितकी अशांती असते. मनुष्याच्या आयुष्यात संबंधांना फार महत्त्व आहे. संबंध खराब होऊ देऊ नका. जर खराब झाले तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. अहंकार हा संबंधांचा सर्वात मोठा शत्रू आहे. संबंधांचा कधीच स्वाभाविक मृत्यू होत नाही, त्यांची हत्याच होते. आपल्याला स्वत:चे अधिकार व दुसऱ्यांचे कर्तव्य जास्त आठवणीत राहतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संघर्ष, अशांती व वादाची स्थिती निर्माण होत आहे. संपत्ती जमा करण्याचा व अधिकार गाजविण्याचा नशा, ही संबंध बिघडविण्याचे सर्वात मोठे कारण बनते. कुठलाही कैदी शिक्षा किंवा हेटाळणीतून नाही, तर प्रेमाने बदलतो व सुधारतो. याचप्रकारे समाज व आयुष्यात कुठल्याही व्यक्तीबाबत हेटाळणीची प्रवृत्ती ही आपल्या लोकांसोबतच संबंध बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरते. साधना, समाधी आणि समता ठेवणारा व्यक्ती साधू बनतो, असा समज बनला आहे. प्रत्यक्षात दुसऱ्यांना मदत करणारा खऱ्या अर्थाने साधू म्हणवून घेण्याचा अधिकारी आहे.