शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

विजय रत्न सुंदर सूरीश्वरजींचा चातुर्मास आजही आठवणीत

By admin | Updated: January 26, 2017 02:48 IST

आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे

नागपूर : आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे. २०१२ साली चातुर्मासादरम्यान त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आयुष्याला खऱ्या अर्थाने सत्कारणी लावण्यासंदर्भातील बाबींवर प्रकाश टाकला होता. जाती, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या सान्निध्यात अक्षरश: प्रेरणासुमनांचा वर्षाव झाला. नागपुरातील चातुर्मासादरम्यानच्या उद्बोधनात आचार्यांनी शिक्षण व परमात्म्याच्या भक्तीवर भर दिला होता. २ जून २०१२ रोजी त्यांचे आगमन झाले तेव्हा शहरातील मान्यवर व जनता त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आली होती. प्रवचनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अमृतवाणीच्या धारा बरसल्या होत्या. देश आणि समाजहिताच्या कार्यांची अंमलबजावणी करीत असताना आपण काही मुद्यांवर गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. वेळेचे महत्त्व विशद करीत असताना त्यांनी ‘व्हिजन’च्या मुद्यावर भर दिला होता. संपत्तीच्या नावाखाली आपण पैसे जमा करण्यासाठी झटतो, मात्र वेळ सातत्याने सरत असते. त्या क्षणांना आपल्या सत्कृत्यांनी जतन करण्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते म्हणाले होते.(प्रतिनिधी) मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे प्रत्येक व्यक्ती वस्तू वाढविण्यासाठी आणि सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे व्यक्तीचा अहंकार वाढतो, मात्र समाधान व शांती लाभत नाही. जितका अहंकार, तितकी अशांती असते. मनुष्याच्या आयुष्यात संबंधांना फार महत्त्व आहे. संबंध खराब होऊ देऊ नका. जर खराब झाले तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. अहंकार हा संबंधांचा सर्वात मोठा शत्रू आहे. संबंधांचा कधीच स्वाभाविक मृत्यू होत नाही, त्यांची हत्याच होते. आपल्याला स्वत:चे अधिकार व दुसऱ्यांचे कर्तव्य जास्त आठवणीत राहतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संघर्ष, अशांती व वादाची स्थिती निर्माण होत आहे. संपत्ती जमा करण्याचा व अधिकार गाजविण्याचा नशा, ही संबंध बिघडविण्याचे सर्वात मोठे कारण बनते. कुठलाही कैदी शिक्षा किंवा हेटाळणीतून नाही, तर प्रेमाने बदलतो व सुधारतो. याचप्रकारे समाज व आयुष्यात कुठल्याही व्यक्तीबाबत हेटाळणीची प्रवृत्ती ही आपल्या लोकांसोबतच संबंध बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरते. साधना, समाधी आणि समता ठेवणारा व्यक्ती साधू बनतो, असा समज बनला आहे. प्रत्यक्षात दुसऱ्यांना मदत करणारा खऱ्या अर्थाने साधू म्हणवून घेण्याचा अधिकारी आहे.