शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विदर्भाचा समृद्ध वारसा उदासीनतेमुळे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST

नागपूर : देशातील महान राजवटींपैकी वाकाटकाचा समृद्ध इतिहास विदर्भाच्या भूमीत दडलेला आहे. कालिदासांची सांस्कृतिक परंपरा येथेच हाेती. आकाेट, पुसद, ...

नागपूर : देशातील महान राजवटींपैकी वाकाटकाचा समृद्ध इतिहास विदर्भाच्या भूमीत दडलेला आहे. कालिदासांची सांस्कृतिक परंपरा येथेच हाेती. आकाेट, पुसद, नगरधन ते रामटेकच्या नागार्जुन टेकडीपर्यंतचा वारसा आपल्याकडे आहे; मात्र सरकार आणि सामाजिक उदासीनतेमुळे संशाेधनाला प्राेत्साहनच मिळत नसल्याने या समृद्ध वारशांचा बराच ऐतिहासिक इतिहास अंधारातच दडलेला असल्याची खंत प्रसिद्ध पुरातत्त्व संशाेधन डाॅ. चंद्रशेखर गुप्त यांनी व्यक्त केली.

विदर्भ संशाेधन मंडळाच्या ८८ व्या स्थापना दिनानिमित्त मंडळाच्या डाॅ. मिराशी सभागृहात डाॅ. गुप्त यांच्या विशेष व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले. विदर्भाच्या रायाने घडविला अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १० चा दर्शनी भाग, या त्यांच्या संशाेधनात्मक विषयावर विस्तृतपणे प्रकाश टाकला. अकाेल्याजवळच्या आकाेट येथे २००० वर्षांपूर्वी वास्तव्यास असलेल्या कटाहदिनाे या राजानेच लेणी क्रमांक १० चे प्रवेशद्वार बांधल्याचा दावा त्यांनी केला. ही माहिती मिळविताना आलेल्या अडचणीबाबत त्यांनी सांगितले. अनेक वर्ष पुरातत्त्व संशाेधकासाठी हे आव्हान हाेते आणि हे आव्हान आकाेटमध्ये येऊन संपले. मात्र गुजरातच्या अहमदाबादमधील एका व्यापाऱ्याकडून मिळालेल्या नाण्याचा शाेध घेत औरंगाबाद व पुढे आकाेटपर्यंतचा प्रवास गुंतागुंतीचा हाेता, असेही त्यांनी सांगितले.

खरंतर आकाेट हे एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि अनेक गाेष्टी या मातीत दडल्या आहेत. यवतमाळजवळचे पुसद हेही ठिकाण इतिहासाने भरलेले आहे. रामटेकजवळ नागार्जुन टेकडीचे सविस्तर उत्खनन केले तर नागार्जुनांच्या आयुर्वेद परंपरेचे भंडार खुले हाेऊ शकते. वाकाटक राजवटीचा बराच इतिहास बाहेर येणे बाकी आहे. सातवाहन राजवटीचे तारही विदर्भाशी जुळतात. छत्तीसगडमध्ये मिळालेल्या एका ताम्रपटावर विदर्भ असा उल्लेख सापडला हाेता. हा सर्व दडलेला इतिहास उत्खनन व संशाेधन केल्यावरच बाहेर येणे शक्य आहे; मात्र संशाेधनासाठी कुणाचेही सहकार्य मिळत नसल्याने ताे दडलेलाच असल्याची अशी खंत डाॅ. गुप्त यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन व नियाेजन मंडळाचे व्यवस्थापक डाॅ. शेषशयन देशमुख यांनी केले.

सरकारची मदत, ना प्रायाेजक

डाॅ. शेषशयन देशमुख म्हणाले, पुणे, मुंबईत पुरातत्त्व व ऐतिहासिक संशाेधनासाठी अनेक उद्याेजक प्रायाेजक म्हणून पुढे येत असतात. सरकारचीही भरीव मदत मिळते. विदर्भातील संशाेधनाबाबत मात्र प्रचंड उदासीनता आहे. या मंडळाला कधीकाळी वसंतदादा पाटील, निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक अशा मुख्यमंत्र्यांनी भेटी देऊन मदतीचा विश्वास दिला हाेता. दुर्दैवाने असा उदारपणा आता काेणताच मुख्यमंत्री दाखवत नाही. मंडळाच्या कामासाठी निधीही मिळत नाही. काही दानदात्यांच्या भरवशावर मंडळाचा डाेलारा उभा आहे. अशाने संशाेधन करणे कसे शक्य आहे, अशी व्यथा डाॅ. देशमुख यांनी व्यक्त केली.