शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

इनोव्हेशनमुळे दूर होईल विदर्भाची गरीबी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:48 IST

इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देइनोव्हेशन पर्वमध्ये नागपूर स्टार्टअप फेस्टचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाचा प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे. जंगलातील, शेतीतील उत्पादनावर संशोधन करण्याची गरज आहे. या क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमधून इनोव्हेशन केल्यास शेतकरी, आदिवासींना लाभ मिळेल आणि हजारो तरुणांना रोजगारही मिळेल. इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.नागपूर महानगरपालिका व मेयर इनोव्हेशन कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व २०१९’ अंतर्गत ‘नागपूर स्टार्टअप फेस्ट’चे नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इनोव्हेशन डायरेक्टर मोहीत गंभीर, मराठी चित्रपट अभिनेता संदीप कुळकर्णी, भारत गणेशपुरे, गीतकार संदीप नाथ तसेच मनपा आयुक्त अभिजित बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, केतन मोहीतकर, चेत जैन, नगरसेविका गार्गी चोपडा आदी उपस्थित होते.नितीन गडकरी पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मिळणाऱ्या मोह, बांबू, रतनजोत, करंज आदींपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता असून त्यावर प्रयोग सुरू आहेत. भंडारा, चंद्रपूर भागात धानकटाईनंतर निघणारी तणस तसेच नॅपीयर गवत आणि नागपुरात मटन मार्केट व भाजी बाजारातून निघणाºया टाकाउ पदार्थापासून मोठ्या प्रमाणात ‘बॉयो-सीएनजी’ तयार करण्याचा प्रयोग वेगात सुरू आहे. हे सीएनजी पेट्रोल-डिझेलसाठी पर्याय ठरणारा आहे. या सीएनजीवर महापालिकेच्या बसेस, ट्रक आणि विमाने चालविण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात इथेनॉल व बॉयोसीएनजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू होणार असून येत्या ५ वर्षात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे डिझेलमुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पाच वर्षात ५० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी संत्रा बर्फीचा प्रयोग, उसाच्या टाकाऊ पदार्थापासून साबण, लघवीपासून युरिया खत बनविण्यासह अनेक संकल्पनांची यादीच सांगितली. आपल्याकडे गुणवत्ता, पैसा व तंत्रज्ञानाचीही कमी नाही, कमतरता आहे केवळ आत्मविश्वासाची. गुणवत्ता, क्षमता व कौशल्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे बॉयोसीएनजी प्रकल्प साकारला जात असून मनपाच्या ३५० बसेस, १५० ट्रक येत्या ३ महिन्यात संचालित करण्यात येणार असून यातून मनपाचे वर्षाला ६० कोटी रुपये वाचतील, अशी माहिती त्यांनी दिली.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtechnologyतंत्रज्ञान