शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

इनोव्हेशनमुळे दूर होईल विदर्भाची गरीबी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:48 IST

इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देइनोव्हेशन पर्वमध्ये नागपूर स्टार्टअप फेस्टचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाचा प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे. जंगलातील, शेतीतील उत्पादनावर संशोधन करण्याची गरज आहे. या क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमधून इनोव्हेशन केल्यास शेतकरी, आदिवासींना लाभ मिळेल आणि हजारो तरुणांना रोजगारही मिळेल. इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.नागपूर महानगरपालिका व मेयर इनोव्हेशन कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व २०१९’ अंतर्गत ‘नागपूर स्टार्टअप फेस्ट’चे नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इनोव्हेशन डायरेक्टर मोहीत गंभीर, मराठी चित्रपट अभिनेता संदीप कुळकर्णी, भारत गणेशपुरे, गीतकार संदीप नाथ तसेच मनपा आयुक्त अभिजित बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, केतन मोहीतकर, चेत जैन, नगरसेविका गार्गी चोपडा आदी उपस्थित होते.नितीन गडकरी पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मिळणाऱ्या मोह, बांबू, रतनजोत, करंज आदींपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता असून त्यावर प्रयोग सुरू आहेत. भंडारा, चंद्रपूर भागात धानकटाईनंतर निघणारी तणस तसेच नॅपीयर गवत आणि नागपुरात मटन मार्केट व भाजी बाजारातून निघणाºया टाकाउ पदार्थापासून मोठ्या प्रमाणात ‘बॉयो-सीएनजी’ तयार करण्याचा प्रयोग वेगात सुरू आहे. हे सीएनजी पेट्रोल-डिझेलसाठी पर्याय ठरणारा आहे. या सीएनजीवर महापालिकेच्या बसेस, ट्रक आणि विमाने चालविण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात इथेनॉल व बॉयोसीएनजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू होणार असून येत्या ५ वर्षात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे डिझेलमुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पाच वर्षात ५० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी संत्रा बर्फीचा प्रयोग, उसाच्या टाकाऊ पदार्थापासून साबण, लघवीपासून युरिया खत बनविण्यासह अनेक संकल्पनांची यादीच सांगितली. आपल्याकडे गुणवत्ता, पैसा व तंत्रज्ञानाचीही कमी नाही, कमतरता आहे केवळ आत्मविश्वासाची. गुणवत्ता, क्षमता व कौशल्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे बॉयोसीएनजी प्रकल्प साकारला जात असून मनपाच्या ३५० बसेस, १५० ट्रक येत्या ३ महिन्यात संचालित करण्यात येणार असून यातून मनपाचे वर्षाला ६० कोटी रुपये वाचतील, अशी माहिती त्यांनी दिली.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtechnologyतंत्रज्ञान