शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विदर्भाच्या स्वप्नाचा महाल उजाड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST

तीन-तीन महिन्यांच्या एक्स्टेंशनवर कर्मचारी करताहेत काम लोकमत न्यूज नेटवर्क कमल शर्मा नागपूर : एकेकाळी विदर्भाच्या विकासाच्या मुद्यावर राज्य सरकारला ...

तीन-तीन महिन्यांच्या एक्स्टेंशनवर कर्मचारी करताहेत काम

लोकमत न्यूज नेटवर्क

कमल शर्मा

नागपूर : एकेकाळी विदर्भाच्या विकासाच्या मुद्यावर राज्य सरकारला वेसण घालणारे विदर्भ विकास मंडळ सध्या सुस्त पडले आहे. कार्यकाळ विस्ताराची मंजुरी न मिळाल्याने मंडळ सुस्त पडले आहे. प्रभावहीन झाले आहे. कर्मचारी रोज येतात. परंतु त्यांच्याकडे कुठलेही विशेष काम नाही. नाईलाजाने टाइमपास करावा लागतो. वरून या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या भविष्याची चिंताही सतावत आहे. मागील १४ महिन्यांपासून या कार्यालयाद्वारे विदर्भाच्या समस्यांसदर्भात कुठलेही संशोधन झालेले नाही. अध्ययनही बंद पडले आहे. एकूणच विदर्भाच्या स्वप्नांचा हा महाल उजाड पडला आहे.

३० एप्रिल २००० रोजी राज्यातील तिन्ही विकास मंडळ- विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. १४ महिन्यानंतरही कार्यकाळ विस्ताराचा निर्णय न झाल्याने आता मंडळाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता कार्यकाळ कायम ठेवण्यासाठी राष्ट्रपतींचे आदेश आवश्यक झाले आहे. विकास मंडळात कार्यरत अधिकारी-कर्मचारी सुद्धा आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. येथे एकूण १७ पदे मंजूर आहेत. ४ पद रिक्त पडले आहेत. उर्वरित १३ अधिकारी-कर्मचारी दररोज कार्यालयात येत आहेत. जॉईंट डायरेक्टरचे पदही येत्या ३० तारखेला सेवानिवृत्तीमुळे रिक्त होईल.

कधीकाळी या कार्यालयाच्या मार्फत विदर्भाचे प्रश्न, समस्या यांवर विशेषज्ज्ञांची टीम अहवाल तयार करायची. विदर्भावर अभ्यास व्हायचा. सरकारकडून झालेले अन्याय पुढे आणले जायचे. परंतु आता ही सर्व कामे ठप्प पडली आहेत. कर्मचाऱ्यांकडे आता कुठलेही काम नाही. विशेष निधीचा हिशेब केला जात असल्याचे केवळ सांगण्यापुरतेच आहे. मंडळाची अवस्था पाहून विदर्भातील जिल्हाधिकारी सुद्धा त्यांचे ऐकत नाही. तीन जिल्ह्यांनी हिशेब सुद्धा दिलेला नाही. अशा परिस्थितीत केवळ कार्यालयात येणे आणि घरी जाणे इतकेच काम उरले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या १४ महिन्यांपासून तीन-तीन महिन्यांचे एक्स्टेंशन मिळत आहे. ३१ जुलै रोजी एक्स्टेंशनचा कालावधी समाप्त होईल. अशा परिस्थितीत सरकार पुन्हा एक्स्टेंशन देईल की त्यांना इतर कार्यालयात पाठवले जाईल, हे स्पष्ट नाही. कर्मचारी आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत.

कार्यालय परिसरात श्वानांचा वावर

मंडळाची इमारत अतिशय देखणी व सुसज्ज आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. दिवंगत मधुकरराव किम्मतकर यांच्या नावाने विदर्भाशी संबंधित पुस्तकांचे वाचनालय सुद्धा आहे. परंतु याचा काहीही उपयोग होत नाही आहे. वरून पार्किंगच्या जागेत आणि पायऱ्यांवर श्वानांचा वावर वाढला आहे.