शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य

By admin | Updated: May 2, 2015 02:20 IST

विदर्भाचा विकास हवा असेल तर प्रत्येकाने आपल्या घरावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकाविला पाहिजे.

नागपूर : विदर्भाचा विकास हवा असेल तर प्रत्येकाने आपल्या घरावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकाविला पाहिजे. गेली ५५ वर्षे विदर्भ उपेक्षित, मागासलेला व अनुशेष वाढवित राहिला आहे. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. यामुळे वेगळ्या विदर्भासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा तीव्र करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत विदर्भ कनेक्टच्यावतीने अर्थात ‘व्ही कॅन’ने शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सेंट्रल बाजार रोडवरील विष्णूजी की रसोई येथे विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांच्या हस्ते विदर्भाचा झेंडा फडकविला. यावेळी ते बोलत होते. ‘व्ही कॅन’तर्फे विदर्भातील ११ ही जिल्ह्यात एकाचवेळी विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला. अ‍ॅड. समर्थ म्हणाले, खोटी आश्वासने देऊन राज्यकर्त्यांनी त्यांचे राजकीय हेतू साध्य केले. वैदर्भीयांच्या भावनांचा विचार न करता महाराष्ट्रात समावेश करण्यात आला. मात्र, विकास होणे तर दूर उलट अन्यायच झाला. वेगळ्या राज्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विदर्भ कनेक्ट ही संघटना स्थापन करण्यात आली. वेगळ्या राज्याविना विदर्भाचा आर्थिक, सामाजिक विकास शक्य नाही. आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम होणार नाही, असे कारण नेहमीच समोर करण्यात येते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वैदर्भीय साधनसंपन्नता दर्शवणारा पंचरंगी झेंडा तयार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, विदर्भ जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, वेदचे सचिव राहूल उपगन्लावार, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे समन्वयक दीपक निलावार, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, प्रवीण महाजन, ललित खुल्लर, सारंग उपगन्लावार, ए.के. गांधी, माजी पोलीस महासंचालक पी.के.बी. चक्र वती, जयंती पटेल, विदर्भ कनेक्टचे सचिव दिनेश नायडू, तेजिंदरसिंग रेणू, सुधीर पालीवाल, संदेश सिंगलकर, तुषार मंडलेकर, समीर फाले, चंद्रगुप्त समर्थ, अक्षय सुदामे व इतर मान्यवर उपस्थित होते. सिंदखेडराजा येथे मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता व विदर्भ कनेक्टचे संरक्षक श्रीहरी अणे यानी झेंडा फडकवला. त्यासोबतच महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्यात आला. (प्रतिनिधी)