शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य

By admin | Updated: May 2, 2015 02:20 IST

विदर्भाचा विकास हवा असेल तर प्रत्येकाने आपल्या घरावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकाविला पाहिजे.

नागपूर : विदर्भाचा विकास हवा असेल तर प्रत्येकाने आपल्या घरावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकाविला पाहिजे. गेली ५५ वर्षे विदर्भ उपेक्षित, मागासलेला व अनुशेष वाढवित राहिला आहे. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. यामुळे वेगळ्या विदर्भासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा तीव्र करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत विदर्भ कनेक्टच्यावतीने अर्थात ‘व्ही कॅन’ने शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सेंट्रल बाजार रोडवरील विष्णूजी की रसोई येथे विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांच्या हस्ते विदर्भाचा झेंडा फडकविला. यावेळी ते बोलत होते. ‘व्ही कॅन’तर्फे विदर्भातील ११ ही जिल्ह्यात एकाचवेळी विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला. अ‍ॅड. समर्थ म्हणाले, खोटी आश्वासने देऊन राज्यकर्त्यांनी त्यांचे राजकीय हेतू साध्य केले. वैदर्भीयांच्या भावनांचा विचार न करता महाराष्ट्रात समावेश करण्यात आला. मात्र, विकास होणे तर दूर उलट अन्यायच झाला. वेगळ्या राज्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विदर्भ कनेक्ट ही संघटना स्थापन करण्यात आली. वेगळ्या राज्याविना विदर्भाचा आर्थिक, सामाजिक विकास शक्य नाही. आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम होणार नाही, असे कारण नेहमीच समोर करण्यात येते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वैदर्भीय साधनसंपन्नता दर्शवणारा पंचरंगी झेंडा तयार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, विदर्भ जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, वेदचे सचिव राहूल उपगन्लावार, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे समन्वयक दीपक निलावार, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, प्रवीण महाजन, ललित खुल्लर, सारंग उपगन्लावार, ए.के. गांधी, माजी पोलीस महासंचालक पी.के.बी. चक्र वती, जयंती पटेल, विदर्भ कनेक्टचे सचिव दिनेश नायडू, तेजिंदरसिंग रेणू, सुधीर पालीवाल, संदेश सिंगलकर, तुषार मंडलेकर, समीर फाले, चंद्रगुप्त समर्थ, अक्षय सुदामे व इतर मान्यवर उपस्थित होते. सिंदखेडराजा येथे मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता व विदर्भ कनेक्टचे संरक्षक श्रीहरी अणे यानी झेंडा फडकवला. त्यासोबतच महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्यात आला. (प्रतिनिधी)