शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात सर्पदंशाचे मृत्यू वाऱ्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भामध्ये मागील साडेचार वर्षामध्ये सुमारे ९,५७० व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यापैकी शंभरांवर नागरिकांचा मृत्यू झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भामध्ये मागील साडेचार वर्षामध्ये सुमारे ९,५७० व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यापैकी शंभरांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. साप हा प्राणी वनविभागाच्या शेड्यूलमध्ये आहे. त्याच्या संरक्षणासाठी कायदा असला तरी सर्पदंशाने झालेल्या मृत्यूनंतर संबंधिताच्या कुटुंबीयांना मदतीसाठी वनविभाग किंवा सरकारकडे कसलेही प्रावधान नाही.

सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांची एमएलसी (मेडिकल लिगल केस) अशी नोंद होत नाही. ही नोंद घेण्यासंदर्भात डॉक्टरांमध्ये संभ्रम आहे. अपवादात्मक स्थितीतच अशा नोंदी होतात. अशी नोंद न झाल्याने रुग्णांना सर्पदंशावरील उपचार पैसे मोजून करून घ्यावे लागतात. साप हा प्राणी वनविभागाच्या वन्यजीव यादीत आहे. याच यादीत वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे यांचाही समावेश आहे. एवढेच नाही तर गिधाडांनी विणीच्या काळात घरटे बांधलेल्या नारळाच्या झाडांचे नुकसान केल्यास भरपाईची तरतूद आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास १५ लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास किंवा गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. जनावरांचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये यापेक्षा कमी असणारी रक्कम देण्याचीही तरतूद आहे. याच प्राण्यांच्या यादीमध्ये सापांचाही समावेश आहे. मात्र त्यांच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास वनविभागाकडून नुकसानभरपाई मात्र मिळत नाही, तशी तरतूद नसल्याचे सांगितले जाते.

...

शेतकऱ्यांची व्यथा कधी ऐकणार?

पावसाळ्यात शिवारात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात. अनेकदा जनावरांना किंवा माणसांना सर्पदंश होण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्या घटना घडतात. ऐन हंगामात असे घडल्यावर शेतकऱ्यांचा आधारच तुटतो. बैलांअभावी शेतीचा हंगामच पडण्याचे प्रसंग येतात. अशा घटनांची नोंद करूनही नुकसानभरपाई मात्र मिळत नाही.

...

कोट

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही अनेकदा मांडला आहे. मुख्यमंत्री, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनालाही निवेदने दिली. तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही. साप मारणे हा गुन्हा ठरत असेल तर सर्पदंशानंतर वनविभागाने नुकसानभरपाई द्यायलाच हवी.

- राम नेवले, माजी प्रांताध्यक्ष, शेतकरी संघटना