शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

विदर्भात सर्पदंशाचे मृत्यू वाऱ्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भामध्ये मागील साडेचार वर्षामध्ये सुमारे ९,५७० व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यापैकी शंभरांवर नागरिकांचा मृत्यू झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भामध्ये मागील साडेचार वर्षामध्ये सुमारे ९,५७० व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यापैकी शंभरांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. साप हा प्राणी वनविभागाच्या शेड्यूलमध्ये आहे. त्याच्या संरक्षणासाठी कायदा असला तरी सर्पदंशाने झालेल्या मृत्यूनंतर संबंधिताच्या कुटुंबीयांना मदतीसाठी वनविभाग किंवा सरकारकडे कसलेही प्रावधान नाही.

सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांची एमएलसी (मेडिकल लिगल केस) अशी नोंद होत नाही. ही नोंद घेण्यासंदर्भात डॉक्टरांमध्ये संभ्रम आहे. अपवादात्मक स्थितीतच अशा नोंदी होतात. अशी नोंद न झाल्याने रुग्णांना सर्पदंशावरील उपचार पैसे मोजून करून घ्यावे लागतात. साप हा प्राणी वनविभागाच्या वन्यजीव यादीत आहे. याच यादीत वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे यांचाही समावेश आहे. एवढेच नाही तर गिधाडांनी विणीच्या काळात घरटे बांधलेल्या नारळाच्या झाडांचे नुकसान केल्यास भरपाईची तरतूद आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास १५ लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास किंवा गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. जनावरांचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये यापेक्षा कमी असणारी रक्कम देण्याचीही तरतूद आहे. याच प्राण्यांच्या यादीमध्ये सापांचाही समावेश आहे. मात्र त्यांच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास वनविभागाकडून नुकसानभरपाई मात्र मिळत नाही, तशी तरतूद नसल्याचे सांगितले जाते.

...

शेतकऱ्यांची व्यथा कधी ऐकणार?

पावसाळ्यात शिवारात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात. अनेकदा जनावरांना किंवा माणसांना सर्पदंश होण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्या घटना घडतात. ऐन हंगामात असे घडल्यावर शेतकऱ्यांचा आधारच तुटतो. बैलांअभावी शेतीचा हंगामच पडण्याचे प्रसंग येतात. अशा घटनांची नोंद करूनही नुकसानभरपाई मात्र मिळत नाही.

...

कोट

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही अनेकदा मांडला आहे. मुख्यमंत्री, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनालाही निवेदने दिली. तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही. साप मारणे हा गुन्हा ठरत असेल तर सर्पदंशानंतर वनविभागाने नुकसानभरपाई द्यायलाच हवी.

- राम नेवले, माजी प्रांताध्यक्ष, शेतकरी संघटना