शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पर्जन्यमानात १४ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अन्य विभागांच्या तुलनेत यंदा विदर्भातील पर्जन्यमानामध्ये १४ टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर महिना उजाडला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अन्य विभागांच्या तुलनेत यंदा विदर्भातील पर्जन्यमानामध्ये १४ टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी पाऊस मेहरबान नाही. विदर्भातील अनेक प्रकल्पही अद्याप भरलेले नाहीत. वातावरणातील दमटपणामुळे पिकांवर कीड वाढली असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकल्यासारखी स्थिती आहे.

विदर्भातील नागपूर आणि अमरावती या दोन्ही विभागात पावसाची स्थिती वाईट आहे. नागपूर विभागात आतापर्यंत ८६.३ टक्के पाऊस पडला असून अमरावती विभागातील पावसाची टक्केवारी १००.४ आहे. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही विभागात पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात पावसाने बरीच ओढ दिली आहे. टक्केवारी अधिक दिसत असूनही ऑगस्टमध्ये शेतीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. या उलट जून आणि जुलै महिन्यातील अतिरिक्त पावसाने संत्रा व मोसंबी पिकांचे नुकसानच अधिक झाले आहे. आता नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांना फळगळीच्या समस्येने ग्रासले आहे.

...

विदर्भातील पाऊस (टक्के)

जिल्हा - जून - जुलै - ऑगस्ट

वर्धा - १४३.३ - ९५.३ - ५७.४

नागपूर - १२०.८ - १०१.९ - ५८.९

भंडारा - १३८.७ - ८९.३ - ५०.५

गोंदिया - १०८.८ - ८७.७ - ५३.०

चंद्रपूर - १६७.१ - १३३.८ - ५१.७

गडचिरोली - ८९.३ - ९८.९ - ५९.६

बुलडाणा - १३१.० - ९८.५ - ६६.८

अकोला - ६९.६ - १३७.५ - ६१.९

वाशिम - १४३.९ - १२१.७ - ६८.९

अमरावती - १४६.७ - ७७.० - ४५.८

यवतमाळ - १७०.८ - १०७.३ - ८८.६

...

नैसर्गिक आपत्ती आणि किडीने शेतकरी वैतागला

- विदर्भातील शेतकऱ्यांपुढे जेवढे पावसाचे संकट आहे, तेवढेच पिकांवरील किडीचेही आहे. कापसावर गुलाबी बोंड अळीने थैमान घातले आहे. मावा, तुडतुडेही पीक फस्त करीत आहेत. सोयाबीनवर खोडअळींचे आक्रमण मागील महिन्यात होते. आता खोडमाशीसोबत उंटअळी, चक्रीभुंगाही आला आहे. धान पिकांवर पिवळ्या खोडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे संत्रा बागेतील फळगळ ३० ते ४० टक्क्यांवर असल्याने या नगदी पिकावर संक्रात आली आहे.

- जून, जुलै महिन्यातील अतिवृष्टीने अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील काही तालुक्यात पिकांचे नुकसान आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील पिकांचे नुुकसान झाले आहे. दोन्ही विभागात पंचनाम्याची कामे सुरू आहेत.

...

प्रकल्पातील पाणीसाठा (टक्के)

विभाग - मोठे प्रकल्प - मध्यम प्रकल्प - लघु प्रकल्प

अमरावती - (१०) ८२.८९ - (२५) ६२.४४ - (४११) २४.६२

नागपूर - (१६) ५९.५ - (४२) ३२.८६ - (३२६) २०.१५

...