शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

विदर्भाच्या मुद्यावर वैदर्भीय आमदार गप्प

By admin | Updated: December 16, 2015 03:20 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करणाऱ्या पक्षाचे राज्यात शासन आहे.

मंत्रिपदाचा लोभ : शिवसेना अखंड महाराष्ट्रासाठी आक्रमककमल शर्मा नागपूरविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करणाऱ्या पक्षाचे राज्यात शासन आहे. यामुळे विदर्भवासीयांच्या त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पण विधानसभेत मंगळवारी जे काही झाले त्यातून वेगळेच संकेत मिळत आहेत. शासनात सहभागी शिवसेनेने अखंड महाराष्ट्राच्या समर्थनार्थ नारे दिले. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. दुसऱ्या बाजूने ‘आॅन दि रेकॉर्ड’ व ‘आॅफ दि रेकॉर्ड’ विदर्भप्रेमाचा दावा करणारे आमदार मात्र शांत बसून राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावे लागले. सभागृहात ते एकटे पडले होते.हा प्रकार मंगळवारी दुपारी लक्षवेधी प्रस्तावावरील चर्चेनंतर घडला. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विदर्भावरील वक्तव्यावरून शिवसेना आमदार विधानसभेत आक्रमक झाले होते. आमदार प्रताप सरनाईक यांनी अणे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव सादर करून राज्य शासनाला अडचणीत आणले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रस्ताव फेटाळला. यामुळे शिवसेना आमदारांनी वेलमध्ये गोळा होऊन निदर्शने केली. बागडे यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन करण्यास सांगितले. तेव्हाही शिवसेना सदस्यांची निदर्शने सुरूच होती. काही वेळाने ते शांत होऊन आपापल्या आसनावर बसले. यादरम्यान विदर्भातील एकाही आमदाराने तोंड उघडले नाही. कोठूनही जय विदर्भ असा आवाज निघाला नाही. हा उलटफेर आश्चर्यकारक होता. कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना आमदार अखंड महाराष्ट्राचे नारे देत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आले होते, तेव्हा विदर्भवादी आमदारांनी जय विदर्भाचे नारे लावून त्यांना उत्तर दिले होते. यामुळे आठ दिवसांमध्ये असे काय घडले ज्यामुळे विदर्भवादी आमदारांची तोंडे बंद झाली, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. आतली चर्चा अशी आहे की, मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. काय म्हटले शिवसेनेनेप्रताप सरनाईक यांनी प्रस्ताव सादर करताना सांगितले की, ‘विदर्भ गाथा’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अणे यांनी महाराष्ट्र विरोधी वक्तव्य केले. महाधिवक्तापदावर कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या बाजूने बोलायला पाहिजे. यामुळे अणे यांनी विधानसभेत येऊन क्षमा मागावी, अन्यथा शासनाने त्यांना पदावरून काढून टाकावे. माजी महाधिवक्ता खंबाटा यांनाही क्षमा मागावी लागली होती.शासन माहिती घेत आहे- फडणवीसशासन श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याची माहिती घेत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.