शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदर्भ, मेल, दुरांतो रद्द, तीन रेल्वेगाड्या वळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 21:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे ...

ठळक मुद्देकसारा घाटात रेल्वे रुळ गेले वाहुन : प्रवासी अडकले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे टिटवाळा-कसारा रेल्वे सेक्शनमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम नागपूरच्या रेल्वेगाड्यांवरही पडला. विशेष म्हणजे विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांची गैरसोय झाली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे मुंबईवरून गुरुवारी मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी या गाड्या नागपुरात येणार नाहीत. नागपूरवरून गुरुवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई मेल नियोजित वेळेनुसार नियोजित मार्गाने रवाना करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी नागपूरवरून रवाना झालेली नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस भुसावळपर्यंत चालविण्यात आली तर गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस चाळीसगावपर्यंत चालविण्यात आली. त्याच प्रमाणे नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकमध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. या तीन्ही गाड्यांपैकी दुरांतो एक्स्प्रेस आणि विदर्भ एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन नागपुरात आल्या तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकवरून नागपूरसाठी रवाना करण्यात आली

वळविलेल्या मार्गाने धावल्या रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा स्पेशल ही गाडी वळविलेल्या वसई रोड, नंदुरबार, जळगाव या मार्गाने चालविली. तर पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस फेस्टिव्हल स्पेशल आणि हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशलला वळविलेल्या जळगाव, नंदुरबार, वसई रोड या मार्गाने चालविण्यात आले. त्यामुळे या गाड्या विलंबाने धावल्या असून प्रवाशांची गैरसोय झाली.

रेल्वेस्थानकावर हेल्पलाईन बूथ, बसेसची व्यवस्था

मुसळधार पावसामुळे वळविलेल्या मार्गाने आणि शॉर्ट टर्मिनेट झालेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर पॅसेंजर हेल्पलाईन बूथ सुरु करण्यात आले. याशिवाय गैरसोय झालेल्या प्रवाशांसाठी चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुंबई रेल्वे प्रशासनाने २९ बसेसमधून १२९० प्रवाशांना कसारावरून कल्याणला रवाना केले तर ४४ बसेसच्या माध्यमातून २८६० प्रवाशांना इगतपुरीवरून कल्याणला आणण्यात आले. भुसावळ आणि चाळीसगावमध्ये शॉर्ट टर्मिनेट झालेल्या दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसच्या ५३० प्रवाशांना परत नागपूरला पाठविण्यात आले.

३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट, ४८ रद्द

मध्य रेल्वे झोनने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे तसेच रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे महाराष्ट्रातील ३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट कराव्या लागल्या तर ५१ रेल्वेगाड्या शॉर्ट टर्मिनेट, ४८ रेल्वेगाड्या रद्द आणि १४ रेल्वेगाड्या शॉर्ट ओरिजनेट करण्यात आल्या.

मुसळधार पावसामुळे प्रवास केला रद्द

‘मुंबईला महत्वाच्या कामासाठी जात होतो. जाताना नागपूर-मुंबई दुरांतोचे आणि येताना मुंबई-नागपूर दुरांतोचे कन्फर्म तिकीट होते. परंतु मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अडकुन पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.’

-निखील बोंडे, प्रवासी

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर