शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

खेळणी उद्योग निर्मितीमध्ये विदर्भाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:03 IST

पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाला वाव देण्याचा उल्लेख केल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. या व्यवसायाची आखणी करताना विदर्भाचा विचार झाल्यास येथील बेरोजगारांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षित क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या बांबू, चिनी माती देऊ शकते आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात असलेला बांबू, भद्रावतीमधील चिनी मातीची कला, कच्चा माल आणि उद्योगासाठी असलेले पोषक वातावरण आणि पुरेसे मनुष्यबळ लक्षात घेता विदर्भामध्ये खेळणी निर्मिती उद्योगाला वाव आहे. तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये खेळणी उद्योगाचा उल्लेख केला होता.घरोघरी लहान मुलांना खेळणी भुरळ घालत असली तरी हा खेळणी उद्योग मात्र अनेक कारणांनी दुर्लक्षित ठरला आहे.पुरेसे भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ, तांत्रिक मार्गदर्शन न मिळाल्याने आणि बाहेरून आलेल्या खेळण्यांनी बाजारपेठा व्यापल्याने स्थानिक निर्मित खेळणी काळाच्या ओघात मागे पडत गेली. पूर्वी बांबूपासून विविध प्रकारची खेळणी बाजारपेठेत येत असत. त्यामधून बांबू कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध होत असे. विशेष म्हणजे ही खेळणी पर्यावरणपूरकही असायची. भद्रावतीमध्ये चिनी मातीची खेळणी तयार करण्याचा एके काळी मोठा व्यवसाय होता. विनोबा भावे यांच्याकडून या व्यवसायाला प्रोत्साहनही मिळाले होते. आता या व्यवसायाला अवकळा आली आहे. पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाला वाव देण्याचा उल्लेख केल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. या व्यवसायाची आखणी करताना विदर्भाचा विचार झाल्यास येथील बेरोजगारांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.खेळणी डिझायनर तज्ज्ञ सुहासिनी पॉल यांच्या मते, भारतात नावीन्यपूर्ण, सुरक्षित, जागतिक स्तरावरील कमी खर्चातून खेळणी तयार केली जाऊ शकतात. डिझाईन, तंत्रज्ञान आणि उत्पादन या तीन क्षेत्रांचा मेळ घालून भारताने ‘डिझाईन इन इंडिया'वर लक्ष केंद्रित केले तर लवकरच खेळण्यांच्या चिनी आयातीवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. भारत बिग टॉय मार्केट आणि जगाला पुरवठादार म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. चीनमध्ये सर्वात कमी किमतीच्या कच्च्या मालापासून तर उत्तम मालापर्यंतच्या वापरातून उच्च प्रतीची आणि महागडी अशी सर्व प्रकारची खेळणी तयार केली जातात. योग्य प्रशिक्षणातून यावर गृहोद्योग चालतो. पुरवठादार ही खेळणी निर्यात करतात. बजेटच्या मुद्यांमुळे ती स्वस्त पडतात, त्यामुळे बाजारात या खेळण्यांना मागणी असते. यावर विदर्भाचा बांबू मात करू शकतो. बांबूपासून निर्मित इलेक्ट्रॉनिक खेळणी विकसित केली तर ती अधिक लोकप्रिय होतील. यात प्लास्टिक किंवा फायबरचा अधिक वापर नसल्याने ती पर्यावरणपुरकही असतील.ठरू शकतो सूर्योदययावर भर दिल्यास विदर्भातील खेळणी उद्योगासाठी हा सूर्योदय ठरू शकतोे. सरकारने या उद्योगास अधिक कार्यक्षम करण्यासाठी खेळणी डिझायनरच्या सहभागातून टॉय डिझाईन सेंटरची स्थापना करावी. चांगल्या व नावीन्यपूर्ण डिझाईन्स देणाऱ्या उद्योगांना अनुदान द्यावे. स्थानिकांना सुट्या भागांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षित करावे. खेळण्यांच्या सुरक्षिततेच्या खात्रीसाठी आयएसआय मार्कची अंमलबजावणी केली जावी. यातून ‘मेड इन इंडिया’ खेळण्यांचा स्वीकार वाढेल.जागतिक बाजारपेठेचा मेळ घालून आणि त्यांचे आकर्षण लक्षात घेऊन पारंपरिक खेळण्यांमध्ये आपण नवीनता आणू शकतो. पर्यावरणाला अनुकूल आणि कमी खर्चाची खेळणी तयार करू शकतो, याचा प्रशिक्षित डिझायनर म्हणून मला विश्वास आहे.- सुहासिनी पॉल, टॉय डिझाईन तज्ज्ञ

टॅग्स :businessव्यवसाय