शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

खेळणी उद्योग निर्मितीमध्ये विदर्भाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:03 IST

पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाला वाव देण्याचा उल्लेख केल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. या व्यवसायाची आखणी करताना विदर्भाचा विचार झाल्यास येथील बेरोजगारांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षित क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या बांबू, चिनी माती देऊ शकते आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात असलेला बांबू, भद्रावतीमधील चिनी मातीची कला, कच्चा माल आणि उद्योगासाठी असलेले पोषक वातावरण आणि पुरेसे मनुष्यबळ लक्षात घेता विदर्भामध्ये खेळणी निर्मिती उद्योगाला वाव आहे. तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये खेळणी उद्योगाचा उल्लेख केला होता.घरोघरी लहान मुलांना खेळणी भुरळ घालत असली तरी हा खेळणी उद्योग मात्र अनेक कारणांनी दुर्लक्षित ठरला आहे.पुरेसे भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ, तांत्रिक मार्गदर्शन न मिळाल्याने आणि बाहेरून आलेल्या खेळण्यांनी बाजारपेठा व्यापल्याने स्थानिक निर्मित खेळणी काळाच्या ओघात मागे पडत गेली. पूर्वी बांबूपासून विविध प्रकारची खेळणी बाजारपेठेत येत असत. त्यामधून बांबू कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध होत असे. विशेष म्हणजे ही खेळणी पर्यावरणपूरकही असायची. भद्रावतीमध्ये चिनी मातीची खेळणी तयार करण्याचा एके काळी मोठा व्यवसाय होता. विनोबा भावे यांच्याकडून या व्यवसायाला प्रोत्साहनही मिळाले होते. आता या व्यवसायाला अवकळा आली आहे. पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाला वाव देण्याचा उल्लेख केल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. या व्यवसायाची आखणी करताना विदर्भाचा विचार झाल्यास येथील बेरोजगारांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.खेळणी डिझायनर तज्ज्ञ सुहासिनी पॉल यांच्या मते, भारतात नावीन्यपूर्ण, सुरक्षित, जागतिक स्तरावरील कमी खर्चातून खेळणी तयार केली जाऊ शकतात. डिझाईन, तंत्रज्ञान आणि उत्पादन या तीन क्षेत्रांचा मेळ घालून भारताने ‘डिझाईन इन इंडिया'वर लक्ष केंद्रित केले तर लवकरच खेळण्यांच्या चिनी आयातीवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. भारत बिग टॉय मार्केट आणि जगाला पुरवठादार म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. चीनमध्ये सर्वात कमी किमतीच्या कच्च्या मालापासून तर उत्तम मालापर्यंतच्या वापरातून उच्च प्रतीची आणि महागडी अशी सर्व प्रकारची खेळणी तयार केली जातात. योग्य प्रशिक्षणातून यावर गृहोद्योग चालतो. पुरवठादार ही खेळणी निर्यात करतात. बजेटच्या मुद्यांमुळे ती स्वस्त पडतात, त्यामुळे बाजारात या खेळण्यांना मागणी असते. यावर विदर्भाचा बांबू मात करू शकतो. बांबूपासून निर्मित इलेक्ट्रॉनिक खेळणी विकसित केली तर ती अधिक लोकप्रिय होतील. यात प्लास्टिक किंवा फायबरचा अधिक वापर नसल्याने ती पर्यावरणपुरकही असतील.ठरू शकतो सूर्योदययावर भर दिल्यास विदर्भातील खेळणी उद्योगासाठी हा सूर्योदय ठरू शकतोे. सरकारने या उद्योगास अधिक कार्यक्षम करण्यासाठी खेळणी डिझायनरच्या सहभागातून टॉय डिझाईन सेंटरची स्थापना करावी. चांगल्या व नावीन्यपूर्ण डिझाईन्स देणाऱ्या उद्योगांना अनुदान द्यावे. स्थानिकांना सुट्या भागांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षित करावे. खेळण्यांच्या सुरक्षिततेच्या खात्रीसाठी आयएसआय मार्कची अंमलबजावणी केली जावी. यातून ‘मेड इन इंडिया’ खेळण्यांचा स्वीकार वाढेल.जागतिक बाजारपेठेचा मेळ घालून आणि त्यांचे आकर्षण लक्षात घेऊन पारंपरिक खेळण्यांमध्ये आपण नवीनता आणू शकतो. पर्यावरणाला अनुकूल आणि कमी खर्चाची खेळणी तयार करू शकतो, याचा प्रशिक्षित डिझायनर म्हणून मला विश्वास आहे.- सुहासिनी पॉल, टॉय डिझाईन तज्ज्ञ

टॅग्स :businessव्यवसाय