शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाची रुग्णसंख्या ९८ हजारावर; २,४३५ पॉझिटिव्ह, ९३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:53 IST

नागपूर जिल्ह्यात चाचण्या कमी झाल्या. त्यामुळे बाधितांची नोंदही कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. ४४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांची संख्या १,७०२ वर गेली आहे.

ठळक मुद्देनागपुरात १००२, अमरावतीत ३११, गोंदियात २५९, चंद्रपुरात २०० तर यवतमाळात १९८ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावातील सात महिन्यात विदर्भात रुग्णांची संख्या ९८ हजारावर गेली आहे. यात सोमवारी २,४३५ नव्या रुग्णांची भर पडली तर ९३ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ९८,८३५ झाली असून मृतांची संख्या २,६३० वर पोहचली आहे. नागपुरात ४४, यवतमाळमध्ये नऊ, भंडाऱ्यामध्ये आठ, चंद्रपूर व वर्ध्यामध्ये प्रत्येकी सात मृत्यू झाले.नागपूर जिल्ह्यात चाचण्या कमी झाल्या. त्यामुळे बाधितांची नोंदही कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. ४४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांची संख्या १,७०२ वर गेली आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारी ४०० वर रुग्णांची नोंद झाली असताना ३११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णांची संख्या ९,०८५ झाली असून सहा मृत्यूंनी मृतांची संख्या २०४ वर गेली आहे.

गोंदिया जिल्ह्यातही रुग्णसंख्येचा वेग वाढला आहे. २५९ रुग्ण पॉझिटिव्ह तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३,४१७ तर मृतांची संख्या ५१ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या २०० वर जात आहे. रुग्णसंख्या ६,०५८ झाली असून सात रुग्णांच्या मृत्यूंनी बळींची संख्या ७८ वर पोहचली आहे.

अकोला जिल्ह्यात १११ रुग्णांची नोंद झाली तर पाच रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५,७३१ तर मृतांची संख्या १८६ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून चार रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या १,६६२ तर मृतांची संख्या सात झाली आहे. सर्वात कमी मृत्यू याच जिल्ह्यात झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ५,०३६ वर गेली आहे.

वाशीम जिल्ह्यात ७२ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या २,८७६ तर मृतांची संख्या ५५ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची संख्या ६५ झाली आहे. जिल्ह्यात ८२ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या २,९६० झाली आहे. वर्धा जिल्ह्यात सात मृत्यू व ५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २,६२९ झाली तर मृतांची संख्या ५४ वर पोहचली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस