शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विदर्भाची रुग्णसंख्या ९८ हजारावर; २,४३५ पॉझिटिव्ह, ९३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:53 IST

नागपूर जिल्ह्यात चाचण्या कमी झाल्या. त्यामुळे बाधितांची नोंदही कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. ४४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांची संख्या १,७०२ वर गेली आहे.

ठळक मुद्देनागपुरात १००२, अमरावतीत ३११, गोंदियात २५९, चंद्रपुरात २०० तर यवतमाळात १९८ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावातील सात महिन्यात विदर्भात रुग्णांची संख्या ९८ हजारावर गेली आहे. यात सोमवारी २,४३५ नव्या रुग्णांची भर पडली तर ९३ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ९८,८३५ झाली असून मृतांची संख्या २,६३० वर पोहचली आहे. नागपुरात ४४, यवतमाळमध्ये नऊ, भंडाऱ्यामध्ये आठ, चंद्रपूर व वर्ध्यामध्ये प्रत्येकी सात मृत्यू झाले.नागपूर जिल्ह्यात चाचण्या कमी झाल्या. त्यामुळे बाधितांची नोंदही कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. ४४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांची संख्या १,७०२ वर गेली आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारी ४०० वर रुग्णांची नोंद झाली असताना ३११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णांची संख्या ९,०८५ झाली असून सहा मृत्यूंनी मृतांची संख्या २०४ वर गेली आहे.

गोंदिया जिल्ह्यातही रुग्णसंख्येचा वेग वाढला आहे. २५९ रुग्ण पॉझिटिव्ह तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३,४१७ तर मृतांची संख्या ५१ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या २०० वर जात आहे. रुग्णसंख्या ६,०५८ झाली असून सात रुग्णांच्या मृत्यूंनी बळींची संख्या ७८ वर पोहचली आहे.

अकोला जिल्ह्यात १११ रुग्णांची नोंद झाली तर पाच रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५,७३१ तर मृतांची संख्या १८६ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून चार रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या १,६६२ तर मृतांची संख्या सात झाली आहे. सर्वात कमी मृत्यू याच जिल्ह्यात झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ५,०३६ वर गेली आहे.

वाशीम जिल्ह्यात ७२ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या २,८७६ तर मृतांची संख्या ५५ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची संख्या ६५ झाली आहे. जिल्ह्यात ८२ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या २,९६० झाली आहे. वर्धा जिल्ह्यात सात मृत्यू व ५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २,६२९ झाली तर मृतांची संख्या ५४ वर पोहचली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस