शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विदर्भात पुढचे पाच दिवस गारपीट, अवकाळीचे सावट, नागपुरात सर्वाधिक घसरला पारा

By निशांत वानखेडे | Updated: April 23, 2023 19:50 IST

विदर्भात उन्हाळी की पावसाळा हेच कळेना झाले आहे.

नागपूर : विदर्भात उन्हाळी की पावसाळा हेच कळेना झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले अवकाळीचे सत्र पुढचे पाच दिवस पुन्हा सुरू राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २७ एप्रिलपर्यंत विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांचे गर्जन व वादळासह गारपीटही हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर दाेन दिवस ढगाळ वातावरण राहिल व पुढे परिस्थिती सुधारण्याचा अंदाज आहे.

यावर्षी १० एप्रिलपासून काही दिवस उन्हाचे चटके त्रासदायक ठरले हाेते. दिवसाचा पारा ३९ ते ४१ अंशाच्या आसपास राहिला. १९ एप्रिल राेजी नागपूरचे तापमान ४२ अंशावर गेले, जे या उन्हाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक हाेते. विदर्भात चंद्रपूर, ब्रम्हपुरीसह अकाेला, वर्धा, वाशिम या शहरांचा पारा ४३ अंशाच्या वर गेला हाेता. २० एप्रिलपासून अवकाळीचे ढग आकाशात जमा झाले आणि पारा खाली घसरत गेला.रविवारी नागपूरचे कमाल तापमान सर्वाधिक ६ अंशाने घसरत ३५.३ अंशावर आले. त्यामुळे दिवसभर ढगांची गर्दी नसली तरी उन्हाची तीव्र जाणीव झाली नाही. शनिवारी गारपीटीसह पावसाने हजेरी लावली हाेती. त्यामुळे रविवारी सकाळी ८.३० वाजता पर्यंत नागपुरात १५.५ मिमी पावसाची नाेंद झाली. सकाळीही पावसाचे किरकाेळ थेंब पडले. त्यानंतर दिवसभर उघडीप दिली. त्यामुळे पावसासह उन्हापासूनही दिलासा मिळाला. शहरात रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा ५.५ अंशाने घसरत १९.४ अंशावर पाेहचले. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

नागपूरसह विदर्भातही पाऱ्याच्या घसरणीचा क्रम सुरू आहे. गाेंदियात ५.१ अंशाने घसरत ३५.५ अंश, वर्ध्यात ४.७ अंशाने घसरत ३७ अंश, चंद्रपुरात ३.८ अंशाने घसरत ३८.२ अंश तर अमरावती, अकाेल्यात ३.६ व ३.२ अंशाने घसरत ३७ व ३८.३ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. सर्व शहरात रात्रीचा पाराही २ ते ६ अंशापर्यंत घसरत २० ते २२ अंशापर्यंत नाेंदविण्यात आला आहे. वादळ व विजांची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सावधगिरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.