शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विदर्भ, दुरांतो अन् राजधानी एक्सप्रेस फुल्ल; दिवाळीनंतरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 19:22 IST

Train Nagpur News कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.

ठळक मुद्देकेवळ तीनच रेल्वेगाड्यात मिळतेय आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दिवाळीचा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपापल्या गावाकडे आले. परंतु परतीच्या प्रवासात मात्र त्यांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.

दिवाळीनंतर केवळ तीन ते चार रेल्वेगाड्यातच बर्थ रिकामे आहेत. विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे त्यामुळे विदर्भ आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये वेटिंग ची स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना दिवाळीनंतर आपापल्या कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी खासगी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

या गाड्या आहेत फुल्ल

नागपुरातून जाणाऱ्या ०२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस, ०२८३३ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, ०२२९६ दानापूर बंगलोर संघमित्रा एक्सप्रेस, ०२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस, ०२६९१ बंगळूर नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आदी गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांच्या हाती वेटिंगचे तिकीट पडत असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता आहे.

या गाड्यात आहेत बर्थ शिल्लक

नागपुरातून जाणाऱ्या नागपूर जबलपुर एक्सप्रेस या गाडीतही ३०० च्या वर शिल्लक आहेत. रेल्वे गाडी क्रमांक ०२२८५ सिकंदराबाद निजामुद्दीन एक्सप्रेस या गाडीत तसेच ०२६२५ केरला एक्सप्रेस मध्येही प्रवाशांना आरक्षण मिळत आहे.

१२५ पैकी ६० गाड्याच सुरू

कोरोनचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी नागपुरातून १२५ च्या जवळपास रेल्वेगाड्या धावत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेल्वेत मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ६० विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. नियमित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतला नाही.

दिवाळी छ्ट पूजेमुळे आरक्षण फुल्ल

दिवाळी आणि  छट पूजेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. दिवाळी मधील गर्दी आणि छट पूजा संपल्यानंतर परिस्थिती पूर्वीसारखी होईल.

_एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे नागपूर विभाग

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे