शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, दुरांतो अन् राजधानी एक्सप्रेस फुल्ल; दिवाळीनंतरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 19:22 IST

Train Nagpur News कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.

ठळक मुद्देकेवळ तीनच रेल्वेगाड्यात मिळतेय आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दिवाळीचा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपापल्या गावाकडे आले. परंतु परतीच्या प्रवासात मात्र त्यांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.

दिवाळीनंतर केवळ तीन ते चार रेल्वेगाड्यातच बर्थ रिकामे आहेत. विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे त्यामुळे विदर्भ आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये वेटिंग ची स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना दिवाळीनंतर आपापल्या कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी खासगी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

या गाड्या आहेत फुल्ल

नागपुरातून जाणाऱ्या ०२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस, ०२८३३ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, ०२२९६ दानापूर बंगलोर संघमित्रा एक्सप्रेस, ०२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस, ०२६९१ बंगळूर नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आदी गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांच्या हाती वेटिंगचे तिकीट पडत असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता आहे.

या गाड्यात आहेत बर्थ शिल्लक

नागपुरातून जाणाऱ्या नागपूर जबलपुर एक्सप्रेस या गाडीतही ३०० च्या वर शिल्लक आहेत. रेल्वे गाडी क्रमांक ०२२८५ सिकंदराबाद निजामुद्दीन एक्सप्रेस या गाडीत तसेच ०२६२५ केरला एक्सप्रेस मध्येही प्रवाशांना आरक्षण मिळत आहे.

१२५ पैकी ६० गाड्याच सुरू

कोरोनचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी नागपुरातून १२५ च्या जवळपास रेल्वेगाड्या धावत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेल्वेत मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ६० विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. नियमित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतला नाही.

दिवाळी छ्ट पूजेमुळे आरक्षण फुल्ल

दिवाळी आणि  छट पूजेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. दिवाळी मधील गर्दी आणि छट पूजा संपल्यानंतर परिस्थिती पूर्वीसारखी होईल.

_एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे नागपूर विभाग

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे