शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकास मंडळ : एक वर्षानंंतर स्वीकारले अध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:28 IST

विदर्भाच्या विकासाला नवीन दिशा देण्यासाठी राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार गठित विदर्भ विकास मंडळाची स्वत:चीच दिशा व दशा खराब झाली आहे. याचे उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. मंडळाच्या अध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून तब्बल वर्षभरानंतर पदभार ग्रहण केला.

ठळक मुद्देचैनसुख संचेती यांनी स्वीकारला पदभार, १२ जून २०१८ रोजी नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या विकासाला नवीन दिशा देण्यासाठी राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार गठित विदर्भ विकास मंडळाची स्वत:चीच दिशा व दशा खराब झाली आहे. याचे उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. मंडळाच्या अध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून तब्बल वर्षभरानंतर पदभार ग्रहण केला.राज्य सरकारने १२ जून २०१८ रोजी भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांना विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. परंतु त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. भाजपा सूत्रानुसार, संचेती यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असा अंदाज लावला जात होता. परंतु राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त आहे. या वर्षभरात असे अनेकांना वाटत होते की, राज्य सरकार दुसऱ्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवेल. परंतु त्यांनीही संचेती यांची प्रतीक्षा केली.संचेती यांनी सोमवारी सायंकाळी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाला ३ मार्च २०१५ नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाला आहे. माजी आमदार प्रकाश डहाके हे निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद प्रभारी म्हणून विभागीय आयुक्त सांभाळत आले आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबर २०११ पासून २५ नोव्हेंबर २०१३ रोजी पद सांभाळेपर्यंत विभागीय अध्यक्षांकडेच अध्यक्षपदाचा प्रभार होता. २३ सप्टेंबर २००६ ते १२ सप्टेंबर २०११ पर्यंत आ. तुकाराम बिरकड हे विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष होते. प्रा. राम मेघे, अरुण अडसड व हर्षवर्धन देशमुख यांनीही अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणारविदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले की, ते मंडळाच्या माध्यमातून विदर्भ विकासाचा प्रयत्न करतील. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या माध्यमातून प्रलंबित समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. यावेळी मंडळाच्या कार्यकारी मंडळातील तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण आणि सहसंचालक प्रकाश डायरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे प्रशासनिक अधिकारी ईश्वर निवांत, चित्रा मेश्रे, वनिता सराफ, प्रवीण साळी आणि अनुराग नागराज उपस्थित होते. संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून वर्ष १९९५ , १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये विधानसभेत निवडून आले आहेत.

 

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळChainsukh Sanchetiचैनसुख संचेती