शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

विदर्भ विकास मंडळ : एक वर्षानंंतर स्वीकारले अध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:28 IST

विदर्भाच्या विकासाला नवीन दिशा देण्यासाठी राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार गठित विदर्भ विकास मंडळाची स्वत:चीच दिशा व दशा खराब झाली आहे. याचे उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. मंडळाच्या अध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून तब्बल वर्षभरानंतर पदभार ग्रहण केला.

ठळक मुद्देचैनसुख संचेती यांनी स्वीकारला पदभार, १२ जून २०१८ रोजी नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या विकासाला नवीन दिशा देण्यासाठी राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार गठित विदर्भ विकास मंडळाची स्वत:चीच दिशा व दशा खराब झाली आहे. याचे उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. मंडळाच्या अध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून तब्बल वर्षभरानंतर पदभार ग्रहण केला.राज्य सरकारने १२ जून २०१८ रोजी भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांना विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. परंतु त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. भाजपा सूत्रानुसार, संचेती यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असा अंदाज लावला जात होता. परंतु राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त आहे. या वर्षभरात असे अनेकांना वाटत होते की, राज्य सरकार दुसऱ्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवेल. परंतु त्यांनीही संचेती यांची प्रतीक्षा केली.संचेती यांनी सोमवारी सायंकाळी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाला ३ मार्च २०१५ नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाला आहे. माजी आमदार प्रकाश डहाके हे निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद प्रभारी म्हणून विभागीय आयुक्त सांभाळत आले आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबर २०११ पासून २५ नोव्हेंबर २०१३ रोजी पद सांभाळेपर्यंत विभागीय अध्यक्षांकडेच अध्यक्षपदाचा प्रभार होता. २३ सप्टेंबर २००६ ते १२ सप्टेंबर २०११ पर्यंत आ. तुकाराम बिरकड हे विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष होते. प्रा. राम मेघे, अरुण अडसड व हर्षवर्धन देशमुख यांनीही अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणारविदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले की, ते मंडळाच्या माध्यमातून विदर्भ विकासाचा प्रयत्न करतील. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या माध्यमातून प्रलंबित समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. यावेळी मंडळाच्या कार्यकारी मंडळातील तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण आणि सहसंचालक प्रकाश डायरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे प्रशासनिक अधिकारी ईश्वर निवांत, चित्रा मेश्रे, वनिता सराफ, प्रवीण साळी आणि अनुराग नागराज उपस्थित होते. संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून वर्ष १९९५ , १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये विधानसभेत निवडून आले आहेत.

 

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळChainsukh Sanchetiचैनसुख संचेती