शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कापूस आणि धान अस्मानी तर सोयाबीन सुलतानी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 11:47 IST

निकृष्ट बियाणे, भारनियमन, बेभरवशाचा पाऊस, तुडतुडा, मावा किंवा बोंडअळी या किड्यांनी फस्त केलेले उभे पीक आणि शेतमालाला बाजारात पडत्या भावाने मिळणारी किंमत आणि डोक्यावर असलेले कर्ज ही सगळी परिस्थिती यंदा शेतकºयांना पुन्हा गळफासाकडेच नेणारी असल्याचे चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणीबाबत शेतकºयांत भयशासकीय खरेदी केंद्रांची सुस्त तर व्यापारी मस्तशेतकºयांना पुन्हा गळफासाकडे नेणारी परिस्थिती

आॅनलाईन लोकमतनागपूर: गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या भागातील शेतकºयांसमोरची परिस्थिती बिकट झाली आहे.सोयाबीनचे पीक शेतकºयांच्या सध्या हातात आहे. मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकºयाला पडता भाव स्वीकारावा लागतो आहे. खरेदी केंद्रांवर नेलेले शेकडो क्विंटल सोयाबीन परत आणावे लागते आहे. शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये एवढा हमीभाव दिला असला तरी, शासन खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. व्यापारी त्याला अडवून धरत पडेल किंमतीत माल विकत घेत आहेत.शासकीय केंद्रांवर खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणीकरिता लागणारी कागदपत्रे जमवता जमवता शेतकºयांची पुरेवाट होते. नोंदणी झाल्यावर संथ गतीने शेतमाल खरेदी केला जातो आणि त्याचे चुकारे पुन्हा त्याच संथ गतीने दिले जातात. या सगळ््या काळात शेतकºयांनी आपला आर्थिक व्यवहार कसा चालवायचा हा एक मोठा प्रश्नच असतो.जी गोष्ट सोयाबीनची तीच कापसाचीही आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे उत्पादन घटले तर परतीच्या पावसानेही सोयाबीनचे नुकसान झाले आहे. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेमुळे शेतकºयांमध्ये या वर्षी फवारणीबाबत भय निर्माण झाले आहे. कित्येक ठिकाणी हेल्मेट घालून फवारणी करताना शेतकरी दिसत आहेत.यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केलेले आहे. ढगाळ वातावरण व लगेचच उन पडणे या प्रतिकूल वातावरणाचा फटका पीकाला बसतो आहे.विदर्भात धानाच्या पिकावर तुडतुडा या रोगाने प्रचंड आक्रमण केल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील उभे पीक फस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील धानपीकाला तुडतुडा रोगाची लागण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या लहरीपणामूळे धान पिकावर मावा, तुडतुडा, करपा, घाटे अळी, लाल्या, बेरड रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झाला असून धान पिके धोक्यात आली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी