शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कापूस आणि धान अस्मानी तर सोयाबीन सुलतानी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 11:47 IST

निकृष्ट बियाणे, भारनियमन, बेभरवशाचा पाऊस, तुडतुडा, मावा किंवा बोंडअळी या किड्यांनी फस्त केलेले उभे पीक आणि शेतमालाला बाजारात पडत्या भावाने मिळणारी किंमत आणि डोक्यावर असलेले कर्ज ही सगळी परिस्थिती यंदा शेतकºयांना पुन्हा गळफासाकडेच नेणारी असल्याचे चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणीबाबत शेतकºयांत भयशासकीय खरेदी केंद्रांची सुस्त तर व्यापारी मस्तशेतकºयांना पुन्हा गळफासाकडे नेणारी परिस्थिती

आॅनलाईन लोकमतनागपूर: गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या भागातील शेतकºयांसमोरची परिस्थिती बिकट झाली आहे.सोयाबीनचे पीक शेतकºयांच्या सध्या हातात आहे. मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकºयाला पडता भाव स्वीकारावा लागतो आहे. खरेदी केंद्रांवर नेलेले शेकडो क्विंटल सोयाबीन परत आणावे लागते आहे. शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये एवढा हमीभाव दिला असला तरी, शासन खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. व्यापारी त्याला अडवून धरत पडेल किंमतीत माल विकत घेत आहेत.शासकीय केंद्रांवर खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणीकरिता लागणारी कागदपत्रे जमवता जमवता शेतकºयांची पुरेवाट होते. नोंदणी झाल्यावर संथ गतीने शेतमाल खरेदी केला जातो आणि त्याचे चुकारे पुन्हा त्याच संथ गतीने दिले जातात. या सगळ््या काळात शेतकºयांनी आपला आर्थिक व्यवहार कसा चालवायचा हा एक मोठा प्रश्नच असतो.जी गोष्ट सोयाबीनची तीच कापसाचीही आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे उत्पादन घटले तर परतीच्या पावसानेही सोयाबीनचे नुकसान झाले आहे. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेमुळे शेतकºयांमध्ये या वर्षी फवारणीबाबत भय निर्माण झाले आहे. कित्येक ठिकाणी हेल्मेट घालून फवारणी करताना शेतकरी दिसत आहेत.यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केलेले आहे. ढगाळ वातावरण व लगेचच उन पडणे या प्रतिकूल वातावरणाचा फटका पीकाला बसतो आहे.विदर्भात धानाच्या पिकावर तुडतुडा या रोगाने प्रचंड आक्रमण केल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील उभे पीक फस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील धानपीकाला तुडतुडा रोगाची लागण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या लहरीपणामूळे धान पिकावर मावा, तुडतुडा, करपा, घाटे अळी, लाल्या, बेरड रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झाला असून धान पिके धोक्यात आली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी