शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांच्या मतांचे विमान परत ‘क्रॅश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:14 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विदर्भवाद्यांना परत एकदा ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विदर्भवाद्यांना परत एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार नितीन रोंघे यांना विदर्भवादी पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला होता. मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील तीन ‘ग्रुप्स’मधील एकूण सदस्यांइतकी मतेदेखील त्यांना मिळू शकली नाहीत. एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालांतून समोर आले. ‘सोशल मीडिया’वर मोठमोठे दावे करणारे विदर्भवादी प्रत्यक्ष लढाईच्या वेळी का माघारतात तसेच विदर्भ चळवळीचे नेमके नुकसान कोण करत आहे, हे प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.

नितीन रोंघे यांनी प्रचारादरम्यान मोठमोठे दावे केले होते. रोंघे यांना विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य पार्टी, बळीराजा पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, केंद्रीय जनविकास पार्टीने समर्थन जाहीर केले होते. याशिवाय अनेक विदर्भवादी संघटना व कार्यकर्तेदेखील त्यांच्यासोबत होते. माझ्यामुळे निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा प्रचारात आला व तोच मुद्दा महत्त्वाचा ठरेल असेदेखील ते म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र मतपत्रिकांमध्ये ना विदर्भाचा जाज्वल्य अभिमान दिसला ना विदर्भ चळवळीसंदर्भात पाठिंबा दिसून आला. नितीन रोंघे यांना केवळ ५२२ मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत तर त्यांना अवघी ६६ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीत १६२ मतांपर्यंत ते पोहोचले. विदर्भाच्या मातीत झालेल्या निवडणुकीत विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला इतकी कमी मते मिळणे, ही बाबच आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

लोकसभेतदेखील झाली होती दयनीय अवस्था

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांत विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येत विदर्भ राज्य निर्माण महामंच स्थापन केला. मात्र निकालांत मंचच्या उमेदवारांचे कुठेच अस्तित्वही जाणवले नाही. सातही जागांवरील उमेदवारांची जमानत जप्त झाली होती. बुलडाणा, गडचिरोली व यवतमाळात मंचला उमेदवार सापडलेच नव्हते.

विदर्भाचा मुद्दाच पडला मागे

राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विदर्भाच्या आंदोलनाला गती मिळाली होती. मात्र कालांतराने हे आंदोलन ‘सोशल मीडिया’वरच मर्यादित राहिले. काही ठिकाणी तर प्रचारासाठी पुरेसे कार्यकर्तेदेखील नसल्याचे असे चित्र होते. प्रचारादरम्यान मोठ्या राजकीय पक्षांतर्फे विदर्भाचा मुद्दा बाजूलाच ठेवण्यात आला. विदर्भवाद्यांकडून विदर्भाच्या नावावर विविध आंदोलने करण्यात येतात. मात्र सातत्याने उपस्थितांची संख्या रोडावताना दिसून येत आहे. विदर्भाच्या नावावर काही संघटना प्रसिद्धी मिळवत असल्या तरी जनतेचे जास्तीत जास्त समर्थन मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न दिसून येत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीतदेखील विदर्भवादी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत हवे त्या प्रमाणात पोहोचलेच नाहीत. ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर त्यांचा भर होता. मात्र पदवीधरची निवडणूक, प्रचारतंत्र व मतदारांची मानसिकता ते समजूच शकले नाहीत.

आम्ही स्वतंत्र राज्याचा विषय जागविला : रोंघे

मागील जवळपास एका महिन्याच्या काळात आम्ही नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत प्रचार करून मते मागितली. या निवडणुकीत आम्ही विदर्भाच्या विकास आणि स्वतंत्र विदर्भ राज्य हा विषय पुनरुज्जीवित केल्याचा आम्हाला आनंद आहे. दुर्दैवाने आम्ही त्यांना मतांमध्ये परिवर्तित करू शकलो नाही, असे प्रतिपादन नितीन रोंघे यांनी केले.