शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विदर्भवाद्यांच्या मतांचे विमान परत ‘क्रॅश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:14 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विदर्भवाद्यांना परत एकदा ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विदर्भवाद्यांना परत एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार नितीन रोंघे यांना विदर्भवादी पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला होता. मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील तीन ‘ग्रुप्स’मधील एकूण सदस्यांइतकी मतेदेखील त्यांना मिळू शकली नाहीत. एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालांतून समोर आले. ‘सोशल मीडिया’वर मोठमोठे दावे करणारे विदर्भवादी प्रत्यक्ष लढाईच्या वेळी का माघारतात तसेच विदर्भ चळवळीचे नेमके नुकसान कोण करत आहे, हे प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.

नितीन रोंघे यांनी प्रचारादरम्यान मोठमोठे दावे केले होते. रोंघे यांना विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य पार्टी, बळीराजा पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, केंद्रीय जनविकास पार्टीने समर्थन जाहीर केले होते. याशिवाय अनेक विदर्भवादी संघटना व कार्यकर्तेदेखील त्यांच्यासोबत होते. माझ्यामुळे निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा प्रचारात आला व तोच मुद्दा महत्त्वाचा ठरेल असेदेखील ते म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र मतपत्रिकांमध्ये ना विदर्भाचा जाज्वल्य अभिमान दिसला ना विदर्भ चळवळीसंदर्भात पाठिंबा दिसून आला. नितीन रोंघे यांना केवळ ५२२ मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत तर त्यांना अवघी ६६ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीत १६२ मतांपर्यंत ते पोहोचले. विदर्भाच्या मातीत झालेल्या निवडणुकीत विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला इतकी कमी मते मिळणे, ही बाबच आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

लोकसभेतदेखील झाली होती दयनीय अवस्था

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांत विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येत विदर्भ राज्य निर्माण महामंच स्थापन केला. मात्र निकालांत मंचच्या उमेदवारांचे कुठेच अस्तित्वही जाणवले नाही. सातही जागांवरील उमेदवारांची जमानत जप्त झाली होती. बुलडाणा, गडचिरोली व यवतमाळात मंचला उमेदवार सापडलेच नव्हते.

विदर्भाचा मुद्दाच पडला मागे

राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विदर्भाच्या आंदोलनाला गती मिळाली होती. मात्र कालांतराने हे आंदोलन ‘सोशल मीडिया’वरच मर्यादित राहिले. काही ठिकाणी तर प्रचारासाठी पुरेसे कार्यकर्तेदेखील नसल्याचे असे चित्र होते. प्रचारादरम्यान मोठ्या राजकीय पक्षांतर्फे विदर्भाचा मुद्दा बाजूलाच ठेवण्यात आला. विदर्भवाद्यांकडून विदर्भाच्या नावावर विविध आंदोलने करण्यात येतात. मात्र सातत्याने उपस्थितांची संख्या रोडावताना दिसून येत आहे. विदर्भाच्या नावावर काही संघटना प्रसिद्धी मिळवत असल्या तरी जनतेचे जास्तीत जास्त समर्थन मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न दिसून येत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीतदेखील विदर्भवादी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत हवे त्या प्रमाणात पोहोचलेच नाहीत. ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर त्यांचा भर होता. मात्र पदवीधरची निवडणूक, प्रचारतंत्र व मतदारांची मानसिकता ते समजूच शकले नाहीत.

आम्ही स्वतंत्र राज्याचा विषय जागविला : रोंघे

मागील जवळपास एका महिन्याच्या काळात आम्ही नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत प्रचार करून मते मागितली. या निवडणुकीत आम्ही विदर्भाच्या विकास आणि स्वतंत्र विदर्भ राज्य हा विषय पुनरुज्जीवित केल्याचा आम्हाला आनंद आहे. दुर्दैवाने आम्ही त्यांना मतांमध्ये परिवर्तित करू शकलो नाही, असे प्रतिपादन नितीन रोंघे यांनी केले.