शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विदर्भातील ७५ टक्के कृषिपंप जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 10:34 IST

कृषिपंपांच्या जोडण्यांचा अनुशेष शिल्लक नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात असले तरी विदर्भातील अर्थात नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्ह्यात ७५ टक्के कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे८ महिन्यात २५ टक्के जोडण्या उद्दिष्ट ४१ हजारांचे, जोडण्या फक्त १० हजारांवर

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषिपंपांच्या जोडण्यांचा अनुशेष शिल्लक नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात असले तरी विदर्भातील अर्थात नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्ह्यात ७५ टक्के कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. विदर्भातील जवळपास सर्वच परिमंडळात ही स्थिती असल्याने आणि येत्या मार्चपर्यंत संपूर्ण जोडण्या देणे शक्य नसल्याने पुढच्या वर्षी अनुशेषात भर पडण्याचीच शक्यता अधिक आहे.नागपूर परिक्षेत्रामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडळांचा समावेश होतो. या पाचही परिमंडळांमिळून ३१ मार्च २०१९ पर्यंत ४१ हजार ७४३ कृषिपंपांना जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १ नोव्हेंबरपर्यंत फक्त १० हजार ८३३ जोडण्या देण्यातच वीज कंपनीला यश आले आहे. हा विचार करता जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांनाच जोडण्या मिळाल्या असून अद्याप ७५ टक्के शेतकरी प्रतीक्षेत आहेत.२०१० पासून या प्रलंबित वीज कृषिपंपांच्या जोडण्या मागे पडण्यात भर पडत चालली आहे. २०१० ते २०१५ या काळात अनुशेषाची संख्या कमी होती. मात्र २०१५ नंतर ही संख्या झपाट्याने वाढल्याचे अर्थात मागणीही वाढल्याचे वीज कंपनीच्या अहवालात दिसत आहे.

सौर कृषिपंपातही मागेजानेवारी-२०१९ पासून राज्यात सौर कृषिपंप देण्याची योजना सरकारने लागू केली. त्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील अर्थात विदर्भातील ११ जिल्ह्यांना २५ हजार पंपांचे उद्दिष्ट दिले होते. त्यासाठी अनुदानही मंजूर केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ५० हजार १७ अर्ज ऑनलाईन आले होते. त्यापैकी ३३ हजार ५५ अर्ज पात्र ठरले. या ११ महिन्याच्या काळामध्ये फक्त २ हजार १६७ सौर कृषिपंपांच्या जोडण्या झाल्या आहेत तर ८२६ सौर पंपांचे काम प्रगतिपथावर असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती