शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

उपेक्षांचे शिकार नागपुरातील इतवारी शहीद स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:01 IST

स्वातंत्र्यापूर्वी वर्ष १९४२ च्या आंदोलनाच्या इतिहासाला उजाळा देणारे इतवारी येथील शहीद स्मारक उपेक्षांचे शिकार ठरले आहे. स्मारक आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभे आहे. शहिदांची आठवण होईल, असा एकही कार्यक्रम या ठिकाणी होत नाही. शहराची धरोहर असलेल्या स्मारकाची देखरेख, दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे हे स्मारक इतिहासाच्या नोंदीतून नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : कचऱ्याचा ढीग, रेतीचे पोते, पावभाजीचे ठेले व खुर्च्या, साफसफाईकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यापूर्वी वर्ष १९४२ च्या आंदोलनाच्या इतिहासाला उजाळा देणारे इतवारी येथील शहीद स्मारक उपेक्षांचे शिकार ठरले आहे. स्मारक आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभे आहे. शहिदांची आठवण होईल, असा एकही कार्यक्रम या ठिकाणी होत नाही. शहराची धरोहर असलेल्या स्मारकाची देखरेख, दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे हे स्मारक इतिहासाच्या नोंदीतून नाहीसे होण्याची भीती निर्माण झाली आहे.स्मारकाचे विदु्रपीकरणसदर प्रतिनिधीने ऐतिहासिक स्मारकाची पाहणी केली असता, अनेक दिवसांपासून स्मारकाच्या परिसराची साफसफाई न झाल्यामुळे सभोवताल कचऱ्याचा ढीग दिसून आला. परिसराच्या एका कोपऱ्यात रेतीचे पोते तर एका बाजूला पावभाजी ठेलेचालकांच्या प्लास्टिकच्या खुर्च्या होत्या. स्मारकाच्या परिसरात कुत्रे आराम करीत होते. स्मारकाच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. काही असामाजिक तत्त्वांनी स्मारकासमोरील शिलालेखावर कोरलेल्या महापुरुषांच्या चित्रांवर काळ्या अक्षरांनी खोडखाड केल्याचे दिसून आले. अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इतवारीतील अतिक्रमण काढतात. पण स्मारकासभोवतालचे अतिक्रमण आर्थिक व्यवहारामुळे दुर्लक्षित करतात, असा आरोप नागरिकांनी लोकमतशी बोलताना केला.अवैध होर्डिंग्जचा कब्जाशहिदांची आठवण जिवंत ठेवणाऱ्या परिसरात अवैध होर्डिंग्जचा कब्जा आहे. होर्डिंग्ज हटविण्याचे काम मनपाचे आहे, पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लोकांना शहीद स्मारक कमी तर अवैध होर्डिंग्ज जास्त दिसून येतात. या परिसरात कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे आसपासचे दुकानदार कचरा या परिसरात फेकतात. स्मारकाच्या लोखंडी रॉडला कपडे बांधले आहेत. त्यामुळे परिसराचे विदु्रपीकरण झाले आहे.सुरक्षा भिंतीचे गेट वारंवार तोडतात दुकानदारशहीद स्मारक परिसराला सुरक्षा भिंत असून, तीन लहान गेट लावले आहेत. असामाजिक तत्त्वांचा वावर कमी करण्यासाठी वरिष्ठ नागरिकांनी या गेटला अनेकदा कुलूप लावले, पण पावभाजी ठेलेचालक आणि दुकानदारांनी कुलूप प्रत्येक वेळी तोडले आहे. यासंदर्भात अनेकदा वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. स्मारकाच्या विदु्रपीकरणाची तक्रार तहसील ठाण्याचे अधिकारी घेत नाहीत. अतिक्रमण करणाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार असल्यामुळे अधिकारी साधी दखलही घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.महापुरुषांच्या कोरलेल्या मूर्तीचार पायऱ्या चढून गेल्यानंतर उंच शहीद स्तंभ आहे. त्यामागे महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या मूर्ती कोरल्या आहेत. बाजूलाच माँ चंडिका माता मंदिर आणि स्मारकालगत हनुमान मंदिर आहे. मंदिरात आलेले भाविक कचरा आणि दुर्गंधीमुळे परिसरात बसत नाहीत. हा परिसर अनेकदा स्वच्छ केला आहे. पण पावभाजी विकणारे अतिक्रमणधारक स्मारक परिसरात उरलेले खाद्यान्न वारंवार टाकतात. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त तक्रारी केल्या आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन मनपा आणि पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली.२८ लाखांत सौंदर्यीकरणनासुप्रची ट्रस्टी असताना २८ लाख रुपये खर्च करून ऐतिहासिक शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण केले होते. पण आता स्मारकाची देखरेख करण्यास कुणीही नाही. मनपाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. स्मारकाच्या परिसरात अतिक्रमण आणि कचऱ्याचा ढीग असल्यामुळे लोकांचेही स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वात आधी मनपाने स्मारकच्या परिसराबाहेरील पावभाजीचे ठेले हटवावे आणि दररोज झाडझूड करून परिसर स्वच्छ ठेवावा. हायमास्टपैकी अनेक लाईट बंद आहेत. हा परिसर स्वच्छ ठेवल्यास शहिदांच्या आठवणींना पुन्हा उजाळा येईल.आभा पांडे, नगरसेविका.शहीद स्मारकाचा इतिहासआताचे शहीद स्मारक आणि पूर्वीचे मैदान स्वातंत्र्यपूर्वी वर्ष १९४२ ला झालेल्या ‘चले जाव’ आंदोलनाचे नागपूरचे केंद्र होते. स्मारकावर अनेक महापुरुषांच्या नावाचा उल्लेख आहे. आंदोलनादरम्यान जुन्या भंडारा रोडवर झालेल्या गोळीबारात जवळपास आठजण शहीद झाले होते. हा चौक गोळीबार चौक म्हणून ओळखला जातो. आंदोलनकर्त्यांनी इतवारीतील पोस्ट ऑफिस जाळल्याची नोंद आहे. या चौकात नागपुरातील नामांकित राजकीय नेत्यांची बैठक होती. महात्मा भगवान दिन, पूनमचंद रांका, लालचंद मोदी, प्यारेलाल गोयल, महादेव मोदी, पन्नालाल देवडिया, भोलासिंग नायक, रामचंद्रसाव लांजेवार, विद्यावती देवडिया, दीनदयाल गुप्ता, वामनराव गावंडे यांच्यासह अनेकविध नेत्यांच्या उपस्थितीने हा चौक नेहमी गजबजला आहे.डॉ. संतोष मोदी

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर