शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

माशांऐवजी पक्ष्यांचाच बळी

By admin | Updated: May 1, 2016 03:05 IST

नागपूर व वर्धा जिल्ह्यासाठी वैभव समजले जाणारे बोरधरण हे आता पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे.

बोरधरणातील प्रकार : मासेमाऱ्यांचे जाळे ठरताहेत कर्दनकाळमनोज झाडे कान्होलीबारानागपूर व वर्धा जिल्ह्यासाठी वैभव समजले जाणारे बोरधरण हे आता पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. कारण, या धरणात मुबलक जलसाठा असल्याने तिथे मासेमारी केली जाते. मासेमारी करण्यासाठी धरणातील झाडांच्या खुंटांना बांधण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये पक्षी अडकत असल्याने तसेच एकदा अडकल्यानंतर त्यातून सुटका करवून घेणे शक्य नसल्याने पक्ष्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे सदर धरण पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. बोरधरण नुकतेच अभयारण्य घोषित करण्यात आले असून, हे देशातील सर्वात लहान अभयारण्य आहे. बोरधरण व बोर वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या प्राणी व पक्ष्यांमुळे हे अभयारण्य अल्पावधीत वन्यप्रेमी, पक्षी निरीक्षक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. बोरधरणात मुबलक पाणीसाठा असल्याने तसेच परिसरातील वातावरण अनुकूल असल्याने या ठिकाणी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या बरीच मोठी आहे. धरणाच्या सभोताल फिरणाऱ्या पक्ष्यांमुळे धरणाच्या सौंदर्यात भर पडली आहे. धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे या ठिकाणी मासेमारी केली जाते. त्यासाठी धरणाचा लिलाव करून संबंधिताला मासेमारीचा परवाना दिला जातो. मासेमारीसाठी नायलॉनच्या धाग्यांचे मोठमोठे जाळे धरणात टाकले जातात. धरणाच्या सीमांकनासाठी या जाळ्यांच्या वरच्या भागाला प्लास्टिकच्या बाटल्या बांधल्या जातात. या बाटल्या हलक्या असल्याने पाण्यावर तरंगतात. पावसाळा सुरू होताच मासेमारी बंद केली जाते. मात्र, धरणातील जाळे काढले जात नाही. पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने जाळे वर येते आणि धरणात असलेल्या झाडांच्या खुंटांना अडकतात. नायलॉनचे धागे पाण्यात सडत नसल्याने ते बराच काळ टिकतात.सध्या धरणातील झाडांना मासेमारीचे जाळे काही ठिकाणी अडकले असल्याचे दिसून येते. या धरणाच्या परिसरात वास्तव्याला असलेले पक्षी या झाडांना अडकलेल्या जाळ्यात अडकतात. हे धागे मजबूत राहत असल्याने त्यात अडकलेल्या पक्ष्यांना जाळ्यातून स्वत:ची सुटका करवून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक पक्ष्यांचा जाळ्यात अडकून मृत्यू होतो तर काही पक्ष्यांची सुटका झालीच तर त्यांना जखमा होतात. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पक्ष्यांच्रूा जीवितास धोका उद्भवत आहे. साफसफाई अभियानबोर व्याघ्र प्रकल्प प्रशासन व बहार नेचर फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यामाने धरणातील झाडांना अडकलेले जाळे, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या काढण्यासाठी साफसफाई अभियान राबविण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात जाळे, पिशव्या व बाटल्या काढण्यात आल्या. परंतु धरणातील संपूर्ण जाळे व पिशव्या काढणे शक्य झाले नाही. काही ठिकाणी या जाळ्यांमध्ये प्राण्यांची हाडे अडकल्याचेही आढळून आले. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. धरणातील जाळे काढण्याची प्रशासनाकडे कुठलीही यंत्रणा नाही. प्रशासनाने लक्ष द्यावे मासेमारीसाठी बोरधरणाचा बोरधरण प्रशासनाकडून लिलाव केला जातो. यातून प्रशासनाला मोठे उत्पन्न मिळत असून, लिलाव घेणाऱ्याशी मासेमारीचा करार केला जातो. मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन जाळ्यांचा वापर केला जातो. सदर जाळे काढण्याची तसेच धरणाच्या ‘बॅक वॉटर’ भागाची व वनक्षेत्रालगतच्या भागाची साफसफाई करण्याची व्यवस्था बोरधरण प्रशासनाने करायला हवी. कारण, हे जाळे वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. - संजय इंगळे, सदस्य, बोर व्याघ्र प्रकल्प सल्लागार समिती.