शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा पुन्हा संकटात

By admin | Updated: February 16, 2016 04:06 IST

कर्जबाजारीपणामुळे कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरकर्जबाजारीपणामुळे कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गतवर्षीच्या तुलनेत शेतपीक नुकसान दुपटीने झाले आहे. गतवर्षी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांना ६६ लाख ८८ हजार रुपयांचा फटका बसला होता. यंदा १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत हा आकडा १ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयापर्यंत पोहचला आहे. वनविभागाच्या वतीने गत आठवड्यात एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात ही माहिती पुढे आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यात देण्यात आली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) वन्यप्राण्यांमुळे शेतपीक नुकसानीच्या १५८५ घटना घडल्या. यात १ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गत वर्षींच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. २०१४-१५ वर्षांत नुकसानीच्या १०३० घटना घडल्या होत्या. यात ४६ लाख ९ हजार रुपयाच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. वन्यजीव आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. मात्र नुकसानीची आकडेवारी पाहता, या उपाययोजना किती व्यापक आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतपिकांसोबत पशुधन हानीच्या घटनातही वाढ झाली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) पशुधन हानीची २२४ प्रकरणे वनविभागाकडे नोंदविण्यात आली. वन्यप्राण्यांचा धोका कायमचरात्री जागली करणाऱ्या आणि शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका आजही कायमच आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०१५-१६ वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) २० शेतकरी जखमी झाले. याच्या नुकसानभरपाईपोटी ४ लाख ३६ हजार अदा करण्यात आले. गत वर्षी जखमींची संख्या पाच इतकी होती. वन्यप्राण्यामुळे मनुष्य मृत्यूचे एक प्रकरण १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत पुढे आले आहे. यात संबंधिताच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.