शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बळीराजा पुन्हा संकटात

By admin | Updated: February 16, 2016 04:06 IST

कर्जबाजारीपणामुळे कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरकर्जबाजारीपणामुळे कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गतवर्षीच्या तुलनेत शेतपीक नुकसान दुपटीने झाले आहे. गतवर्षी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांना ६६ लाख ८८ हजार रुपयांचा फटका बसला होता. यंदा १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत हा आकडा १ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयापर्यंत पोहचला आहे. वनविभागाच्या वतीने गत आठवड्यात एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात ही माहिती पुढे आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यात देण्यात आली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) वन्यप्राण्यांमुळे शेतपीक नुकसानीच्या १५८५ घटना घडल्या. यात १ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गत वर्षींच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. २०१४-१५ वर्षांत नुकसानीच्या १०३० घटना घडल्या होत्या. यात ४६ लाख ९ हजार रुपयाच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. वन्यजीव आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. मात्र नुकसानीची आकडेवारी पाहता, या उपाययोजना किती व्यापक आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतपिकांसोबत पशुधन हानीच्या घटनातही वाढ झाली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) पशुधन हानीची २२४ प्रकरणे वनविभागाकडे नोंदविण्यात आली. वन्यप्राण्यांचा धोका कायमचरात्री जागली करणाऱ्या आणि शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका आजही कायमच आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०१५-१६ वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) २० शेतकरी जखमी झाले. याच्या नुकसानभरपाईपोटी ४ लाख ३६ हजार अदा करण्यात आले. गत वर्षी जखमींची संख्या पाच इतकी होती. वन्यप्राण्यामुळे मनुष्य मृत्यूचे एक प्रकरण १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत पुढे आले आहे. यात संबंधिताच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.