शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

उपराजधानीत वंदे मातरम्चा जयघोष

By admin | Updated: August 14, 2016 02:32 IST

भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून...

कन्हैया देशद्रोही तर केजरीवाल ड्रामेबाज-मणिंदरजितसिंह बिट्टा : हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन नागपूर : भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ड्रामेबाज राजकारणी आहेत, अशी टीका अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजितसिंह बिट्टा यांनी केली. मातृभूमी प्रतिष्ठान, नागपूरच्यावतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी सक्करदरा चौक येथे सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिण नागपूर परिसरातील तब्बल ६९ शाळा - महाविद्यालयांमधील १० हजाराच्या वर विद्यार्थी सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. बिट्टा यांनी कन्हैया कुमारची शहीद भगतसिंह यांच्याशी तुलना केल्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावरही टीका केली. भगतसिंह विद्यार्थी नेता होते. त्यांनी अवघ्या २३ व्या वर्षी हसत हसत देशासाठी मरण पत्करले. दुसरीकडे जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया भारत तोडण्याची भाषा करतो. सीमेवर सैनिक शहीद होत असताना जेएनयूच्या कॅम्पसमध्ये अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. भारताचे तुकडे करण्याची भाषा बोलणारे देशद्रोही आहेत, असे मत बिट्टा यांनी व्यक्त केले. केजरीवाल यांच्यावरही बिट्टा यांनी टीका केली. देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवालांनी आंदोलन सुरू केले. त्यावेळी आम्हीही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. मात्र त्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला. उपोषणावर बसलेले केजरीवाल भूक लागताच देश्भक्ती विसरल्याचा आरोप बिट्टा यांनी केला. यावेळी बिट्टा यांनी, ‘काश्मीर देणे तर दूर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून येथून देशभक्तीची प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. याची जाण ठेवून देशप्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी के ले. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, आमदार नागो गाणार, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, नगरसेवकांमध्ये दीपक कापसे, चेतना टांक, शीला कराळे, स्वाती आखतकर, सुजाता कोंबाडे, मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, रमेश सिंगारे, कैलास चुटे, प्रशांत तुंगार, संजय भेंडे, सागर गोडबोले, सत्यजीत दस्तुरे, मोहन अग्निहोत्री, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुक्कावार, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रवींद्र भोयर, दीपक धुरडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिजित मुळे यांनी केले. दिव्या धुरडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) ना. गडकरी यांचे कौतुक रामसेतूला ऐतिहासिक सत्य नसल्याचे सांगत इतिहासकार व काही राजकारण्यांनी रामसेतू तोडण्याचा घाट आखला होता. त्यावेळी आम्ही सर्व आंदोलनाच्या तयारीला लागलो होतो. मात्र नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रामसेतू अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत एम.एस. बिट्टा यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. देशवासीयांना स्फूर्ती मिळते नितीन गडकरी यांनी वंदे मातरम्मुळे देशवासीयांना स्फूर्ती मिळत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. त्यासाठी अनेकांना सर्वस्व त्यागावे लागले. अथक परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात करायचे आहे. भारताला सुखी, संपन्न व शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले. शेजारी पाकिस्तान भारताला युद्धात हरवू शकत नाही. त्यामुळे दहशतवादी पाठवून आमचे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र देशभक्त भारतवासी त्यांचे मनसुबे खरे ठरू देणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.