शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

उपराजधानीत वंदे मातरम्चा जयघोष

By admin | Updated: August 14, 2016 02:32 IST

भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून...

कन्हैया देशद्रोही तर केजरीवाल ड्रामेबाज-मणिंदरजितसिंह बिट्टा : हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन नागपूर : भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ड्रामेबाज राजकारणी आहेत, अशी टीका अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजितसिंह बिट्टा यांनी केली. मातृभूमी प्रतिष्ठान, नागपूरच्यावतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी सक्करदरा चौक येथे सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिण नागपूर परिसरातील तब्बल ६९ शाळा - महाविद्यालयांमधील १० हजाराच्या वर विद्यार्थी सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. बिट्टा यांनी कन्हैया कुमारची शहीद भगतसिंह यांच्याशी तुलना केल्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावरही टीका केली. भगतसिंह विद्यार्थी नेता होते. त्यांनी अवघ्या २३ व्या वर्षी हसत हसत देशासाठी मरण पत्करले. दुसरीकडे जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया भारत तोडण्याची भाषा करतो. सीमेवर सैनिक शहीद होत असताना जेएनयूच्या कॅम्पसमध्ये अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. भारताचे तुकडे करण्याची भाषा बोलणारे देशद्रोही आहेत, असे मत बिट्टा यांनी व्यक्त केले. केजरीवाल यांच्यावरही बिट्टा यांनी टीका केली. देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवालांनी आंदोलन सुरू केले. त्यावेळी आम्हीही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. मात्र त्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला. उपोषणावर बसलेले केजरीवाल भूक लागताच देश्भक्ती विसरल्याचा आरोप बिट्टा यांनी केला. यावेळी बिट्टा यांनी, ‘काश्मीर देणे तर दूर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून येथून देशभक्तीची प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. याची जाण ठेवून देशप्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी के ले. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, आमदार नागो गाणार, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, नगरसेवकांमध्ये दीपक कापसे, चेतना टांक, शीला कराळे, स्वाती आखतकर, सुजाता कोंबाडे, मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, रमेश सिंगारे, कैलास चुटे, प्रशांत तुंगार, संजय भेंडे, सागर गोडबोले, सत्यजीत दस्तुरे, मोहन अग्निहोत्री, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुक्कावार, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रवींद्र भोयर, दीपक धुरडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिजित मुळे यांनी केले. दिव्या धुरडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) ना. गडकरी यांचे कौतुक रामसेतूला ऐतिहासिक सत्य नसल्याचे सांगत इतिहासकार व काही राजकारण्यांनी रामसेतू तोडण्याचा घाट आखला होता. त्यावेळी आम्ही सर्व आंदोलनाच्या तयारीला लागलो होतो. मात्र नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रामसेतू अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत एम.एस. बिट्टा यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. देशवासीयांना स्फूर्ती मिळते नितीन गडकरी यांनी वंदे मातरम्मुळे देशवासीयांना स्फूर्ती मिळत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. त्यासाठी अनेकांना सर्वस्व त्यागावे लागले. अथक परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात करायचे आहे. भारताला सुखी, संपन्न व शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले. शेजारी पाकिस्तान भारताला युद्धात हरवू शकत नाही. त्यामुळे दहशतवादी पाठवून आमचे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र देशभक्त भारतवासी त्यांचे मनसुबे खरे ठरू देणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.