शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

उपराजधानीत वंदे मातरम्चा जयघोष

By admin | Updated: August 14, 2016 02:32 IST

भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून...

कन्हैया देशद्रोही तर केजरीवाल ड्रामेबाज-मणिंदरजितसिंह बिट्टा : हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन नागपूर : भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कन्हैया कुमार देशद्रोही असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ड्रामेबाज राजकारणी आहेत, अशी टीका अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजितसिंह बिट्टा यांनी केली. मातृभूमी प्रतिष्ठान, नागपूरच्यावतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी सक्करदरा चौक येथे सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिण नागपूर परिसरातील तब्बल ६९ शाळा - महाविद्यालयांमधील १० हजाराच्या वर विद्यार्थी सामूहिक वंदे मातरम् गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. बिट्टा यांनी कन्हैया कुमारची शहीद भगतसिंह यांच्याशी तुलना केल्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावरही टीका केली. भगतसिंह विद्यार्थी नेता होते. त्यांनी अवघ्या २३ व्या वर्षी हसत हसत देशासाठी मरण पत्करले. दुसरीकडे जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया भारत तोडण्याची भाषा करतो. सीमेवर सैनिक शहीद होत असताना जेएनयूच्या कॅम्पसमध्ये अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. भारताचे तुकडे करण्याची भाषा बोलणारे देशद्रोही आहेत, असे मत बिट्टा यांनी व्यक्त केले. केजरीवाल यांच्यावरही बिट्टा यांनी टीका केली. देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवालांनी आंदोलन सुरू केले. त्यावेळी आम्हीही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. मात्र त्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला. उपोषणावर बसलेले केजरीवाल भूक लागताच देश्भक्ती विसरल्याचा आरोप बिट्टा यांनी केला. यावेळी बिट्टा यांनी, ‘काश्मीर देणे तर दूर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून येथून देशभक्तीची प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. याची जाण ठेवून देशप्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी के ले. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, आमदार नागो गाणार, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, नगरसेवकांमध्ये दीपक कापसे, चेतना टांक, शीला कराळे, स्वाती आखतकर, सुजाता कोंबाडे, मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, रमेश सिंगारे, कैलास चुटे, प्रशांत तुंगार, संजय भेंडे, सागर गोडबोले, सत्यजीत दस्तुरे, मोहन अग्निहोत्री, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुक्कावार, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रवींद्र भोयर, दीपक धुरडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिजित मुळे यांनी केले. दिव्या धुरडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) ना. गडकरी यांचे कौतुक रामसेतूला ऐतिहासिक सत्य नसल्याचे सांगत इतिहासकार व काही राजकारण्यांनी रामसेतू तोडण्याचा घाट आखला होता. त्यावेळी आम्ही सर्व आंदोलनाच्या तयारीला लागलो होतो. मात्र नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रामसेतू अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत एम.एस. बिट्टा यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. देशवासीयांना स्फूर्ती मिळते नितीन गडकरी यांनी वंदे मातरम्मुळे देशवासीयांना स्फूर्ती मिळत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. त्यासाठी अनेकांना सर्वस्व त्यागावे लागले. अथक परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. स्वातंत्र्याचे रूपांतर सुराज्यात करायचे आहे. भारताला सुखी, संपन्न व शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले. शेजारी पाकिस्तान भारताला युद्धात हरवू शकत नाही. त्यामुळे दहशतवादी पाठवून आमचे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र देशभक्त भारतवासी त्यांचे मनसुबे खरे ठरू देणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.